शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीला अशुद्ध पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST

निपाणी : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना दुसरीकडे निपाणीला अळ्या मिश्रित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, यामुळे ...

निपाणी : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना दुसरीकडे निपाणीला अळ्या मिश्रित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन महिन्यापूर्वी चौकशी न करता खराब वाळू घातल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन विरोधी गटाचे नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, गेल्या आठवड्यापासून शहर आणि उपनगरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पसरली आहे. त्याशिवाय नळाद्वारे येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे आजाराचे रुग्णही वाढत चालले आहे. ४ फेब्रुवारी २१ रोजी चिक्कोडी येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून शुद्धीकरण केंद्रातील वाळू बदलण्याच्या कामाच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यात आली असून ते योग्य झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तरीसुद्धा शहरवासीयांना गढूळ पाण्यासह अळ्या मिश्रित पाणी का प्यावे लागत आहे. अळ्या मिश्रित पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यावर नगरपालिका आयुक्तांनी संबंधितांना नोटीस बजावून काम योग्य नसल्याचे म्हटले आहे.

कोरोना काळात संसर्ग रोखण्यासह शुद्ध पाणीपुरवठा करणे पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून इतर कामे करण्यातच कारभारी मंडळी व्यस्त आहेत. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण असा सवालही शहरवासीय व्यक्त करत आहेत. तरी सत्ताधारी व संबंधित अधिकाऱ्यांनी शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य जपण्याची मागणी करण्यात आली आहे.