शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संयम सुुटला तर संघर्ष

By admin | Updated: July 18, 2015 00:58 IST

कार्यकर्त्यांचा इशारा : ... मग जाहीर का करत नाही ?

 कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांचा शोध लागावा म्हणून आम्ही आतापर्यंत संयम बाळगला. प्रत्येकवेळी तपास सुरू आहे, धागेदोरे सापडलेत, असे सांगितले जाते; परंतु तपास काय लागला, हे जाहीर होत नाही. त्यामुळे आम्ही किती दिवस वाट पाहायची? धागेदोरे सापडलेत तर मग जाहीर का करत नाहीत? असे प्रश्न करत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचा संयम सुुटला, तर संघर्ष अटळ आहे’, अशा इशारा राज्य सरकार व पोलीस यंत्रणेला शुक्रवारी ‘भाकप’च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. डॉ. दाभोळकर व अ‍ॅड. पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीवर राहण्याचा आणि दाभोळकरांच्या खुनानंतर कॉँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या तत्कालीन विरोधी पक्षांना आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. दाभोळकरांचा खून झाल्यानंतर भाजप नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागितला; पण आता गृहमंत्रिपदासह मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे आहे, तर खुनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी केली. ‘भाकप’च्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य दिलीप पवार म्हणाले की, खुनाचा तपास लागावा, मारेकऱ्यांना अटक व्हावी म्हणून आतापर्यंत शांत राहिलो. तपास यंत्रणेस मदत करत राहिलो. पाच महिन्यांनंतरही आम्हाला तपास सुरू आहे, धागेदोरे लागले आहेत, असे सांगितले जाते; पण हे किती दिवस ऐकायचे? तपासाची नेमकी दिशा स्पष्ट करा. पोलीस यंत्रणा काय करीत आह,े हे एकदा कळू दे. जर आरोपी सापडत नसतील, तर हा तपास लागणार नाही, हे तरी सांगून टाका. दाभोळकर, पानसरे यांच्या खुनाचा तपास लागत नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तरीही योग्य पद्धतीने तपास सुरु असल्याचे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा थिल्लरपणा आणि केवळ पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांची टिंगल करण्यातला प्रकार आहे. पोलीस यंत्रणा निव्वळ नाटक, मखलाशी करत असल्याचा आरोप पवार यांनी केला. खून झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले असेल, तर आरोपींपर्यंत पोलिसांनी पोहोचायला काय अडचण आहे. खून झाल्यानंतर मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरील संवादाचे रेकॉर्डिंग करण्यात आले होते का, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. दोन्ही खून हे दहशतवादी कृत्य म्हणून पोलिसांनी जाहीर करावे, अशी मागणी करत, दहशतवादी म्हटले की, त्यांच्या मागे एखादी संघटना असते म्हणूनच या दोन्ही खुनास एक संघटनाच जबाबदार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दररोज आंदोलन करण्यात येईल. यावेळी शहीद दाभोळकर, पानसरे विचार मंच, भाकप, माकप, लाल निशाण पक्ष, श्रमिक प्रतिष्ठान, विद्रोही संघटना, जनता दल, अंनिसंचे कार्यकर्ते सुजाता म्हेत्रे, रमेश वडणगेकर, बाळासो कांबळे, सीमा पाटील, अरुण पाटील, एम. बी. पडवळे, एस. बी. पाटील, धनाजीराव जाधव, बाबा यादव, पंडित ढवळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)