शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

लढा पुस्तकात न उतरल्यास गुन्हा : राजन गवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:27 IST

आजरा : सामान्य माणसाचं जगणं सुसह्य व्हावे म्हणून चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी लढे उभा केले, अशा कार्यकर्त्यांचे लढे पुस्तकात लिहिले नसल्याची खंत व्यक्त करून यापुढेही न लिहिल्यास आमच्या हातून गुन्हा ठरेल, अशा शब्दांत डॉ. राजन गवसे यांनी खंत व्यक्त केली. आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात कॉ. संपत देसाईलिखित ‘एका लढ्याची ...

आजरा : सामान्य माणसाचं जगणं सुसह्य व्हावे म्हणून चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी लढे उभा केले, अशा कार्यकर्त्यांचे लढे पुस्तकात लिहिले नसल्याची खंत व्यक्त करून यापुढेही न लिहिल्यास आमच्या हातून गुन्हा ठरेल, अशा शब्दांत डॉ. राजन गवसे यांनी खंत व्यक्त केली. आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात कॉ. संपत देसाईलिखित ‘एका लढ्याची यशोगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूरचे आयुक्त आप्पासाहेब धुळाज होते.यावेळी डॉ. गवस म्हणाले, शंकर धोंडी पाटील, काका देसाई, अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, आदींनी आपले आयुष्य खर्च केले. यांच्या लढ्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे आम्ही गुन्हेगार आहोत. मात्र, ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ हे पुस्तक इतिहासात नोंद होईल. मध्यवर्गाची घरापासून नाळ तुटली, तशी सामान्य माणसापासूनही तुटली. गांधीशिवाय पर्याय नसून गांधी, आंबेडकर, मार्क्सवाद यांच्या चांगल्या तत्त्वांची बांधणी झाली तरच यापुढे चळवळी टिकणार आहेत.कॉ. संपत देसाई म्हणाले, चित्रीचा लढा डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, कॉ. अशोक जाधव, कॉ. संजय तर्डेकर, आदी कार्यकर्त्यांमुळे यशस्वी झाला. यावेळी कवी व अजय कारंड, सामाजिक कार्यकर्ते महेश पेडणेकर, प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे, प्रा. राजभाऊ शिरगुप्पे, प्रा. सुनील शिंत्रे, सुधीर देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, एम. एल. चौगुले, अंकुश कदम, मायकेल फर्नांडिस, रावसाहेब देसाई, प्रकाश मोरस्कर, नितीन पाटील, आदी उपस्थित होते.प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी स्वागत केले. रवी शेंडे यांनी प्रास्ताविक केले.