शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

 भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थिती : काश्मीरचा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 14:11 IST

काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थिती काश्मीरचा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द

इंदुमती गणेशकोल्हापूर : काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.भारताचे नंदनवन असलेले काश्मीर एकदा तरी पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मार्च ते जुलै या कालावधीत विविध टुर कंपन्यांकडून काश्मीर सहली काढल्या जातात. कोल्हापुरातून वर्षाकाठी जवळपास १० ते १५ नागरिक काश्मीर पर्यटनासाठी जात असतात. त्यांचे बुकिंग सहा महिने आधीच झालेले असते.

यंदाच्या वर्षीची सहल २० मार्चपासून सुरू होणार होती. मात्र पुलवामा येथे जवानांवर झालेला हल्ला, त्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या युद्धजन्य व तणावपूर्ण स्थितीमुळे टूर कंपन्यांनी हा दौरा रद्द केला आहे. शिवाय काश्मीरला काही कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनी तेथे जाणाऱ्या विमानांचे तिकीट रद्द केले आहे.काश्मीरचे अर्थकारण मुख्यत: पर्यटनावर चालते; त्यामुळे तेथील सरकारकडूनही पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केले जातात. मात्र भारताचे स्वर्ग असलेले हे राज्य सध्या सर्र्वांत संवेदनशील बनले आहे. जवानांवरील हल्ल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत; शिवाय मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेचे वातावरण आहे. या दोन्ही कारणांमुळे काश्मीरचा ठरलेला दौरा रद्द करण्यात आला आहे.

दुबईहून पुढचा प्रवासया तणावपूर्ण स्थितीमुळे भारतातून अन्य देशांना जाणाऱ्या विमानांचा मार्ग वळविण्यात आला आहे. युरोप, लंडन, स्पेनसारख्या अनेक देशांमध्ये ही विमाने पाकिस्तानमधून जातात. आता मात्र ही विमाने पाकिस्तानऐवजी दुबईमार्गे वळविण्यात आली आहे.

शुल्क रद्दची मागणीकाश्मीरमधील सध्याच्या वातावरणामुळे देशभरातील नागरिकांकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात विमानांची तिकिटे रद्द केली जात आहेत. काश्मीरमध्येच नव्हे तर अन्य देशांत जाणाऱ्या नागरिकांनीही आपला दौरा थांबविला आहे. मात्र बुकिंग केलेले तिकीट रद्द करताना शुल्क आकारले जाते. ही रक्कम तीन हजारांपासून दहा हजारांपर्यंत असते. ट्रॅव्हल एजंट इंडिया असोसिएशनने विमान कंपन्यांकडे सद्य:स्थितीत हे शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.

काश्मीरचे सौंदर्य आणि बर्फ पाहण्यासाठी नागरिक तेथे जातात. सध्याच्या स्थितीत हे शक्य नसल्याने कोल्हापुरातील टूर कंपन्यांनी काश्मीरचा दौरा रद्द केला आहे. वातावरण निवळल्यानंतर पुन्हा सहली सुरू होतील.- बी. व्ही. वराडे, ट्रेड विंग्ज 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाkolhapurकोल्हापूरtourismपर्यटन