शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणातील चुका तत्काळ सुधारा : आयुक्तांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:11 IST

कोल्हापूर : शहराच्या विविध भागातील हरितपट्ट्या केंद्र सरकार पुरस्कृत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना वृक्षमित्र, मनपा अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांच्या संयुक्त सहमतीद्वारेच यापुढे वृक्ष लागवड

ठळक मुद्देसंयुक्त सहमतीनेच यापुढे वृक्षारोपण करण्याचा महापालिकेचा निर्णय

कोल्हापूर : शहराच्या विविध भागातील हरितपट्ट्या केंद्र सरकार पुरस्कृत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना वृक्षमित्र, मनपा अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांच्या संयुक्त सहमतीद्वारेच यापुढे वृक्ष लागवड करण्याचा निर्णय शनिवारी महानगरपालिका प्रशासनाने घेतला. आतापर्यंत करण्यात आलेल्या वृक्षारोपणात ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या तत्काळ सुधाराव्यात तसेच वृक्षमित्रांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, अशा सूचना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी संबंधितांना दिल्या.

कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून मिळालेल्या निधीतून जे वृक्षारोपण केले जात आहे ते अशास्त्रीय पद्धतीने केले जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केले जात आहे या घटनेकडे ‘लोकमत’ने मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आयुक्त अभिजित चौधरी यांनी शनिवारी दुपारी या योजनेतून केल्या जात असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजल्यापासून टेंबलाई टेकडी, टाकाळा, मंगेशकरनगर व त्रिमूर्ती कॉलनी साळोखेनगर येथे केलेल्या वृक्षारोपणाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.यावेळी आयुक्त चौधरी यांच्यासोबत जैवविविधता समितीचे सदस्य डॉ. मधुकर बाचुळकर, अनिल चौगले, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रकल्प अधिकारी अनुराधा वांडरे, ठेकेदार निसर्ग लॅन्डस्केपचे अजय फडतडे, सल्लागार कंपनीचे नागेश देशपांडे व प्रिया देशपांडे होते. या सर्वांनी अडीच तासाहून अधिक काळ पाहणी केली. वृक्ष लागवड करताना काही चुका झाल्याचे या पाहणीवेळी स्पष्ट झाले.

चार ठिकाणी केलेल्या पाहणीवेळी काही ठिकाणी जवळजवळ झाडे लावली आहेत. मोठ्या झाडाखाली त्याच प्रकारची मोठी झाडे लावली गेली असल्याचे दिसून आले. यामुळे निकषांचे उल्लंघन झालेली सुमारे १५० ते २०० झाडांचे पुनर्ररोपण करावे लागणार आहे. मंगेशकरनगर परिसरात मनपाच्या जागेत सहा झोपड्यांचे अतिक्रमण झाले असून, त्या तेथून हटवून ही झाडे तेथे लावणार आहेत. मंगेशकरनगर येथे बेलाची झाडे मोठ्या प्रमाणात लावण्याच्या सूचना यावेळी सर्वांनी केल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. यापुढे टाकाळा, रंकाळा, सह्याद्री कॉलनी-राजेंद्रनगर, फुलेवाडी, घाटगे कॉलनी अशा ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना जैवविविधता समिती सदस्य, मनपा अधिकारी, ठेकेदार, सल्लागार यांनी संयुक्तपणे वृक्षारोपणाचा आराखडा तयार करावा आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. केलेल्या नियोजनाप्रमाणे वृक्षलागवड केली जाते का, याची पाहणीही संयुक्तपणे केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली.योग्य झाडे, दर्जा चांगलामनपा प्रशासनाने केलेल्या वृक्षारोपणात काही ठिकाणी त्रुटी दिसून आल्या असल्या तरी त्या दुरुस्त करण्यासारख्या आहेत. लागवड करण्यात आलेले वृक्ष योग्य आणि चांगल्या दर्जाचे आहेत. त्याची वाढसुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आहे. झाडे जगविण्याकरिता पाण्याचीही सोय ठेकेदाराने चांगली केली आहे, अशी माहिती जैवविविधता समितीचे सदस्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ठिबक सिंचनची व्यवस्थादाट वृक्षारोपण झाल्यानंतर लावलेले सर्व वृक्ष जगविण्याची एक वर्षाची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यामुळे ठेकेदाराने स्वत:च्या खर्चातून सर्व ठिकाणी ठिबक सिंचन योजना कार्यान्वित केली आहे. ठेकेदारावर ऐंशी टक्के वृक्ष जगविली पाहिजेत असे बंधन आहे.असा आहे वृक्ष लागवडीचा कार्यक्रमसन २०१५-१६ सालात २८०० मोठ्या वृक्षांपैकी १५०० वृक्ष लावले. उर्वरित वृक्ष लावण्यास जागा उपलब्ध झालेली नाही. २८०० शोभिवंत वृक्ष लावायचे असून, जागा उपलब्ध नसल्यामुळे काम अपूर्ण आहे.सन २०१६-१७ सालात मंगेशकरनगरात १०००, टेंबलाई परिसरात ६०००, तर त्रिमूर्ती कॉलनी साळोखेनगर येथे१९०० वृक्ष लावण्यात आले.सन २०१७-१८ सालात दहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, जागेअभावी एकही वृक्ष लावण्यात आलेला नाही.सन २०१८-१९ सालाकरिता अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याकरिता सह्याद्री कॉलनी राजेंद्रनगर, टाकाळा, रंकाळा, फुलेवाडी, घाटगे कॉलनी अशा जागा निश्चित केल्या आहेत. त्याठिकाणी वृक्ष लावले जातील.