शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आरक्षण जमत नसेल तर मानसन्मान तरी द्या - यशोमती ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 01:52 IST

कोल्हापुरात महिला शक्तीचा जागर

कोल्हापूर : महिलेला जात नसते, महिला ही महिलाच असते. तिला आरक्षण देणे जमत नसेल तर देऊ नका, मात्र तिला मानसन्मान तरी द्या. अशी उद्विग्नता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ व जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर राज्यस्तरीय महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. मेळाव्यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. ‘ताराराणी प्राधान्य कार्ड’चे वाटप, पोषण पंधरवड्याचा प्रारंभ यावेळी करण्यात आला.

‘इतकु दिवस बोललो ओढ्यातील ओढात...’ या कवितेने मेळाव्यातील महिलांना बोलते करत मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, तुम्ही बोलायला शिकला पाहिजे, मनातील जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या मेळाव्यांचा उपयोग नाही. मुळात स्वत:लाच दोष देत बसला तर खच्चीकरण होईल, संसाराचा गाडा हाकत असताना तुमच्यासाठीही थोडा वेळ द्या. ‘रोज एक नियम करा स्वत:वर प्रेम करा....नाहीचे पाढे बंद करा आणि एकटी बाहेर पडा’ असे आवाहनही त्यांनी केले.

‘श्रावणबाळ’ची पेन्शन २ हजार भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेकांच्या पेन्शन बंद केल्या, त्या पुन्हा सुरू करणार असून, उत्पन्नाची मर्यादा २१ हजारांवरून ५० हजार रुपये करणार आहे. त्याचबरोबर परित्यक्ता महिलेचा मुलगा २५ वर्षांचा झाला तरी त्याला नोकरी लागेपर्यंत पेन्शन सुरू ठेवणार असून, आता १ हजारावरून २ हजार रुपये पेन्शन करणार असल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.‘शिकाऊ मुलींना १० हजार विद्यावेतन’कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दहावी व बारावी शिकलेल्या मुलींना जोपर्यंत नोकरी लागत नाही, तोपर्यंत १० हजार रुपये विद्यावेतन सुरू करण्याचा विचार आहे. शासनाच्या वतीने लवकरच रिक्त पदांच्या ५० टक्के भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यामध्ये मुलींना प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.