शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज न दिल्यास जिल्हा बँक देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:38 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले नाहीतर जिल्हा बँक त्यांना कर्ज देईल, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी माहिती बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकातून दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज न दिल्यास जिल्हा बँक देणार : भैया मानेइंग्रजीमध्ये शिक्षण झालेल्यांना मराठी काय कळणार, विरोधकांना टोला

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले नाहीतर जिल्हा बँक त्यांना कर्ज देईल, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी माहिती बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकातून दिली.

कर्जमाफी आणि कर्ज वाटपाबाबत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच सगळे स्पष्ट केले आहे. मात्र, ज्यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले आहे, त्यांना मराठी काय समजणार? शेतकऱ्यांसाठी काही तरी करतो हे दाखविताना स्वत:चे हसे होऊ नये, याची काळजी घ्यावी, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.राज्यातील आघाडी सरकारने कर्जमुक्ती योजना आणून शेतकऱ्यांना अडचणीत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाचे संकट आणि तांत्रिक अडचणीमुळे ७९०४ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ४६ कोटी रुपये आलेले नाहीत. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचे ३० कोटी, तर जिल्हा बँकेशी संलग्न शेतकऱ्यांचे १६ कोटी रुपये येणे बाकी आहे.

हे शेतकरी तांत्रिकदृष्ट्या थकीत दिसत असले तरी खरीप हंगाम डोळ्यांसमोर ठेवून त्यांना कर्जपुरवठा करण्याची सूचना राज्यमंत्री मंडळाने केली होती. कर्जमाफीचे पैसे आलेले नाहीत त्या बँकांना सरकारने हमी दिली आहे. तरीही काही बँका आडमुठी धोरण घेत असल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.

जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले नाहीतर जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मागे उभी राहील. मात्र, विनाकारण कोणतीही समस्या नसताना प्रसिद्धीसाठी अज्ञान प्रकट करू नये, असेही भैया माने यांनी पत्रकात म्हटले आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये, दोन लाखांवरील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेची शासनाने अगोदरच घोषणा केली आहे. दोन्ही कर्जदार शेतकऱ्यांनी आपले कर्ज ३० जूनपर्यंत परतफेड केले पाहिजे, असे आवाहनही माने यांनी केले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर