शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

संघर्ष समितीच्या जबाबदारीत वाढ

By admin | Updated: April 4, 2015 00:16 IST

दौलत साखर कारखाना : राजीनामे खरेखुरे की प्रतीकात्मक

नंदकुमार ढेरे -चंदगडगेले चार गळीत हंगाम बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना सुरू करण्यात संचालक मंडळाला प्रयत्न करूनही यश न आल्याने त्यांनी आपले राजीनामे नुकतेच दौलत बचाव संघर्ष समितीकडे सुपूर्द केले. संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर संचालक मंडळाला राजीनामे द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर दौलत सुरू करण्याची जबाबदारी संघर्ष समितीवर असेल, तर दुसरीकडे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या व्यतिरिक्त अन्य संचालकांनी आपले राजानामे साध्या कागदावर दिले असल्याने ते खरेखुरे की प्रतीकात्मक आहेत याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.गेल्या दोन वर्षांपासून दौलत सुरू करण्याच्या दृष्टीने संघर्ष समितीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, संचालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे कारखाना चालविण्यास कोणतीच पार्टी इच्छुक नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने ठरावीक मुदतीत कारखाना सुरू करावा, अन्यथा राजीनामे देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी समितीच्यावतीने लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांना हलकर्णी फाट्यावर अडवून राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळीही गोपाळराव पाटील यांनी ठरावीक मुदतीत आपण कारखाना सुरू न करू शकल्यास सर्व संचालकांचे राजीनामे दऊ, असे सांगून वेळ मारून नेली होती.त्यावेळी गोपाळराव पाटील यांनी आपला राजीनामा साध्या कागदावर लिहून दऊन वेळ मारून नेली होती. नुकतेच ‘दौलत’च्या संचालकांनी राजीनामे दिले असले तरी केवळ अध्यक्ष अशोक जाधव यांचा राजीनामा लेटरहेडवर आहे. तर अन्य संचालकांनी आपले राजीनामे साध्या कागदावर दिले आहेत. ‘दौलत’ची नोंदणी बहुराज्य कायद्याखाली असल्याने साध्या कागदावरील राजीनामे केंद्रीय सहकार निबंधक ते ग्राह्य मानणार का ? संचालकांनी दिलेले राजीनामे हे ऐनवेळी दिलेले नाहीत. त्यामुळे राजीनामे देताना संचालकांजवळ लेटरहेड नव्हते, असे म्हणण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामे साध्या कागदावर देण्यामागील हेतू काय? काही असले तरी ज्या पोटतिडकीने संघर्ष समितीने संचालकांचे राजीनामे घेतले. त्याच पोटतिडकीने आता संघर्ष समितीला ठोस पावले उचवावी लागतील.जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाची थिटे पेपर्सचा दावा न्यायालयाने फेटाळल्याने एक अडथळा दूर झाला आहे. मात्र, आता बँक कारखान्याची निर्विवाद ताबेदार झाल्याने ‘दौलत’चे काय करायचे याचा निर्णय बँकच घेणार आहे. दौलत सुरू करण्यासंदर्भात बँक, सभासद, शेतकरी व कामगार यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे दौलत बचाव संघर्ष समितीचे नेते डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.दौलत कारखाना सुरू करण्यासंदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. त्याचबरोबर कारखाना चालवायला देण्यासंदर्भात येत्या चार दिवसांत वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध केली जाणार असून, कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू व्हावा हीच आमचीही इच्छा असल्याचे जिल्हा बँकेचे प्रशासक प्रताप चव्हाण यांनी सांगितले.