शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
3
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
4
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
5
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
9
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
10
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
12
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
13
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
14
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
15
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
16
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
17
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
18
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
19
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
20
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

कागलमध्ये शेतकऱ्यांनीच हाती घेतले ऊसदराचे आंदोलन

By विश्वास पाटील | Published: November 15, 2023 3:18 PM

धुरांडी धिम्या गतीनेच : सर्वच गटाचे कार्यकर्ते आंदोलनात

दत्ता पाटील, कागल : ऊसदरावरुन सुरू असणाऱ्या आंदोलनाचे लोण राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातही पोहचले आहे. त्यामुळे येथील कारखाने सुरू होवून १५ दिवस उलटले तरीही धिम्या गतीनेच सुरू आहेत. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव कमी असला तरी आता आपल्या न्याय्य हक्कांसाठी राजकीय गट-तटाला तिलांजली देऊन शेतकरीच रस्त्यावर उतरले आहेत.

सध्या अपवाद वगळता शेतकरी आणि वाहनधारकांचे नुकसान होवू नये यासाठी समन्वय साधत शांततेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे.माञ, राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या तालुक्यातही चळवळीला बळ मिळतयं ही बाब अधोरेखित करणारीच आहे. तालुक्यातील अनेक गावात शेतकरी संघटनेच्या शाखाही स्थापन झाल्या आहेत. कागल तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी अनेक दिवसांपासून जिल्ह्यावर अधिराज्य गाजवले आहे.त्यामुळे येथे गट तटाला अधिक महत्त्व आहे.परंतु, राजकीय सत्तेसाठी नेते मंडळींकडूनच सोयीचे राजकारण केले जात आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांसह जनतेमध्येही आपल्या हिताचा विचार पुढे येताना दिसत आहे.

मागील वर्षीच्या ऊसाला ४००रु. व यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ३हजार५०० रु भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पदयाञेला कागल तालुक्यातही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून महिनाभर येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यासह शेतकरीही ऊसतोड बंद करण्यासाठी प्रबोधन करत आहेत.

दरम्यान, कागलमधील छञपती शाहू, हमिदवाडा,बिद्री यांनी पंधरा दिवसापुर्वी तर अन्नपूर्णा शुगरने महिन्यांपूर्वी धुरांडी पेटविली आहेत. माञ, आंदोलनामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

रात्रीचा दिवस...

ऊसाला दरवाढ मिळाली तर ती केवळ आंदोलन करणाऱ्यांनाच मिळणार नाही. तर ती सर्वांनाच मिळणार आहे... चार दिवस संयम ठेवा... असे प्रबोधन करत मोटररँलीसह येथील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काही जण राञीची चुप्पी ऊसवाहतुक करत आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर कार्यकर्ते पहारा देवून राञी जागवत आहेत.

गुरुंनंतर आता शिष्यांकडून अपेक्षा...

२०१३ च्या हंगामात स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी फोडली होती. तर सध्या त्यांचेच राजकीय शिष्य हसन मुश्रीफ हे पालकमंत्री आहेत. आता त्यांनीच यामध्ये समन्वयाची भूमिका घेवून तोडगा काढावा अशी मागणीही शेतकऱ्यातून होत आहे.

कारखानदारांची अशीही गोची..

कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात कागलमधील शेतकरी स्वयंस्फूर्तीने ऊसदराच्या आंदोलनात रस्त्यावर उतरला आहे. अनेक गावात ऊसदराचा तिढा सुटेपर्यंत ऊसतोड न घेण्याचा ठरावही करुन कारखानदारांची गोची केली जात आहे. त्यामुळे राजकीय मंडळींना यातुन बोध घ्यावा लागणार आहे.

मुरगुडमधील सभेकडे नजरा...

राजू शेट्टी पंधरावडयात दुसऱ्यांदा कागल तालुक्यात येत आहेत. त्यामुळे येथील आंदोलनाची धार तीव्र होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती आतबट्ट्याची झाली आहे. त्यामुळे शेट्टी यांनी मुरगुड मधील सभेत चितावणी दिली तर येथील तरुण आक्रमक होवून आंदोलन तीव्र करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे येथील जाणकारांतून बोलले जात आहे.

टॅग्स :kagal-acकागल