शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांनी पुढाकार घेतल्यास कोंडी फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:34 IST

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतल्यास उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटू शकतो. कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यासाठी चर्चा सुरू करण्याची गरज आहे. आंदोलन चिघळल्यावर हे करण्यापेक्षा संवादाची प्रक्रिया सुरू होण्याची आवश्यकता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत टनास ३४०० रुपयांची पहिली उचल मागितली आहे.संघटनेचे नेते ...

ठळक मुद्देपहिल्या उचलीचा तिढा :गतवर्षी चर्चेतून मार्ग काढला होता; संवादाची प्रक्रिया सुरू होण्याची गरजएफआरपी व टनास १७५ रुपये जादा असा तोडगा निघाला

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतल्यास उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटू शकतो. कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यासाठी चर्चा सुरू करण्याची गरज आहे. आंदोलन चिघळल्यावर हे करण्यापेक्षा संवादाची प्रक्रिया सुरू होण्याची आवश्यकता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत टनास ३४०० रुपयांची पहिली उचल मागितली आहे.

संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मागणीमध्ये पुढेमागे व्हायला तयार असल्याचे जाहीर केले आहे; परंतु या प्रश्नात कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांना एकत्र आणायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी संघटनेने एकरकमी ३२०० रुपयांची मागणी केल्यावर पालकमंत्री पाटील यांनीच पुढाकार घेतला व चर्चा घडवून आणली. त्यामध्ये एफआरपी व टनास १७५ रुपये जादा असा तोडगा निघाला. यंदाच्या ऊस परिषदेत शेट्टी यांनी मुख्यत: भाजपावर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच सडकून टीका केली आहे.

त्यामुळे शेट्टी व भाजपा यांच्यामधील दरी वाढली आहे. हे जरी खरे असले तरी जिल्ह्णातील लाखो शेतकºयांच्या जीवनमरणाशी संबंधित प्रश्न म्हणून पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. दादांनी बैठक घेऊन काही तोडगा काढला तर तो सर्वमान्य होऊ शकतो. प्रतिवर्षी हा आंदोलनाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारने एफआरपी व सी. रंगराजन समितीने ७०:३० चा फॉर्म्युला निश्चित करून दिला. त्यानुसार शेतकºयांना बिल न देणाºया कारखान्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. असे असताना पुन्हा शेतकºयांनी व संघटनांनीही नफ्यातील रक्कम आधीच द्या, असा आग्रह धरणे चुकीचे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना याबाबत थेट मध्यस्थी करण्यास अडचणी आल्या आहेत.पुण्यातील बैठकीबाबत संभ्रमकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यात गुरुवारी (दि. २) याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलविली आहे; परंतु आजअखेर तरी त्याबाबत कारखानदार अथवा संबंधित घटकांना त्याची कोणतीही माहिती नाही. खोत आणि स्वाभिमानी संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी श्रेय घ्यायचे म्हणून घाईगडबडीत काही तोडगा काढल्यास त्यातून प्रश्न चिघळला जाऊ शकतो.दोन दिवसांत निर्णयचंद्रकांतदादा यांच्या हस्ते आज, मंगळवारी पंढरपूरमध्ये विठ्ठलाची पूजा आहे. त्यानंतर कदाचित आज मुंबईतपाटील यांची या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतर या घडामोडींना वेग येऊ शकतो.कोल्हापूरचा तोडगा राज्यात सर्वमान्य ऊसदराच्या प्रश्नात आतापर्यंत कोल्हापूर काय ठरवेल, तोच फॉर्म्युला राज्यभर मान्य केला गेला आहे. यंदा कारखानदारही चांगली उचल द्यायला तयार आहेत व संघटनाही फारशा ताठर नाहीत. त्यामुळे एफआरपी व २५० रुपये जादा दिल्यास उसदराचा तिढा सुटू शकतो.

टॅग्स :ministerमंत्रीStrikeसंप