शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मिळाली नाही तर प्रकल्पग्रस्त पुन्हा जंगलातील मूळ गावे गाठणार, वनविभागाला इशारा

By संदीप आडनाईक | Updated: February 4, 2024 15:33 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

कोल्हापूर : चांदोली प्रकल्पग्रस्तांना वाटण्यासाठी वन विभागाची २१५ आणि ३१८ हेक्टर जमीन देण्याचे प्रलंबित आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या आठवड्यात दिल्लीला जाऊन मंजुरी आणतो असे म्हटले, मात्र प्रकल्पग्रस्तांचा संयम संपला आहे. ते आता मूळ गावे गाठतील असा इशारा आंदोलकांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

येथील वनसंरक्षक कार्यालयासमोर सहा दिवसांपासून चांदोली प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. राजू शेट्टी यांच्यासह अनेक संस्था आणि व्यक्तींनी आंदोलकांची भेट घेतली. शेट्टी म्हणाले, देशातील आणि राज्यातील हे सरकार मुर्दाड आहे. बड्या लोकांच्या हितासाठी संसद आणि विधानसभा रात्रभर चालवतात, त्यांच्याकडे पन्नास आमदारांना मोजता न येणारी रक्कम देण्याइतका पैसा आहे, परंतु शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठक बोलावून प्रश्न सोडवायला वेळ नाही. त्यांना वठणीवर आणले पाहिजे.

डॉ. पाटणकर यांनी कोल्हापूर पाटबंधारे मंडळाने पाठवलेल्या जमिनीस सिंचनाच्या सुविधाबाबतचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द केल्याचा उल्लेख चुकीचा असून तो दुरुस्ती करुन फेर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली. एक लाख पासष्ट हजार रुपये घर बांधणी अनुदानाची मागणी मान्य करुनच शासनाने आमच्या मूळ गावाकडे यावे, आम्ही तेथे झोपड्या बांधून राहणार आहे असे बजावले. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई, ॲड. शरद जांभळे, हरिश्चंद्र दळवी, बाजीराव पन्हाळकर, आनंदा सपकाळ, पी. डी. लाड, एस.आर.पाटील, जयसिंग पन्हाळकर, संतोष गोटल, मारुती पाटील, दाऊद पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.

यांनी दिला पाठिंबाया आंदोलकांना सातारा आणि सांगली जिल्ह्यातील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर या जिल्ह्यातील आंदोलकही सहभागी होतील असा इशारा दिला. यावेळी नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीचे डॉ. सुनील पाटील, आनंद कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी पाठिंबा दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर