शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

भारतीय कलाविष्काराने नटलेली कलाब्धी । -- अजेय दळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:07 IST

भारतीय अभिजात कला हा ‘कलाब्धी’चा पाया आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने कलाकारांच्या कलाकृती अनुभवण्याची संधी रसिकांना मिळत आहे.

ठळक मुद्दे समन्वयक, कलाब्धी आर्ट

कोल्हापूर : कोल्हापूर ही कलानगरी... राजर्षी शाहू महाराजांच्या राजाश्रयाने येथे चित्र, शिल्प, संगीत अशा कला रुजल्या आणि बहरल्याही. ती कलापरंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे. पोलीस उद्यानात सुरू असलेला ‘कलाब्धी आर्ट फेस्टिव्हल’ या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. या निमित्ताने महोत्सवाचे समन्वयक म्हणून काम पाहत असलेले प्राचार्य अजेय दळवी यांची घेतलेली ही चर्चेतील मुलाखत...

प्रश्न : कलाब्धी आर्ट फेस्टिव्हलबद्दल काय सांगाल?उत्तर : सहा उच्चविद्याविभूषित मुली एकत्र येतात आणि कोल्हापुरात राष्ट्रीय कला महोत्सव व्हावा, असा संकल्प करून कामाला लागतात. पहिल्या वर्षीचा महोत्सव यशस्वी करतात आणि मिळालेल्या अनुभवाची शिदोरी घेऊन दुसऱ्या वर्षीही तितक्याच आत्मीयतेने त्या या महोत्सवाची तयारी करतात, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अमृता जनवाडकर, डॉ. प्रियदर्शनी जैन, मानवी कामत, आर्किटेक्ट रिमा करंजगार, ग्रीष्मा गांधी, देविणा घाटगे या सहा मैत्रिणींनी एकत्र येऊन मोठ्या जबाबदारीने या उपक्रमासाठी मेहनत घेतली आहे. आज त्यांच्या प्रयत्नांना खºया अर्थाने यश आले आहे असे म्हणता येईल. भारतीय अभिजात कला हा ‘कलाब्धी’चा पाया आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने देशभरातील कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची, अनुभवण्याची संधी

कोल्हापूरकर रसिकांना मिळत आहे.प्रश्न : भारतीय चित्र-शिल्पशैलीची वैशिष्ट्ये कोणती ?उत्तर : भारतीय संस्कृती कलेवर आधारलेली आहे. ही कला येथील मातीने परंपरेतून दिली, रुजवली आणि काळानुरूप बहरली. मुळातच भारतीय म्हणून आपले भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच समाजरचनेच्या दृष्टीने अनेक संपन्न अशी वैशिष्ट्ये आहेत. मग आपली शहरे, घरे, पेहराव, आहार, चालीरीती, भाषा असो किंवा पारंपरिक चित्र, शिल्प व वास्तुकला या युरोपापेक्षा खूप वेगळ्या होत्या व आजही पाश्चिमात्य प्रभाव पचवून त्या भारतीय म्हणून आपली सौंदर्यसंपन्नता टिकवून आहेत. भारतीय कलाचे स्वत:चे एक विश्व आहे. कारण एकूणच भारतीयत्व, पर्यावरण जतन आणि संवर्धन करीत असताना हीएक सकस समाजनिर्मितीचीच प्रक्रिया आहे.

पर्यावरणाचा संदेशया महोत्सवात देशभरातील चित्र, शिल्पसह अन्य कलाप्रकारांतील कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्या कलाकृती त्या त्या भागातील जीवनशैलीचे त्यांच्या कलेची प्रतिभा सांगत आहेत. पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर पर्यावरणाचा संदेश देणारा हा महोत्सव रसिकांसाठी विशेष उपलब्धी ठरेल. 

  • भारतीय अभिजात कलेला काळाला अनुसरून अधिक संपन्न करण्याची अभिलाषा ‘कलाब्धी’ या कलामहोत्सवाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न होतो आहे, ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. अभिजात चित्र-शिल्पकलेच्या माध्यमातून मोलाचे काम निश्चित होऊ शकते आणि याच विश्वासाने यंदाचाही हा राष्ट्रीय कलामहोत्सव होत आहे. पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय परंपरेतील पर्यावरणपूरक सत्य, ऊर्जा, अपरिग्रह, सौंदर्य या मूल्यांचीही त्यांनी विशेष दखल ठेवली आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंग