शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

संघर्ष समितीच्या जबाबदारीत वाढ

By admin | Updated: April 4, 2015 00:16 IST

दौलत साखर कारखाना : राजीनामे खरेखुरे की प्रतीकात्मक

नंदकुमार ढेरे -चंदगडगेले चार गळीत हंगाम बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना सुरू करण्यात संचालक मंडळाला प्रयत्न करूनही यश न आल्याने त्यांनी आपले राजीनामे नुकतेच दौलत बचाव संघर्ष समितीकडे सुपूर्द केले. संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर संचालक मंडळाला राजीनामे द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर दौलत सुरू करण्याची जबाबदारी संघर्ष समितीवर असेल, तर दुसरीकडे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या व्यतिरिक्त अन्य संचालकांनी आपले राजानामे साध्या कागदावर दिले असल्याने ते खरेखुरे की प्रतीकात्मक आहेत याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.गेल्या दोन वर्षांपासून दौलत सुरू करण्याच्या दृष्टीने संघर्ष समितीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, संचालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे कारखाना चालविण्यास कोणतीच पार्टी इच्छुक नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने ठरावीक मुदतीत कारखाना सुरू करावा, अन्यथा राजीनामे देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी समितीच्यावतीने लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांना हलकर्णी फाट्यावर अडवून राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळीही गोपाळराव पाटील यांनी ठरावीक मुदतीत आपण कारखाना सुरू न करू शकल्यास सर्व संचालकांचे राजीनामे दऊ, असे सांगून वेळ मारून नेली होती.त्यावेळी गोपाळराव पाटील यांनी आपला राजीनामा साध्या कागदावर लिहून दऊन वेळ मारून नेली होती. नुकतेच ‘दौलत’च्या संचालकांनी राजीनामे दिले असले तरी केवळ अध्यक्ष अशोक जाधव यांचा राजीनामा लेटरहेडवर आहे. तर अन्य संचालकांनी आपले राजीनामे साध्या कागदावर दिले आहेत. ‘दौलत’ची नोंदणी बहुराज्य कायद्याखाली असल्याने साध्या कागदावरील राजीनामे केंद्रीय सहकार निबंधक ते ग्राह्य मानणार का ? संचालकांनी दिलेले राजीनामे हे ऐनवेळी दिलेले नाहीत. त्यामुळे राजीनामे देताना संचालकांजवळ लेटरहेड नव्हते, असे म्हणण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामे साध्या कागदावर देण्यामागील हेतू काय? काही असले तरी ज्या पोटतिडकीने संघर्ष समितीने संचालकांचे राजीनामे घेतले. त्याच पोटतिडकीने आता संघर्ष समितीला ठोस पावले उचवावी लागतील.जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाची थिटे पेपर्सचा दावा न्यायालयाने फेटाळल्याने एक अडथळा दूर झाला आहे. मात्र, आता बँक कारखान्याची निर्विवाद ताबेदार झाल्याने ‘दौलत’चे काय करायचे याचा निर्णय बँकच घेणार आहे. दौलत सुरू करण्यासंदर्भात बँक, सभासद, शेतकरी व कामगार यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे दौलत बचाव संघर्ष समितीचे नेते डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.दौलत कारखाना सुरू करण्यासंदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. त्याचबरोबर कारखाना चालवायला देण्यासंदर्भात येत्या चार दिवसांत वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध केली जाणार असून, कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू व्हावा हीच आमचीही इच्छा असल्याचे जिल्हा बँकेचे प्रशासक प्रताप चव्हाण यांनी सांगितले.