शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

टाकाळा खणीचे पुनर्भरण लवकरच

By admin | Updated: November 26, 2015 00:31 IST

‘झूम’मधील डोंगर हटणार : कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्यास मदत

कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाबरोबरच आता झूम प्रकल्पावर साचून राहिलेला आणि विघटन न होणाऱ्या (इनर्ट मटेरियल) कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच विघटन न होणाऱ्या कचऱ्याद्वारे टाकाळा येथील खणीचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणारा हा कोल्हापुरातील पहिलाच प्रयोग असल्याने तो यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. शहरात दररोज १६० ते १७० टन कचरा निर्माण होत असून, त्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावावी, हा गहन प्रश्न मनपा आरोग्य विभागासमोर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने टोप येथील मोठी खण राज्य सरकारकडून मालकी हक्काने मिळविली; परंतु त्यास स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने आणि हे प्रकरण हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे तोपर्यंत मध्य मार्ग म्हणून शहरातीलच टाकाळा खणीची जागा घेण्यात आली आहे. याही खणीत कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध होता. त्यासाठी आंदोलनही झाले. काही गोष्टींची हमी दिल्यानंतर आंदोलन थांबविले गेले. आता टाकाळा खणीत विघटन न होणारा कचरा टाकला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण खणीभोवती सिमेंटची भिंत उभी करण्यात आली आहे. या खणीत कचरा टाकण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे बेड तयार करण्यात येणार आहेत. तसेच त्यातून काही प्रसंगी गॅस तयार झाला तर तो बाहेर पडण्यासाठी पाईप टाकल्या जाणार आहेत. कचऱ्याचा एक थर झाल्यानंतर त्यावर मुरुमाचा थर अंथरण्यात येऊन त्यावर रोलिंग केले जाणार आहे. त्यामुळे खणीचे पुनर्भरण व्यवस्थित होण्यास मदत होईल. पुनर्भरण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी करावी लागणारी अनुषंगिक कामे सध्या सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहेत. कसबा बावड्यालगत असलेल्या झूम प्रकल्पावर सुमारे चार लाख टन कचरा साचून राहिला असून, त्यातील सुमारे दोन ते अडीच लाख टन कचरा हा विघटन न होणारा, तसेच पुनर्भरणास योग्य असलेला कचरा आहे.