शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

भाजीपाल्याची आवक वाढल्याने कोल्हापूर बाजारामध्ये दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:51 IST

परतीच्या पावसाने भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याने दर गगनाला भिडले होते; पण या आठवड्यापासून भाज्यांची आवक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने दर खाली येत आहेत. कांदाही चाळिशीतून खाली उतरला असून, घाऊक बाजारात तो प्रतिकिलो ३२ रुपयांपर्यंत स्थिर राहिला आहे. फळांची आवक मात्र कमी होत आहे.

ठळक मुद्देगुळाला पाच हजार रुपये दर!कांद्याची आवक वाढल्याने घसरण

कोल्हापूर ,दि. ३० :  परतीच्या पावसाने भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याने दर गगनाला भिडले होते; पण या आठवड्यापासून भाज्यांची आवक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने दर खाली येत आहेत. कांदाही चाळिशीतून खाली उतरला असून, घाऊक बाजारात तो प्रतिकिलो ३२ रुपयांपर्यंत स्थिर राहिला आहे. फळांची आवक मात्र कमी होत आहे.

पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने आवक कमी झाली होती. परिणामी दरांत वाढ झाली. वांगी किरकोळ बाजारात ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचल्याने सामान्य ग्राहक त्यापासून दुरावला; पण या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक थोडी-थोडी वाढू लागल्याने दर घसरू लागले आहेत. गत आठवड्यापेक्षा बाजार समितीत भाजीपाल्याची २३०० क्विंटलनी आवक वाढली आहे.

वांग्याचा घाऊक बाजारातील सरासरी दर ४५ रुपयांपर्यंत आला आहे. टोमॅटोच्या आवकेतील चढउतार कायम राहिल्याने प्रत्येक आठवड्याला दर कमी-जास्त होत आहेत. गत आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात टोमॅटो ३५ रुपये होता. आता तो ४० रुपये झाला आहे.

या भाज्यांच्या तुलनेने ढबू, ओली मिरची, गवार, कारली, भेंडी, वरण्याचे दर कमी झाले आहेत. दोडका व फ्लॉवरच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कोथबिरीची पेंढी तीस रुपयांपर्यंत पोहोचली होती. बाजार समितीत रोज पंधरा हजार पेंढीची आवक होत असल्याने दर थोडे कमी झाले आहेत. कांदापात, मेथी, पालक, शेपू, पोकळा या पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.

कांद्याची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात तो ४० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता; पण गत आठवड्याच्या तुलनेत रोज दोन हजार पिशव्यांनी आवक वाढल्याने दर घसरले आहेत. घाऊक बाजारात चांगल्या कांद्याचा दर ३२ रुपयांपर्यंत झाला आहे.

बटाटा व लसणाची आवक व दरात फारसा चढउतार दिसत नाही. पावसाच्या तडाख्यातून अजून फळबाजार सावरलेला दिसत नाही. गत आठवड्यापेक्षा ७०० क्विंटलने आवक कमी झाली; पण तिचा दरांवर फारसा परिणाम दिसत नाही.

फळांना मागणीही मर्यादित असल्याने आवकेचा थेट परिणाम झालेला नाही. सीताफळांची आवक मात्र वाढली असून, किरकोळ बाजारात सरासरी ३० रुपये किलो असा दर राहिला आहे.

दिवाळी संपल्याने कडधान्य बाजारात थोडी मंदी दिसत आहे. तूरडाळ, हरभरा डाळींच्या दरांत दोन रुपयांनी घसरण झाली आहे. सरकी तेल ७५ रुपये किलो, तर शाबू ७० रुपये किलोवर स्थिर आहे. साखरेच्या घाऊक बाजारात घसरण झाली असली तरी अद्याप किरकोळ बाजारात ४० रुपयेच साखरेचा दर आहे.

गुळाला पाच हजार रुपये दर!पावसाने थोडी उसंत दिल्याने गुºहाळघरांची धुराडी पेटू लागली असून, बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. रोज सरासरी पंधरा हजार रव्यांची आवक होत असून, जास्तीत जास्त दर ५०४० रुपये तर एक किलोच्या रव्याला प्रतिक्विंटल ५३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.