शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

भारतीय कलाविष्काराने नटलेली कलाब्धी । -- अजेय दळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:07 IST

भारतीय अभिजात कला हा ‘कलाब्धी’चा पाया आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने कलाकारांच्या कलाकृती अनुभवण्याची संधी रसिकांना मिळत आहे.

ठळक मुद्दे समन्वयक, कलाब्धी आर्ट

कोल्हापूर : कोल्हापूर ही कलानगरी... राजर्षी शाहू महाराजांच्या राजाश्रयाने येथे चित्र, शिल्प, संगीत अशा कला रुजल्या आणि बहरल्याही. ती कलापरंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे. पोलीस उद्यानात सुरू असलेला ‘कलाब्धी आर्ट फेस्टिव्हल’ या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. या निमित्ताने महोत्सवाचे समन्वयक म्हणून काम पाहत असलेले प्राचार्य अजेय दळवी यांची घेतलेली ही चर्चेतील मुलाखत...

प्रश्न : कलाब्धी आर्ट फेस्टिव्हलबद्दल काय सांगाल?उत्तर : सहा उच्चविद्याविभूषित मुली एकत्र येतात आणि कोल्हापुरात राष्ट्रीय कला महोत्सव व्हावा, असा संकल्प करून कामाला लागतात. पहिल्या वर्षीचा महोत्सव यशस्वी करतात आणि मिळालेल्या अनुभवाची शिदोरी घेऊन दुसऱ्या वर्षीही तितक्याच आत्मीयतेने त्या या महोत्सवाची तयारी करतात, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अमृता जनवाडकर, डॉ. प्रियदर्शनी जैन, मानवी कामत, आर्किटेक्ट रिमा करंजगार, ग्रीष्मा गांधी, देविणा घाटगे या सहा मैत्रिणींनी एकत्र येऊन मोठ्या जबाबदारीने या उपक्रमासाठी मेहनत घेतली आहे. आज त्यांच्या प्रयत्नांना खºया अर्थाने यश आले आहे असे म्हणता येईल. भारतीय अभिजात कला हा ‘कलाब्धी’चा पाया आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने देशभरातील कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची, अनुभवण्याची संधी

कोल्हापूरकर रसिकांना मिळत आहे.प्रश्न : भारतीय चित्र-शिल्पशैलीची वैशिष्ट्ये कोणती ?उत्तर : भारतीय संस्कृती कलेवर आधारलेली आहे. ही कला येथील मातीने परंपरेतून दिली, रुजवली आणि काळानुरूप बहरली. मुळातच भारतीय म्हणून आपले भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच समाजरचनेच्या दृष्टीने अनेक संपन्न अशी वैशिष्ट्ये आहेत. मग आपली शहरे, घरे, पेहराव, आहार, चालीरीती, भाषा असो किंवा पारंपरिक चित्र, शिल्प व वास्तुकला या युरोपापेक्षा खूप वेगळ्या होत्या व आजही पाश्चिमात्य प्रभाव पचवून त्या भारतीय म्हणून आपली सौंदर्यसंपन्नता टिकवून आहेत. भारतीय कलाचे स्वत:चे एक विश्व आहे. कारण एकूणच भारतीयत्व, पर्यावरण जतन आणि संवर्धन करीत असताना हीएक सकस समाजनिर्मितीचीच प्रक्रिया आहे.

पर्यावरणाचा संदेशया महोत्सवात देशभरातील चित्र, शिल्पसह अन्य कलाप्रकारांतील कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्या कलाकृती त्या त्या भागातील जीवनशैलीचे त्यांच्या कलेची प्रतिभा सांगत आहेत. पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर पर्यावरणाचा संदेश देणारा हा महोत्सव रसिकांसाठी विशेष उपलब्धी ठरेल. 

  • भारतीय अभिजात कलेला काळाला अनुसरून अधिक संपन्न करण्याची अभिलाषा ‘कलाब्धी’ या कलामहोत्सवाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न होतो आहे, ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. अभिजात चित्र-शिल्पकलेच्या माध्यमातून मोलाचे काम निश्चित होऊ शकते आणि याच विश्वासाने यंदाचाही हा राष्ट्रीय कलामहोत्सव होत आहे. पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय परंपरेतील पर्यावरणपूरक सत्य, ऊर्जा, अपरिग्रह, सौंदर्य या मूल्यांचीही त्यांनी विशेष दखल ठेवली आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंग