शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

 भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थिती : काश्मीरचा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 14:11 IST

काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थिती काश्मीरचा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द

इंदुमती गणेशकोल्हापूर : काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.भारताचे नंदनवन असलेले काश्मीर एकदा तरी पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मार्च ते जुलै या कालावधीत विविध टुर कंपन्यांकडून काश्मीर सहली काढल्या जातात. कोल्हापुरातून वर्षाकाठी जवळपास १० ते १५ नागरिक काश्मीर पर्यटनासाठी जात असतात. त्यांचे बुकिंग सहा महिने आधीच झालेले असते.

यंदाच्या वर्षीची सहल २० मार्चपासून सुरू होणार होती. मात्र पुलवामा येथे जवानांवर झालेला हल्ला, त्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या युद्धजन्य व तणावपूर्ण स्थितीमुळे टूर कंपन्यांनी हा दौरा रद्द केला आहे. शिवाय काश्मीरला काही कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनी तेथे जाणाऱ्या विमानांचे तिकीट रद्द केले आहे.काश्मीरचे अर्थकारण मुख्यत: पर्यटनावर चालते; त्यामुळे तेथील सरकारकडूनही पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केले जातात. मात्र भारताचे स्वर्ग असलेले हे राज्य सध्या सर्र्वांत संवेदनशील बनले आहे. जवानांवरील हल्ल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत; शिवाय मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेचे वातावरण आहे. या दोन्ही कारणांमुळे काश्मीरचा ठरलेला दौरा रद्द करण्यात आला आहे.

दुबईहून पुढचा प्रवासया तणावपूर्ण स्थितीमुळे भारतातून अन्य देशांना जाणाऱ्या विमानांचा मार्ग वळविण्यात आला आहे. युरोप, लंडन, स्पेनसारख्या अनेक देशांमध्ये ही विमाने पाकिस्तानमधून जातात. आता मात्र ही विमाने पाकिस्तानऐवजी दुबईमार्गे वळविण्यात आली आहे.

शुल्क रद्दची मागणीकाश्मीरमधील सध्याच्या वातावरणामुळे देशभरातील नागरिकांकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात विमानांची तिकिटे रद्द केली जात आहेत. काश्मीरमध्येच नव्हे तर अन्य देशांत जाणाऱ्या नागरिकांनीही आपला दौरा थांबविला आहे. मात्र बुकिंग केलेले तिकीट रद्द करताना शुल्क आकारले जाते. ही रक्कम तीन हजारांपासून दहा हजारांपर्यंत असते. ट्रॅव्हल एजंट इंडिया असोसिएशनने विमान कंपन्यांकडे सद्य:स्थितीत हे शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.

काश्मीरचे सौंदर्य आणि बर्फ पाहण्यासाठी नागरिक तेथे जातात. सध्याच्या स्थितीत हे शक्य नसल्याने कोल्हापुरातील टूर कंपन्यांनी काश्मीरचा दौरा रद्द केला आहे. वातावरण निवळल्यानंतर पुन्हा सहली सुरू होतील.- बी. व्ही. वराडे, ट्रेड विंग्ज 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाkolhapurकोल्हापूरtourismपर्यटन