शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गॅस कनेक्शन नावावर नसेल, तर मोफत सिलिंडरही नाही; महिलांसाठीच्या अन्नपूर्णा योजनेची अट 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 26, 2024 12:57 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबांना लाभ

इंदुमती गणेशकोल्हापूर : घरातील गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर त्या कुटुंबाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अशा दोन निकषांनुसार जिल्ह्यातील एकूण १२ लाख गॅस कनेक्शनधारकांपैकी फक्त अडीच लाख कुटुंबांना वर्षातून तीन मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार आहे.

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक योजना लागू केली असून, पात्र कुटुंबांना वर्षातील तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. त्याची जाहिरात माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याचा जिल्ह्यातील किती महिलांना लाभ होऊ शकतो, हे ‘लोकमत’ने तपासले.केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. जिल्ह्यात १२ लाखांहून अधिक गॅस कनेक्शन आहेत; मात्र त्यापैकी फक्त अडीच लाख गॅस कनेक्शन हे उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत. त्यामुळे एवढ्याच कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर मिळतील.

असे आहेत निकष

  • गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक.
  • पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असावे.
  • ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’स पात्र लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल.
  • एका कुटुंबात (रेशनकार्डनुसार) केवळ एक लाभार्थी पात्र असेल.
  • फक्त १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी आवश्यक.

३१ जुलैपूर्वीचे कनेक्शन पात्रया योजनेसाठी ३१ जुलै २०२४ पूर्वीचे गॅस कनेक्शन ग्राह्य धरले आहेत. ३१ जुलैपूर्वी ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहेत, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता कनेक्शन महिलेच्या नावावर हस्तांतरित करून उपयोग होणार नाही.

पुरुषप्रधानतेचा फटका..जिल्ह्यात ९ लाखांवर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे; पण त्यापैकी फक्त अडीच लाख महिलांना तीन सिलिंडर माेफत मिळतील. समाज कितीही पुढारलेला असला तरी घर, जागेचा सातबारा, बँकांचे खाते, कर्ज, लाइट बिल, पाणी बिल, घरफाळा, गॅस कनेक्शन अशा महत्त्वाच्या बाबी पुरुषांच्याच नावे असतात. आता शासनाने योजनांच्या लाभासाठी अट घातल्याने महिलांच्या नावावर किमान बँक खाते तरी उघडले जात आहे, अन्यथा पूर्वी महिलांची खातीदेखील कमी होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाCylinderगॅस सिलेंडरGovernmentसरकार