शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मोर्चा, आंदोलनासाठी मुलांचा वापर करणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 10:32 IST

शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनांत शालेय मुला-मुलींचा वापर करणे अयोग्य आहे. त्यांच्यावर अन्याय करण्याचा हा एक प्रकार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील घटकांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करताना या मुला-मुलींना रस्त्यावर उतरविण्याऐवजी अन्य पर्यायांचा वापर करून लढा देणे योग्य ठरणार आहे. त्या दृष्टीने पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देसमिती, संघटनांनी अन्य पर्याय निवडावेत पालकांनी काळजी घेणे आवश्यक

कोल्हापूर : शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनांत शालेय मुला-मुलींचा वापर करणे अयोग्य आहे. त्यांच्यावर अन्याय करण्याचा हा एक प्रकार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील घटकांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करताना या मुला-मुलींना रस्त्यावर उतरविण्याऐवजी अन्य पर्यायांचा वापर करून लढा देणे योग्य ठरणार आहे. त्या दृष्टीने पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.गेल्या काही वर्षांपासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शैक्षणिक टप्प्यांवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा आणि महाविद्यालयांच्या विविध प्रश्न, प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. चर्चा, निवेदने, निदर्शने, धरणे, आमरण उपोषण, प्रतीकात्मक आंदोलनांच्या माध्यमातून विविध संघटना, कृती समिती यांचा संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये अनेकदा शाळा बेमुदत बंद ठेवण्यात येतात.

आंदोलन स्थगित झाल्यानंतर एखाद्या सुटीदिवशी वर्ग भरवून बंदच्या कालावधीतील दिवस भरले जातात. अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. मात्र, थेट शालेय मुला-मुलींना मोर्चा, आंदोलनात सहभागी करवून घेण्याचे प्रकार वाढत आहे. कोल्हापुरात गेल्या चार वर्षांमध्ये शैक्षणिक व्यासपीठ, विनाअनुदानित शाळा कृती समिती, आदी संघटना, समितीने पुकारलेल्या आंदोलनांमध्ये सर्रास मुला-मुलींना सहभागी करून घेण्यात आले आहे.

ही पद्धत आता विविध आंदोलनांमध्ये रूढ होत आहे. वेतन, अनुदान आणि प्रशासकीय पातळीवरील प्रश्न अशा स्वरूपातील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली जातात. अनेकदा या आंदोलनांमधील मुद्दे विद्यार्थ्यांशी संबंधित नसतात. शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यापर्यंत ठीक आहे. मात्र, विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संबंधित नसलेल्या बाबींसाठी रस्त्यावर उतरविणे योग्य नाही. अशा पद्धतीने आंदोलनासाठी त्यांचा वापर करणे अयोग्य आहे.

जनजागृती फेरीतील सहभागस्वच्छता मोहीम, पर्यावरण रक्षण, वृक्षसंवर्धन, लेक वाचवा, साक्षरता, आरोग्य संवर्धन, आदी प्रबोधनपर जनजागृतीसाठी शाळांच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या प्रभातफेरी, जनजागृती फेरी विविध शाळांकडून काढण्यात येतात. त्यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींना सहभागी करणे योग्य आहे.

संस्था, संघटनांनी त्यांच्याशी निगडित असणाऱ्या मागण्यांसाठी मोर्चा, आंदोलनात शालेय मुला-मुलींचा वापर करणे चुकीचे आहे. बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५, सेक्शन ७५ मध्ये त्याबाबतचे मुद्दे स्पष्टपणे मांडले आहेत. मुला-मुलींच्या हक्क आणि संरक्षणावर गदा आणल्यास त्याविरोधात तक्रार करण्याचा अधिकार पालकांना आहे. त्या दृष्टीने पालकांनी सजग राहून पाल्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.- संतोष शिंदे, बालसंरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ

विद्यार्थ्यांना वेठीस धरणे; त्यांना कोणत्याही पद्धतीने त्रास देणे अयोग्य आहे. अशा प्रकाराबाबत संबंधित विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांनी तक्रार केल्यास ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये (आरटीई)’ संबंधितांवर कारवाई करता येते.- आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर