शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

एकजुटीने उमटले शाहू विचारांचे प्रतिबिंब; नव्वद समाजांचा ऐक्य स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:46 IST

कोल्हापूर : विविध समाजांच्या एकजुटीने समतेच्या या करवीरनगरीत रविवारी रात्री ‘ऐक्य स्नेहमेळाव्या’तून शाहू विचारांचे प्रतिबिंब उमटले. यातून सामाजिक समतेचा ...

कोल्हापूर : विविध समाजांच्या एकजुटीने समतेच्या या करवीरनगरीत रविवारी रात्री ‘ऐक्य स्नेहमेळाव्या’तून शाहू विचारांचे प्रतिबिंब उमटले. यातून सामाजिक समतेचा संदेश देत एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यातून सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचे काम करण्यात आले आहे, असे मत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले. गेले चार दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा समारोप झाला.मराठा महासंघातर्फे आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवात सायंंकाळी दसरा चौकातील मैदानावर कोल्हापुरातील ९० समाजांचा ऐक्य स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून शाहू छत्रपती उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत पी. बी. पवार, वसंतराव मुळीक, बबन रानगे, मारुतीराव कातवरे, कादर मलबारी, अशोक भंडारे, रमेश तनवाणी, गणपतराव बागडी, एस. पी. कांबळे, हसन देसाई, उमेश पोर्लेकर, अनिल गिरी, दिलीप ओतारी, शिवाजी कोरवी, दिलीप भुर्के, दीपक पोलादे, मनीष झंवर, सोमनाथ घोडेराव, सरलाताई पाटील, रामसिंग रजपूत, सुखदेव बुध्याळकर, अशोक माळी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विविध समाजांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. शाहू छत्रपती म्हणाले, काही वेळेला समाजासमाजांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रकार होतात; त्यामुळे सर्व समाजांनी एकदिलाने राहण्याची गरज आहे. त्यासाठी ‘ऐक्य स्नेहमेळावा’ मार्गदर्शक आहे. असेच विचार राजर्षी शाहू महाराजांचे होते. त्याची जपणूक करण्याचे काम होत आहे. पी. बी. पवार म्हणाले, समाजासमाजांतील वाद हे देशाला घातक आहेत; त्यामुळे महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने आता पुन्हा रुजविण्याची गरज आहे. शाहूंच्या विचारांचा वारसा या ऐक्य मेळाव्याच्या निमित्ताने जपला आहे.मुळीक म्हणाले, महोत्सवाच्या माध्यमातून वर्तमानात जाऊन भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. यातून नक्कीच विचारांचा जागर होऊन नव्या पिढीला योग्य दिशा मिळू शकेल. यावेळी शशिकांत पाटील, अवधूत पाटील, दिलीप पोवार, आदी उपस्थित होते.मराठा वधू-वर मेळाव्यातून सुसंवाददरम्यान, महोत्सवात सकाळी झालेल्या मराठा वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये कोल्हापूर, सांगलीसह सीमा भागातील पालक व विवाहेच्छुक युवक-युवती आले होते. यावेळी १८० जणांची नोंदणी झाली. विवाह जुळताना येणाºया आडनावांपासून कुंडली, नोंदणी, आदी विषयांमधील अडचणींबाबत पालकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न यावेळी झाला.ज्ञाती बांधवांनी दिल्या भेटीमहोत्सवात दुपारच्या सत्रात बुलडाणा, कºहाड, सांगली, सातारा येथील ज्ञाती बांधवांनी भेट दिली. यामध्ये खामगाव (जि. बुलडाणा) येथील राजेश मुळीक यांच्यासह २0हून अधिक जणांनी या ठिकाणी येऊन खामगाव येथे झालेल्या ऐतिहासिक राजर्षी शाहूंच्या शिक्षण परिषदेच्या आठवणी ताज्या केल्या.