शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

योग, गुरुपरंपरा, मातृशक्तीमुळेच भारतीय संस्कृती जिवंत

By admin | Updated: January 23, 2015 00:36 IST

विजय भटकर : भारतीय संस्कृती महोत्सवात चौथ्या दिवशीही मोठी गर्दी;

कोल्हापूर : योग, गुरुपरंपरा आणि मातृशक्तीमुळेच भारतीय संस्कृती जिवंत आहे. संस्कृती आपल्याला प्रेरणा देण्यास शिकविते. ही संस्कृती आणि युवापिढीच्या ताकदीवर आपला देश विश्वगुरू बनणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी आज, गुरुवारी येथे केले. विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती पाहण्यासाठी कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर सलग चौथ्या दिवशी भाविक, नागरिकांची गर्दी कायम राहिली.भारतीय संस्कृती उत्सवातील युवाज्ञानोत्सवात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी योगगुरू रामदेवबाबा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नात राजश्री चौधरी, नोबेल पुरस्कार विजेते डॉ. महादेव तलवार, गोव्याचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर, ‘बॉर्डरलेस’चे अधिक कदम, आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ गुरुराज करजगी, ओडिसातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पुरोहित प्रमुख उपस्थित होते.रामदेवबाबा म्हणाले, डॉक्टरकी तसेच अन्य स्वरूपांतील पदव्या सहजासहजी मिळत आहेत. अशी पदवी मिळत असली तरी त्यामुळे शिक्षण आणि संस्कृती कमी होत आहे. देशाला बलवान बनविण्यासाठी संस्कारपूर्ण शिक्षणाची गरज आहे. ‘कोणतीही गोष्ट एकदा करून बघितलीच पाहिजे’ हा आजच्या युवापिढीला ‘व्हायरस’ लागला आहे. (प्रतिनिधी)कोण काय म्हणाले...

संस्कारक्षम शिक्षणाची गरज : रामदेवबाबाराजश्री चौधरी : युवकांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यासह सुदृढ भारत घडविण्यासाठी नेताजी बोस यांनी निश्चित केलेल्या धोरणांची फाईल सरकारकडे अडकून आहे. ती खुली करण्यात यावी. स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणारी ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धा बंद व्हावी.गुरुराज करजगी : जे बोलतो तेच करण्याची पद्धती शिक्षणात यावी. पुस्तकी ज्ञानाऐवजी मूल्याधिष्ठित शिक्षण देणे उपयुक्त ठरणारे आहे.प्रदीप पुरोहित : राष्ट्रउभारणी हे विद्यार्थ्यांचे लक्ष्य असावे. जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. सरकार न्याय देत नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. अशा स्थितीत युवकांनी संघटितपणे राष्ट्र उभारणी, समाजप्रबोधनाचे काम करावे.डॉ. तलवार : राष्ट्र उभारणीत युवकांनी ‘डीआरडीओ’च्या माध्यमातून पुढाकार घ्यावा.अधिक कदम : देशाच्या ‘बॉर्डर’ सुरक्षित नाहीत. तेथील जमिनी आपण मिळविल्या; पण लोक अजूनही आपल्यापासून दूर आहेत. त्यांना प्रेमाने आपलेसे केले पाहिजे. देशातील युवक काम करायला तयार आहेत; पण त्यांना साथ मिळत नसल्याचे वास्तव आहे.