शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आरक्षण देता येत नसेल तर मराठ्यांची माफी मागा: पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:53 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रामाणिक दिसत आहे. आरक्षण द्यायला जमत नसेल तर त्यांनी संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी व हा फक्त निवडणुकीपुरता जुमला होता, हे सांगावे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले. अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची कमी करण्यामागील हेतू काय? याबाबत ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रामाणिक दिसत आहे. आरक्षण द्यायला जमत नसेल तर त्यांनी संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी व हा फक्त निवडणुकीपुरता जुमला होता, हे सांगावे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले. अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची कमी करण्यामागील हेतू काय? याबाबत त्यांनी सरकारसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न उपस्थित केल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीकास्त्रसोडले.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने उचललेली पावले ही फसवी आणि अप्रमाणिक आहेत. त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही. मराठा आंदोलकांची दिशाभूल करून हा प्रश्न निकाली निघणार नाही. तसेच धनगर समाजालाही सरकारने एक आठवड्यात आरक्षण देतो असे सांगितले होते; परंतु चार वर्षे होत आली तरी काहीच झालेले नाही. आरक्षणासह शेतकरी कर्जमाफी, दूध, साखर याबाबतचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.ते पुढे म्हणाले, अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाबाबत सरकारने हातचलाखी केली आहे. हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी फसवाफसवीची उत्तरे दिली. शिवछत्रपतींच्या पुतळ्याची उंची १६० मीटरवरून कमी करून ती १२६ मीटर केली आहे. पूर्वीच्या प्रस्तावाला मान्यता असताना पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजनानंतर हा प्रस्ताव बदलून उंची कमी करण्यात आली. त्यामागील कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. इंदू मिल स्मारकाचे फक्त भूमिपूजन झाले असून पुढे काहीच झालेले नाही. सरकार फक्त निवडणूक ते निवडणूक काम करीत आहे का? याबाबत विचारले असता मुख्यमंत्री उत्तरे देत नाहीत. तसेच विधिमंडळात बोलायला वेळ मिळत नाही. अध्यक्षांकडून तो दिला जात नाही. सरकारचे धोरण हे ग्राहकधार्जिणे व उत्पादकविरोधी असून यासाठी एक साखळीच कार्यरत आहे. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, अ‍ॅड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.पाच वर्षांनी नोकरभरती ही प्रक्रिया अयोग्यनोकरभरतीची व रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया ही दरवर्षी झाली पाहिजे. एकदम पाच वर्षांनी भरती करणे अयोग्य आहे; कारण तोपर्यंत संबंधित उमेदवारांची वये उलटून गेलेली असतात. त्यामुळे ते नोकरीला मूकतात. या सरकारने पाच वर्षांनी नोकरभरती करण्याचे जाहीर करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.‘सिडको’प्रश्नी चौकशीपावसाळी अधिवेशनात सिडको जमीन घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रथमच न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्याप्रमाणे गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणीही खुली चौकशी झाली असती तर मंत्री प्रकाश मेहतांसह संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असता, असे चव्हाण यांनी सांगितले.गडकरी-फडणवीसांनी आरक्षण देणार नाही, हे जाहीर करावेमुख्यमंत्री फडणवीस आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगतात, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आरक्षण मिळाले तरी पुरेशा नोकºया नसल्याचे सांगतात. दोघांनी मिळून मराठ्यांना आरक्षण देणार नाही, हे जाहीर करावे, असा टोला चव्हाण यांनी हाणला.