शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वृक्षारोपणातील चुका तत्काळ सुधारा : आयुक्तांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:11 IST

कोल्हापूर : शहराच्या विविध भागातील हरितपट्ट्या केंद्र सरकार पुरस्कृत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना वृक्षमित्र, मनपा अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांच्या संयुक्त सहमतीद्वारेच यापुढे वृक्ष लागवड

ठळक मुद्देसंयुक्त सहमतीनेच यापुढे वृक्षारोपण करण्याचा महापालिकेचा निर्णय

कोल्हापूर : शहराच्या विविध भागातील हरितपट्ट्या केंद्र सरकार पुरस्कृत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना वृक्षमित्र, मनपा अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांच्या संयुक्त सहमतीद्वारेच यापुढे वृक्ष लागवड करण्याचा निर्णय शनिवारी महानगरपालिका प्रशासनाने घेतला. आतापर्यंत करण्यात आलेल्या वृक्षारोपणात ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या तत्काळ सुधाराव्यात तसेच वृक्षमित्रांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, अशा सूचना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी संबंधितांना दिल्या.

कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून मिळालेल्या निधीतून जे वृक्षारोपण केले जात आहे ते अशास्त्रीय पद्धतीने केले जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केले जात आहे या घटनेकडे ‘लोकमत’ने मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आयुक्त अभिजित चौधरी यांनी शनिवारी दुपारी या योजनेतून केल्या जात असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजल्यापासून टेंबलाई टेकडी, टाकाळा, मंगेशकरनगर व त्रिमूर्ती कॉलनी साळोखेनगर येथे केलेल्या वृक्षारोपणाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.यावेळी आयुक्त चौधरी यांच्यासोबत जैवविविधता समितीचे सदस्य डॉ. मधुकर बाचुळकर, अनिल चौगले, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रकल्प अधिकारी अनुराधा वांडरे, ठेकेदार निसर्ग लॅन्डस्केपचे अजय फडतडे, सल्लागार कंपनीचे नागेश देशपांडे व प्रिया देशपांडे होते. या सर्वांनी अडीच तासाहून अधिक काळ पाहणी केली. वृक्ष लागवड करताना काही चुका झाल्याचे या पाहणीवेळी स्पष्ट झाले.

चार ठिकाणी केलेल्या पाहणीवेळी काही ठिकाणी जवळजवळ झाडे लावली आहेत. मोठ्या झाडाखाली त्याच प्रकारची मोठी झाडे लावली गेली असल्याचे दिसून आले. यामुळे निकषांचे उल्लंघन झालेली सुमारे १५० ते २०० झाडांचे पुनर्ररोपण करावे लागणार आहे. मंगेशकरनगर परिसरात मनपाच्या जागेत सहा झोपड्यांचे अतिक्रमण झाले असून, त्या तेथून हटवून ही झाडे तेथे लावणार आहेत. मंगेशकरनगर येथे बेलाची झाडे मोठ्या प्रमाणात लावण्याच्या सूचना यावेळी सर्वांनी केल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. यापुढे टाकाळा, रंकाळा, सह्याद्री कॉलनी-राजेंद्रनगर, फुलेवाडी, घाटगे कॉलनी अशा ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना जैवविविधता समिती सदस्य, मनपा अधिकारी, ठेकेदार, सल्लागार यांनी संयुक्तपणे वृक्षारोपणाचा आराखडा तयार करावा आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. केलेल्या नियोजनाप्रमाणे वृक्षलागवड केली जाते का, याची पाहणीही संयुक्तपणे केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली.योग्य झाडे, दर्जा चांगलामनपा प्रशासनाने केलेल्या वृक्षारोपणात काही ठिकाणी त्रुटी दिसून आल्या असल्या तरी त्या दुरुस्त करण्यासारख्या आहेत. लागवड करण्यात आलेले वृक्ष योग्य आणि चांगल्या दर्जाचे आहेत. त्याची वाढसुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आहे. झाडे जगविण्याकरिता पाण्याचीही सोय ठेकेदाराने चांगली केली आहे, अशी माहिती जैवविविधता समितीचे सदस्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ठिबक सिंचनची व्यवस्थादाट वृक्षारोपण झाल्यानंतर लावलेले सर्व वृक्ष जगविण्याची एक वर्षाची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यामुळे ठेकेदाराने स्वत:च्या खर्चातून सर्व ठिकाणी ठिबक सिंचन योजना कार्यान्वित केली आहे. ठेकेदारावर ऐंशी टक्के वृक्ष जगविली पाहिजेत असे बंधन आहे.असा आहे वृक्ष लागवडीचा कार्यक्रमसन २०१५-१६ सालात २८०० मोठ्या वृक्षांपैकी १५०० वृक्ष लावले. उर्वरित वृक्ष लावण्यास जागा उपलब्ध झालेली नाही. २८०० शोभिवंत वृक्ष लावायचे असून, जागा उपलब्ध नसल्यामुळे काम अपूर्ण आहे.सन २०१६-१७ सालात मंगेशकरनगरात १०००, टेंबलाई परिसरात ६०००, तर त्रिमूर्ती कॉलनी साळोखेनगर येथे१९०० वृक्ष लावण्यात आले.सन २०१७-१८ सालात दहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, जागेअभावी एकही वृक्ष लावण्यात आलेला नाही.सन २०१८-१९ सालाकरिता अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याकरिता सह्याद्री कॉलनी राजेंद्रनगर, टाकाळा, रंकाळा, फुलेवाडी, घाटगे कॉलनी अशा जागा निश्चित केल्या आहेत. त्याठिकाणी वृक्ष लावले जातील.