रत्नागिरी : ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना म्हणून उपकेंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. शिवाय उपकेंद्राची क्षमता वाढवून ती एकमेकांशी जोडली जाणार आहेत. जेणेकरून वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा तातडीने उपलब्ध होऊ शकेल.रत्नागिरी शहरात झाडगाव, हार्बर, नाचणेरोड व एमआयडीसी मिळून चार उपकेंद्र आहेत. हार्बर उपकेंद्र ज्यावेळी बंद पडते त्यावेळी निम्मे शहर अंधारात राहाते. भविष्यात ग्राहकांना अंधारात न ठेवण्यासाठी उपकेंद्र नव्याने उभारण्यात आलेल्या रहाटाघर उपकेंद्राशी जोडण्यात येणार आहेत. हार्बर, झाडगाव उपकेंद्रास महापारेषणच्या कुवारबाव उपकेंद्रातील ११० केव्ही वाहिनीवरून वीजपुरवठा होतो. संबंधित वाहिनीवर बिघाड झाल्यास चारही उपकेंद्र ठप्प होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यायी मार्गाने वीजपुरवठा मिळावा, यासाठी कुवारबाव महापारेषण उपकेंद्र निवळी केंद्राला जोडण्यात येणार आहे. रहाटाघर उपकेंद्राला ११० के. व्ही. फिनोलेक्स वाहिनीवरून वीजपुरवठा घेण्यात येणार आहे. तसेच रहाटाघर व हार्बर उपकेंद्र जोडले जाणार आहेत. शिवाय एमआडीसी व नाचणे उपकेंद्र निवळीला जोडली जाणार आहेत. जेणेकरून तातडीच्या वेळी पर्यायी वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. रहाटाघर उपकेंद्र जानेवारीअखेरी सुरू करण्यात येणार आहे.महावितरणकडून पायाभूत आराखडा दोनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६८ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यासाठी नवीन सहा उपकेंद्र मंजूर झाली आहेत. पायाभूत आराखडा एकमध्ये एकूण ८ उपकेंद्र मंजूर होती. पैकी पाच उपकेंद्र पूर्ण होऊन कार्यान्वित झाली आहेत. उर्वरित तीन उपकेंद्रांचे काम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव, धामणंद व गुहागर येथील उपकेंद्राचे काम सुरू आहे. कुवारबाव, साखरपा, चांदोर, हर्णै, भूम येथील उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. आराखडा दोनमध्ये कोतवडे, पानवल, लोटे एमआयडीसी (खेड), कोळवली (शिवणे), वालोपे (चिपळूण), पालघर (मंडणगड) येथे उपकेंद्र मंजूर झाली असून, केवळ वालोपे उपकेंद्राला अद्याप जागा मिळालेली नाही. याशिवाय ३५२ किमी लघुदाब व ४१५ किमी उच्चदाब वाहिन्या, ३८२ नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. तसेच १५१ जुन्या रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे व उपकेंद्रात नवीन रोहित्र बसविले जाणार आहे.कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. याशिवाय डोंगरदऱ्यातून वाहिन्या गेल्यामुळे पावसाळ्यात वाहिन्या तुटणे, रोहित्र बिघाड किंवा जळणे, यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. उपकेंद्रावर लगतची अनेक गावे विसंबून असल्यामुळे याचा फटका संबंधित गावांना बसतो. त्यामुळे महावितरणने फिडरवरील ताण कमी होण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. चाफे उपकेंद्रावर गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, धामणसे, ओरी, जाकादेवीसह आसपासची गावे समाविष्ट होतात. कोतवडे उपकेंद्रामुळे चाफे उपकेंद्राचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे.पावसाळ्यातील समस्येवर तोडगावीजपुरवठा खंडित झाल्यावर येथील व्यवसायावर परिणाम होत होता. परंतु कोतवडे उपकेंद्रावर गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, जांभरूण, खरवते, वेतोशी, मजगाव, बसणी, काळबादेवी आदी गावे अंतर्भूत करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात समस्या उद्भवली, तर ती तत्काळ सोडविण्यास महावितरणला यश येणार आहे.
वीज उपकेंद्रांच्या संख्येत वाढ करणार
By admin | Updated: January 13, 2015 00:06 IST