शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरक्षण जमत नसेल तर मानसन्मान तरी द्या - यशोमती ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 01:52 IST

कोल्हापुरात महिला शक्तीचा जागर

कोल्हापूर : महिलेला जात नसते, महिला ही महिलाच असते. तिला आरक्षण देणे जमत नसेल तर देऊ नका, मात्र तिला मानसन्मान तरी द्या. अशी उद्विग्नता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ व जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर राज्यस्तरीय महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. मेळाव्यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. ‘ताराराणी प्राधान्य कार्ड’चे वाटप, पोषण पंधरवड्याचा प्रारंभ यावेळी करण्यात आला.

‘इतकु दिवस बोललो ओढ्यातील ओढात...’ या कवितेने मेळाव्यातील महिलांना बोलते करत मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, तुम्ही बोलायला शिकला पाहिजे, मनातील जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या मेळाव्यांचा उपयोग नाही. मुळात स्वत:लाच दोष देत बसला तर खच्चीकरण होईल, संसाराचा गाडा हाकत असताना तुमच्यासाठीही थोडा वेळ द्या. ‘रोज एक नियम करा स्वत:वर प्रेम करा....नाहीचे पाढे बंद करा आणि एकटी बाहेर पडा’ असे आवाहनही त्यांनी केले.

‘श्रावणबाळ’ची पेन्शन २ हजार भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेकांच्या पेन्शन बंद केल्या, त्या पुन्हा सुरू करणार असून, उत्पन्नाची मर्यादा २१ हजारांवरून ५० हजार रुपये करणार आहे. त्याचबरोबर परित्यक्ता महिलेचा मुलगा २५ वर्षांचा झाला तरी त्याला नोकरी लागेपर्यंत पेन्शन सुरू ठेवणार असून, आता १ हजारावरून २ हजार रुपये पेन्शन करणार असल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.‘शिकाऊ मुलींना १० हजार विद्यावेतन’कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दहावी व बारावी शिकलेल्या मुलींना जोपर्यंत नोकरी लागत नाही, तोपर्यंत १० हजार रुपये विद्यावेतन सुरू करण्याचा विचार आहे. शासनाच्या वतीने लवकरच रिक्त पदांच्या ५० टक्के भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यामध्ये मुलींना प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.