शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

करवीरमध्ये प्रस्थापित संचालक बदलाचे संकेत...

By admin | Updated: January 20, 2015 00:02 IST

निवडणुकीचे पडघम : गगनबावडा व पन्हाळ्याला संधीची शक्यता; ज्यांच्याकडे ठराव त्याला मिळणार प्राधान्य

प्रकाश पाटील - कोपार्डे= ‘गोकुळ’ दूध संघावर नेहमीच करवीरचा दबदबा आहे. यात मनपा लॉबी तयार झाल्यानंतर काही विशिष्ट व्यक्ती, भाग व नेत्यांच्या नातेवाइकांमध्येच ‘गोकुळ’च्या संचालकपदाची मक्तेदारी राहिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी? असा प्रश्न कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे. त्यामुळे गेली १५ ते २० वर्षे ‘गोकुळ’च्या संचालकपदावर असणाऱ्यांना पायउतार करून करवीरमध्ये भाकरी परतणार काय? याबाबत उत्सुकता वाढली आहे.‘गोकुळ’च्या संचालकपदासाठी नेत्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते जरी बनलो, तरी संधी मिळू शकेल ही भावना कार्यकर्त्यांत रुजली आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, तर विधानसभेवेळी पी. एन. पाटील यांच्यासाठी गोकुळच्या संचालकपदासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले होते. तरी निवडणुकीत नेत्यांना मदत केल्याची बेरीज-वजाबाकी मांडून आपण गोकुळसाठी इच्छुकांबरोबर दावेदार असल्याचे गणित बिगुल वाजल्यापासून कार्यकर्ते मांडत आहेत.करवीरमध्ये असणाऱ्या पाच संचालकांत बाबासाहेब चौगले यांचा पत्ता सतेज पाटलांनी शड्डू ठोकल्याने कट होणार आहे. आनंदराव पाटील (चुयेकर) यांच्या ठिकाणी त्यांचे पुत्र शशिकांत पाटील, विश्वास नारायण पाटील यांच्या जागा निश्चित असून निवास पाटील यांचे पुत्र उत्तम पाटील, की पी. एन. पाटील यांचे पुत्र राजेश पाटील हे लवकरच होणाऱ्या मेळाव्यात ठरणार असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे. सुरेश पाटील गेली दहा वर्षे ठाण मांडून असल्याने आता दुसऱ्याला संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे येथे बदलाची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पाच संचालकांमध्ये विश्वास पाटील व शशिकांत पाटील (चुयेकर) यांची उमेदवारी निश्चित समजली तरी बाकी तीन जागांवर भाकरी परतणार अशीच चिन्हे सध्या दिसत आहेत.यात एस. के. पाटील (कोपार्डे), प्रकाश पाटील (कोगे), तुकाराम दत्तात्रय पाटील (खुपिरे), बाळासाहेब खाडे (सांगरूळ) यांची नावे आघाडीवर आहेत. यातही संस्थांचे ठराव गोळा करण्यात कोण आघाडीवर आहे, त्यालाच प्राधान्यक्रम दिला जाण्याची मोठी शक्यता आहे. करवीर मतदारसंघातील पन्हाळ्यामध्ये अ‍ॅड. प्रकाश देसाई यांनी पी. एन. पाटील यांच्या बाजूने राहत नरकेंच्या विरोधात किल्ला लढविला. तेही गोकुळसाठी फिल्डिंग लावून आहेत. त्यातच पन्हाळ्यात नरकेंच्या विरोधात एक दमदार गट निर्माण करण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश देसाई यांचे नावही पुढे येण्याची शक्यता आहे.कार्यकर्ते राजेश यांच्यासाठी आग्रहीपी. एन. पाटील यांनी राजेशला पुढे आणावे यासाठी येत्या चार दिवसांत कार्यकर्तेच मेळावा बोलावणार असल्याचे खात्रिशीर वृत्त आहे. यात पी. एन. पाटील यांच्यावर गोकुळमध्ये राजेशला संधी देऊन आगामी राजकारणासाठी पुढे करावे यासाठी कार्यकर्त्यांतूनच दबाव टाकला जाणार आहे.