शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

खून करून दिशाभूल करण्याच्या प्रकारात वाढ

By admin | Updated: March 14, 2016 00:36 IST

दोन महिन्यांत अकरा खून : पोलिसही अवाक्; पुरावा सापडू नये म्हणून गुन्हेगारांकडून नव्या कल्पना

एकनाथ पाटील -- कोल्हापूर -हत्या केल्यानंतर त्याचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी आरोपी मृतदेहाची अत्यंत खबरदारीने विल्हेवाट लावीत आहेत. कधी मृतदेहाचे धडच मिळते, तर हात-पाय आणि डोके गायब असते. कधी संपूर्ण मृतदेह सापडतो; पण चेहरा ठेचून वा जाळून विद्रूप केलेला असतो. अशा गूढ खुनांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात ११ खून झाल्याने गुन्हेगारांचे संकट पोलिसांना आव्हान बनले आहे. शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची दर महिन्याला गुन्हेविषयक बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक घेत असतात. गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात खूनसत्र सुरू आहे. विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, कौटुंबिक क्षणिक वादातून आतापर्यंत अकरा खून झाल्याची पोलिस रेकॉर्डला नोंद आहे. तीन खुनांचे गूढ आजही कायम वाशी (ता. करवीर) येथील ‘सुतारकी’ नावाच्या उसाच्या शेतात अज्ञात पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोत्यात बांधून ठेवल्याच्या अवस्थेत आढळून आला. वाघबीळ घाटातील झुडपात छिन्नविच्छिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला. त्याचे डोके गायब होते. किडे-मुंग्या लागून धड कुजले होते. त्याचे शवविच्छेदन करण्याची परिस्थिती नव्हती. त्यामुळे करवीर पोलिसांनी त्या जागेवरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले; परंतु हा तरुण कोण? त्याचा खून कोणी केला? हे सर्व प्रश्न आजही तसेच आहेत. शिवाजी पेठेतील हृषिकेश अनिल कोगेकर (वय ३४) याचा कसबा वाळवे गावानजीक उसाच्या शेतामध्ये डोळे बाहेर काढून निर्घृण खून केला गेला. त्याची ओळख पटूनही मारेकऱ्यांचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. पालक वर्गात भीतीराजेंद्रनगरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाला, हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फारच चिंताजनक आहे. अपहरणाच्या घटनांमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक आणि निरीक्षकांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. - प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक