शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जमीन मिळाली नाही तर प्रकल्पग्रस्त पुन्हा जंगलातील मूळ गावे गाठणार, वनविभागाला इशारा

By संदीप आडनाईक | Updated: February 4, 2024 15:33 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

कोल्हापूर : चांदोली प्रकल्पग्रस्तांना वाटण्यासाठी वन विभागाची २१५ आणि ३१८ हेक्टर जमीन देण्याचे प्रलंबित आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या आठवड्यात दिल्लीला जाऊन मंजुरी आणतो असे म्हटले, मात्र प्रकल्पग्रस्तांचा संयम संपला आहे. ते आता मूळ गावे गाठतील असा इशारा आंदोलकांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

येथील वनसंरक्षक कार्यालयासमोर सहा दिवसांपासून चांदोली प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. राजू शेट्टी यांच्यासह अनेक संस्था आणि व्यक्तींनी आंदोलकांची भेट घेतली. शेट्टी म्हणाले, देशातील आणि राज्यातील हे सरकार मुर्दाड आहे. बड्या लोकांच्या हितासाठी संसद आणि विधानसभा रात्रभर चालवतात, त्यांच्याकडे पन्नास आमदारांना मोजता न येणारी रक्कम देण्याइतका पैसा आहे, परंतु शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठक बोलावून प्रश्न सोडवायला वेळ नाही. त्यांना वठणीवर आणले पाहिजे.

डॉ. पाटणकर यांनी कोल्हापूर पाटबंधारे मंडळाने पाठवलेल्या जमिनीस सिंचनाच्या सुविधाबाबतचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द केल्याचा उल्लेख चुकीचा असून तो दुरुस्ती करुन फेर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली. एक लाख पासष्ट हजार रुपये घर बांधणी अनुदानाची मागणी मान्य करुनच शासनाने आमच्या मूळ गावाकडे यावे, आम्ही तेथे झोपड्या बांधून राहणार आहे असे बजावले. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई, ॲड. शरद जांभळे, हरिश्चंद्र दळवी, बाजीराव पन्हाळकर, आनंदा सपकाळ, पी. डी. लाड, एस.आर.पाटील, जयसिंग पन्हाळकर, संतोष गोटल, मारुती पाटील, दाऊद पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.

यांनी दिला पाठिंबाया आंदोलकांना सातारा आणि सांगली जिल्ह्यातील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर या जिल्ह्यातील आंदोलकही सहभागी होतील असा इशारा दिला. यावेळी नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीचे डॉ. सुनील पाटील, आनंद कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी पाठिंबा दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर