शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

एकजुटीने उमटले शाहू विचारांचे प्रतिबिंब; नव्वद समाजांचा ऐक्य स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:46 IST

कोल्हापूर : विविध समाजांच्या एकजुटीने समतेच्या या करवीरनगरीत रविवारी रात्री ‘ऐक्य स्नेहमेळाव्या’तून शाहू विचारांचे प्रतिबिंब उमटले. यातून सामाजिक समतेचा ...

कोल्हापूर : विविध समाजांच्या एकजुटीने समतेच्या या करवीरनगरीत रविवारी रात्री ‘ऐक्य स्नेहमेळाव्या’तून शाहू विचारांचे प्रतिबिंब उमटले. यातून सामाजिक समतेचा संदेश देत एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यातून सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचे काम करण्यात आले आहे, असे मत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले. गेले चार दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा समारोप झाला.मराठा महासंघातर्फे आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवात सायंंकाळी दसरा चौकातील मैदानावर कोल्हापुरातील ९० समाजांचा ऐक्य स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून शाहू छत्रपती उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत पी. बी. पवार, वसंतराव मुळीक, बबन रानगे, मारुतीराव कातवरे, कादर मलबारी, अशोक भंडारे, रमेश तनवाणी, गणपतराव बागडी, एस. पी. कांबळे, हसन देसाई, उमेश पोर्लेकर, अनिल गिरी, दिलीप ओतारी, शिवाजी कोरवी, दिलीप भुर्के, दीपक पोलादे, मनीष झंवर, सोमनाथ घोडेराव, सरलाताई पाटील, रामसिंग रजपूत, सुखदेव बुध्याळकर, अशोक माळी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विविध समाजांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. शाहू छत्रपती म्हणाले, काही वेळेला समाजासमाजांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रकार होतात; त्यामुळे सर्व समाजांनी एकदिलाने राहण्याची गरज आहे. त्यासाठी ‘ऐक्य स्नेहमेळावा’ मार्गदर्शक आहे. असेच विचार राजर्षी शाहू महाराजांचे होते. त्याची जपणूक करण्याचे काम होत आहे. पी. बी. पवार म्हणाले, समाजासमाजांतील वाद हे देशाला घातक आहेत; त्यामुळे महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने आता पुन्हा रुजविण्याची गरज आहे. शाहूंच्या विचारांचा वारसा या ऐक्य मेळाव्याच्या निमित्ताने जपला आहे.मुळीक म्हणाले, महोत्सवाच्या माध्यमातून वर्तमानात जाऊन भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. यातून नक्कीच विचारांचा जागर होऊन नव्या पिढीला योग्य दिशा मिळू शकेल. यावेळी शशिकांत पाटील, अवधूत पाटील, दिलीप पोवार, आदी उपस्थित होते.मराठा वधू-वर मेळाव्यातून सुसंवाददरम्यान, महोत्सवात सकाळी झालेल्या मराठा वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये कोल्हापूर, सांगलीसह सीमा भागातील पालक व विवाहेच्छुक युवक-युवती आले होते. यावेळी १८० जणांची नोंदणी झाली. विवाह जुळताना येणाºया आडनावांपासून कुंडली, नोंदणी, आदी विषयांमधील अडचणींबाबत पालकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न यावेळी झाला.ज्ञाती बांधवांनी दिल्या भेटीमहोत्सवात दुपारच्या सत्रात बुलडाणा, कºहाड, सांगली, सातारा येथील ज्ञाती बांधवांनी भेट दिली. यामध्ये खामगाव (जि. बुलडाणा) येथील राजेश मुळीक यांच्यासह २0हून अधिक जणांनी या ठिकाणी येऊन खामगाव येथे झालेल्या ऐतिहासिक राजर्षी शाहूंच्या शिक्षण परिषदेच्या आठवणी ताज्या केल्या.