शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आत्मीयतेने काम केल्यास अव्वलस्थान कायम राहील

By admin | Updated: August 11, 2014 00:17 IST

पतंगराव कदम : मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे उद्घाटन

कोल्हापूर : राज्याचा वन विभाग देशात अव्वलस्थानी आहे, असा गौरव दिल्लीस्थित केंद्रीय वनविभागाने केला आहे. अशा पद्धतीचे काम आपल्या विभागाने केले आहे. हेच काम आणखी नियोजनपूर्वक केल्यास अव्वलस्थान कायम राहील, असे प्रतिपादन राज्याचे वने व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी केले. ताराबाई पार्क येथील मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कदम म्हणाले, पुणे येथे वन विभागाची अकरा कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी होती. ही कार्यालये आज, रविवारी एकाच छताखाली आणण्याचे काम केले. उद्योग, सहकार आणि शिक्षण या क्षेत्रात काम केल्याने आपल्याला वन विभागाचे काम करताना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे प्रथमच आपण १०० कोटी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यातील ४१ कोटी झाडे लावली. याचबरोबर ७५०० हजार वन कर्मचाऱ्यांना कायम केले. याचबरोबर ताडोबासारख्या जंगलात वाघांची संख्याही २०० च्यावर वाढविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. सिधुदुर्ग जिल्ह्यात कायम कर्नाटकातून हत्ती येत आहेत. यावर नुकसान झालेल्यांच्या निधीतही वाढ केली आहे. वनमंत्री असून आपण साधे दाजीपूर अभयारण्यही पाहिलेले नाही अशी कबुली त्यांनी यावेळी दिली.यापूर्वी दोन लाख दिले जात होते. तर आता पाच लाख रुपये दिले जातात. याचबरोबर वनक्षेत्र २१ टक्कयावरून ३० टक्के करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. उच्च शिक्षित कर्मचारी वर्ग वन विभागाच्या सेवेत आल्याने वन विभागाचा कायापालट झाला आहे. सर्व राज्यात महाराष्ट्र राज्य वन क्षेत्रात आघाडीवर आहे. हे अव्वलस्थान कायम टिकवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी संपुर्ण योगदान दिल्यास हे अव्वलस्थान कायम राहील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी केले. मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश यांनी स्वागत केले.