शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

भारत हिंदुराष्ट्र करण्याचा डाव

By admin | Updated: February 21, 2016 01:25 IST

येचुरी यांचा भाजपवर आरोप : पानसरेंच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचे आवाहन

कोल्हापूर : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असो की हैदराबाद विश्वविद्यालय असो; या शिक्षणसंस्थांवर भाजपला आपला कब्जा निर्माण करावयाचा आहे. त्यांना विद्यापीठांतून पुराण शिकवायचे आहे; कारण भारताला हिंदुराष्ट्र करण्याचा त्यांचा डाव आहे. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांचे विचारच हा डाव उधळवून लावतील, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी शनिवारी येथे केले. ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिजागर सभेत ते बोलत होते. येथील ऐतिहासिक दसरा चौकात ही सभा झाली. तिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डाव्या चळवळीतील लोक व विशेषत: तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. व्यासपीठावर कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजित कौर, श्रीमती उमा पानसरे, मेघा पानसरे, मुक्ता दाभोलकर, उदय नारकर, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, धनाजी गुरव, व्यंकप्पा भोसले, प्रा. विलास रणसुभे, आदी मान्यवर उपस्थित होते. अमरजित कौर म्हणाल्या, ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची लढाई ही विचारांची होती. या देशात प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी जी लढाई केली त्याचसाठी या तिघांना बलिदान द्यावे लागले; परंतु ज्यांना विचार नकोत, चर्चा नको, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको व हम करे सो कायदा अशी ज्यांची मनोवृत्ती आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाला हिंदुराष्ट्र बनवायचे आहे. संघांचे संस्थापक हेडगेवार गुुरुजी यांचा हिटलर हा प्रेरणास्रोत होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंहांसारखे जे जवान फाशीवर गेले त्यांची संभावना संघाने ‘भटके हुए जवान’ अशी केली होती. अशा विचारांच्या नागपूर प्रशिक्षण केंद्रातून तयार झालेले नेतेच आज देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनले आहेत. समाजात भीती पसरवायची, जो आपल्या विचारास विरोध करील त्याचे इतके चारित्र्यहनन करायचे की त्याचा खून करायलाच लोक तयार होतील, अशी या विचारसरणीची कार्यपद्धती आहे. पानसरे यांच्यासह तिघा विचारवंतांचे बळी हे त्याच विचारसरणीने केलेले खून आहेत.’ प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, ‘पानसरे-दाभोलकर यांच्यासारखी माणसे पुन:पुन्हा जन्माला येत नाहीत. अशी माणसे घडायला युग जावे लागते. महाराष्ट्र पुरोगामी आहे हा आपला गैरसमज असून तो खऱ्या अर्थाने पुरोगामी व्हावा यासाठी सर्वशक्तीनिशी बळ बांधणे हीच या विचारवंतांना खरी श्रद्धांजली ठरेल. राज्यकर्ते भेकड असल्यानेच प्रतिगामी शक्तींनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्या बेभान झाल्या असून उन्माद माजवू लागल्या आहेत. अशा शक्तींना विचारांनीच सडेतोड उत्तर द्यावे लागेल.’ यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, दिलीप पोवार, संभाजीराव जगदाळे, प्रशांत वाघमारे, शिवाजीराव परुळेकर, गौतम कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता...?’ या पुस्तकाच्या ५१ व्या आवृत्तीचे तसेच ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या ‘गोविंद पानसरे नावाचे विद्यापीठ’ आदींसह एकूण चार पुस्तकांचे व विशेषांकाचे प्रकाशन झाले. स्वागत व प्रास्ताविक उदय नारकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. सी. एम. गायकवाड यांनी केले.