शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भारत हिंदुराष्ट्र करण्याचा डाव

By admin | Updated: February 21, 2016 01:25 IST

येचुरी यांचा भाजपवर आरोप : पानसरेंच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचे आवाहन

कोल्हापूर : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असो की हैदराबाद विश्वविद्यालय असो; या शिक्षणसंस्थांवर भाजपला आपला कब्जा निर्माण करावयाचा आहे. त्यांना विद्यापीठांतून पुराण शिकवायचे आहे; कारण भारताला हिंदुराष्ट्र करण्याचा त्यांचा डाव आहे. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांचे विचारच हा डाव उधळवून लावतील, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी शनिवारी येथे केले. ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिजागर सभेत ते बोलत होते. येथील ऐतिहासिक दसरा चौकात ही सभा झाली. तिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डाव्या चळवळीतील लोक व विशेषत: तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. व्यासपीठावर कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजित कौर, श्रीमती उमा पानसरे, मेघा पानसरे, मुक्ता दाभोलकर, उदय नारकर, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, धनाजी गुरव, व्यंकप्पा भोसले, प्रा. विलास रणसुभे, आदी मान्यवर उपस्थित होते. अमरजित कौर म्हणाल्या, ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची लढाई ही विचारांची होती. या देशात प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी जी लढाई केली त्याचसाठी या तिघांना बलिदान द्यावे लागले; परंतु ज्यांना विचार नकोत, चर्चा नको, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको व हम करे सो कायदा अशी ज्यांची मनोवृत्ती आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाला हिंदुराष्ट्र बनवायचे आहे. संघांचे संस्थापक हेडगेवार गुुरुजी यांचा हिटलर हा प्रेरणास्रोत होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंहांसारखे जे जवान फाशीवर गेले त्यांची संभावना संघाने ‘भटके हुए जवान’ अशी केली होती. अशा विचारांच्या नागपूर प्रशिक्षण केंद्रातून तयार झालेले नेतेच आज देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनले आहेत. समाजात भीती पसरवायची, जो आपल्या विचारास विरोध करील त्याचे इतके चारित्र्यहनन करायचे की त्याचा खून करायलाच लोक तयार होतील, अशी या विचारसरणीची कार्यपद्धती आहे. पानसरे यांच्यासह तिघा विचारवंतांचे बळी हे त्याच विचारसरणीने केलेले खून आहेत.’ प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, ‘पानसरे-दाभोलकर यांच्यासारखी माणसे पुन:पुन्हा जन्माला येत नाहीत. अशी माणसे घडायला युग जावे लागते. महाराष्ट्र पुरोगामी आहे हा आपला गैरसमज असून तो खऱ्या अर्थाने पुरोगामी व्हावा यासाठी सर्वशक्तीनिशी बळ बांधणे हीच या विचारवंतांना खरी श्रद्धांजली ठरेल. राज्यकर्ते भेकड असल्यानेच प्रतिगामी शक्तींनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्या बेभान झाल्या असून उन्माद माजवू लागल्या आहेत. अशा शक्तींना विचारांनीच सडेतोड उत्तर द्यावे लागेल.’ यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, दिलीप पोवार, संभाजीराव जगदाळे, प्रशांत वाघमारे, शिवाजीराव परुळेकर, गौतम कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता...?’ या पुस्तकाच्या ५१ व्या आवृत्तीचे तसेच ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या ‘गोविंद पानसरे नावाचे विद्यापीठ’ आदींसह एकूण चार पुस्तकांचे व विशेषांकाचे प्रकाशन झाले. स्वागत व प्रास्ताविक उदय नारकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. सी. एम. गायकवाड यांनी केले.