शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीने उमटले शाहू विचारांचे प्रतिबिंब; नव्वद समाजांचा ऐक्य स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:46 IST

कोल्हापूर : विविध समाजांच्या एकजुटीने समतेच्या या करवीरनगरीत रविवारी रात्री ‘ऐक्य स्नेहमेळाव्या’तून शाहू विचारांचे प्रतिबिंब उमटले. यातून सामाजिक समतेचा ...

कोल्हापूर : विविध समाजांच्या एकजुटीने समतेच्या या करवीरनगरीत रविवारी रात्री ‘ऐक्य स्नेहमेळाव्या’तून शाहू विचारांचे प्रतिबिंब उमटले. यातून सामाजिक समतेचा संदेश देत एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यातून सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचे काम करण्यात आले आहे, असे मत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले. गेले चार दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा समारोप झाला.मराठा महासंघातर्फे आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवात सायंंकाळी दसरा चौकातील मैदानावर कोल्हापुरातील ९० समाजांचा ऐक्य स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून शाहू छत्रपती उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत पी. बी. पवार, वसंतराव मुळीक, बबन रानगे, मारुतीराव कातवरे, कादर मलबारी, अशोक भंडारे, रमेश तनवाणी, गणपतराव बागडी, एस. पी. कांबळे, हसन देसाई, उमेश पोर्लेकर, अनिल गिरी, दिलीप ओतारी, शिवाजी कोरवी, दिलीप भुर्के, दीपक पोलादे, मनीष झंवर, सोमनाथ घोडेराव, सरलाताई पाटील, रामसिंग रजपूत, सुखदेव बुध्याळकर, अशोक माळी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विविध समाजांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. शाहू छत्रपती म्हणाले, काही वेळेला समाजासमाजांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रकार होतात; त्यामुळे सर्व समाजांनी एकदिलाने राहण्याची गरज आहे. त्यासाठी ‘ऐक्य स्नेहमेळावा’ मार्गदर्शक आहे. असेच विचार राजर्षी शाहू महाराजांचे होते. त्याची जपणूक करण्याचे काम होत आहे. पी. बी. पवार म्हणाले, समाजासमाजांतील वाद हे देशाला घातक आहेत; त्यामुळे महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने आता पुन्हा रुजविण्याची गरज आहे. शाहूंच्या विचारांचा वारसा या ऐक्य मेळाव्याच्या निमित्ताने जपला आहे.मुळीक म्हणाले, महोत्सवाच्या माध्यमातून वर्तमानात जाऊन भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. यातून नक्कीच विचारांचा जागर होऊन नव्या पिढीला योग्य दिशा मिळू शकेल. यावेळी शशिकांत पाटील, अवधूत पाटील, दिलीप पोवार, आदी उपस्थित होते.मराठा वधू-वर मेळाव्यातून सुसंवाददरम्यान, महोत्सवात सकाळी झालेल्या मराठा वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये कोल्हापूर, सांगलीसह सीमा भागातील पालक व विवाहेच्छुक युवक-युवती आले होते. यावेळी १८० जणांची नोंदणी झाली. विवाह जुळताना येणाºया आडनावांपासून कुंडली, नोंदणी, आदी विषयांमधील अडचणींबाबत पालकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न यावेळी झाला.ज्ञाती बांधवांनी दिल्या भेटीमहोत्सवात दुपारच्या सत्रात बुलडाणा, कºहाड, सांगली, सातारा येथील ज्ञाती बांधवांनी भेट दिली. यामध्ये खामगाव (जि. बुलडाणा) येथील राजेश मुळीक यांच्यासह २0हून अधिक जणांनी या ठिकाणी येऊन खामगाव येथे झालेल्या ऐतिहासिक राजर्षी शाहूंच्या शिक्षण परिषदेच्या आठवणी ताज्या केल्या.