शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

भाजीपाल्याची आवक वाढल्याने कोल्हापूर बाजारामध्ये दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:51 IST

परतीच्या पावसाने भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याने दर गगनाला भिडले होते; पण या आठवड्यापासून भाज्यांची आवक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने दर खाली येत आहेत. कांदाही चाळिशीतून खाली उतरला असून, घाऊक बाजारात तो प्रतिकिलो ३२ रुपयांपर्यंत स्थिर राहिला आहे. फळांची आवक मात्र कमी होत आहे.

ठळक मुद्देगुळाला पाच हजार रुपये दर!कांद्याची आवक वाढल्याने घसरण

कोल्हापूर ,दि. ३० :  परतीच्या पावसाने भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याने दर गगनाला भिडले होते; पण या आठवड्यापासून भाज्यांची आवक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने दर खाली येत आहेत. कांदाही चाळिशीतून खाली उतरला असून, घाऊक बाजारात तो प्रतिकिलो ३२ रुपयांपर्यंत स्थिर राहिला आहे. फळांची आवक मात्र कमी होत आहे.

पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने आवक कमी झाली होती. परिणामी दरांत वाढ झाली. वांगी किरकोळ बाजारात ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचल्याने सामान्य ग्राहक त्यापासून दुरावला; पण या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक थोडी-थोडी वाढू लागल्याने दर घसरू लागले आहेत. गत आठवड्यापेक्षा बाजार समितीत भाजीपाल्याची २३०० क्विंटलनी आवक वाढली आहे.

वांग्याचा घाऊक बाजारातील सरासरी दर ४५ रुपयांपर्यंत आला आहे. टोमॅटोच्या आवकेतील चढउतार कायम राहिल्याने प्रत्येक आठवड्याला दर कमी-जास्त होत आहेत. गत आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात टोमॅटो ३५ रुपये होता. आता तो ४० रुपये झाला आहे.

या भाज्यांच्या तुलनेने ढबू, ओली मिरची, गवार, कारली, भेंडी, वरण्याचे दर कमी झाले आहेत. दोडका व फ्लॉवरच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कोथबिरीची पेंढी तीस रुपयांपर्यंत पोहोचली होती. बाजार समितीत रोज पंधरा हजार पेंढीची आवक होत असल्याने दर थोडे कमी झाले आहेत. कांदापात, मेथी, पालक, शेपू, पोकळा या पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.

कांद्याची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात तो ४० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता; पण गत आठवड्याच्या तुलनेत रोज दोन हजार पिशव्यांनी आवक वाढल्याने दर घसरले आहेत. घाऊक बाजारात चांगल्या कांद्याचा दर ३२ रुपयांपर्यंत झाला आहे.

बटाटा व लसणाची आवक व दरात फारसा चढउतार दिसत नाही. पावसाच्या तडाख्यातून अजून फळबाजार सावरलेला दिसत नाही. गत आठवड्यापेक्षा ७०० क्विंटलने आवक कमी झाली; पण तिचा दरांवर फारसा परिणाम दिसत नाही.

फळांना मागणीही मर्यादित असल्याने आवकेचा थेट परिणाम झालेला नाही. सीताफळांची आवक मात्र वाढली असून, किरकोळ बाजारात सरासरी ३० रुपये किलो असा दर राहिला आहे.

दिवाळी संपल्याने कडधान्य बाजारात थोडी मंदी दिसत आहे. तूरडाळ, हरभरा डाळींच्या दरांत दोन रुपयांनी घसरण झाली आहे. सरकी तेल ७५ रुपये किलो, तर शाबू ७० रुपये किलोवर स्थिर आहे. साखरेच्या घाऊक बाजारात घसरण झाली असली तरी अद्याप किरकोळ बाजारात ४० रुपयेच साखरेचा दर आहे.

गुळाला पाच हजार रुपये दर!पावसाने थोडी उसंत दिल्याने गुºहाळघरांची धुराडी पेटू लागली असून, बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. रोज सरासरी पंधरा हजार रव्यांची आवक होत असून, जास्तीत जास्त दर ५०४० रुपये तर एक किलोच्या रव्याला प्रतिक्विंटल ५३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.