शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज न दिल्यास जिल्हा बँक देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:38 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले नाहीतर जिल्हा बँक त्यांना कर्ज देईल, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी माहिती बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकातून दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज न दिल्यास जिल्हा बँक देणार : भैया मानेइंग्रजीमध्ये शिक्षण झालेल्यांना मराठी काय कळणार, विरोधकांना टोला

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले नाहीतर जिल्हा बँक त्यांना कर्ज देईल, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी माहिती बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकातून दिली.

कर्जमाफी आणि कर्ज वाटपाबाबत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच सगळे स्पष्ट केले आहे. मात्र, ज्यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले आहे, त्यांना मराठी काय समजणार? शेतकऱ्यांसाठी काही तरी करतो हे दाखविताना स्वत:चे हसे होऊ नये, याची काळजी घ्यावी, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.राज्यातील आघाडी सरकारने कर्जमुक्ती योजना आणून शेतकऱ्यांना अडचणीत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाचे संकट आणि तांत्रिक अडचणीमुळे ७९०४ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ४६ कोटी रुपये आलेले नाहीत. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचे ३० कोटी, तर जिल्हा बँकेशी संलग्न शेतकऱ्यांचे १६ कोटी रुपये येणे बाकी आहे.

हे शेतकरी तांत्रिकदृष्ट्या थकीत दिसत असले तरी खरीप हंगाम डोळ्यांसमोर ठेवून त्यांना कर्जपुरवठा करण्याची सूचना राज्यमंत्री मंडळाने केली होती. कर्जमाफीचे पैसे आलेले नाहीत त्या बँकांना सरकारने हमी दिली आहे. तरीही काही बँका आडमुठी धोरण घेत असल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.

जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले नाहीतर जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मागे उभी राहील. मात्र, विनाकारण कोणतीही समस्या नसताना प्रसिद्धीसाठी अज्ञान प्रकट करू नये, असेही भैया माने यांनी पत्रकात म्हटले आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये, दोन लाखांवरील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेची शासनाने अगोदरच घोषणा केली आहे. दोन्ही कर्जदार शेतकऱ्यांनी आपले कर्ज ३० जूनपर्यंत परतफेड केले पाहिजे, असे आवाहनही माने यांनी केले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर