शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वाहक भरले नाहीत, तर आमचे राजीनामे

By admin | Updated: May 13, 2017 00:47 IST

वाहक भरले नाहीत, तर आमचे राजीनामे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्रशासनाचे दुर्लक्ष, के.एम.टी.कडील अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा, कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळेच के.एम.टी. तोट्यात चालली असून, येत्या महिन्याभरात रोजंदारीवर ५० वाहकांची भरती केली नाही तर सभापती म्हणून मी, परिवहन समितीचे सदस्य राजीनामा देऊन आयुक्तांचा निषेध करतील, असा इशारा परिवहन सभापती नियाज खान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. यापुढील काळात रोजंदारीवरील तसेच कायम वाहक, चालकांनी पूर्वपरवानगी न घेताच जर अचानक दांड्या मारल्या तर अशांची गय केली जाणार नाही. त्यांना सरळ कामावरून कमी करण्यात येईल, अथवा निलंबित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. के.एम.टी.कडे बसेस चांगल्या आहेत. प्रवासीही मोठ्या संख्येने मिळत आहेत; परंतु वाहक, चालक यांचे अचानक दांड्या मारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे के.एम.टी. प्रशासनास काही मार्गांवरील गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत, त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. प्रत्येक दिवशी ३० ते ३५ हजार रुपयांच्या उत्पन्न बुडत आहे. परिवहन समितीचे सदस्य उत्पन्नवाढीचे जातीने प्रयत्न करत असताना के.एम.टी. कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. बसेस चालविणारेच बेजबाबदार व मनमानी वृत्तीने वागत असल्याने आमचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत, असे खान यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी ३० चालक भरले आहेत. आता ५० रोजंदारी वाहक भरा म्हणून आयुक्तांना विनंती केली आहे; परंतु आयुक्त त्यासंबंधीच्या प्रस्तावावर सहीच करायला तयार नाहीत. आयुक्तांसारखे अधिकारीच जर निर्णय घ्यायला वेळ लावणार असतील तर मग के.एम.टी.चा गाडा कसा चालणार, असा सवालही खान यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस लाला भोसले, सचिन पाटील, विजयसिंह खाडे, चंद्रकांत सूर्यवंशी, उमा बनसोडे, शोभा कवाळे उपस्थित होते. संजय भोसले बिनकामाचा माणूस प्रभारी अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले हे अत्यंत निष्क्रिय आणि बिनकामाचा माणूस आहे. त्यांचे के.एम.टी.कडे अजिबात लक्ष नाही. मागच्या महिन्यात सलग २३ दिवस ते के.एम.टी.च्या कार्यालयात फिरकले नव्हते. उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे परिवहन समितीच्या सभेलाही येत नाहीत. यापुढे जर भोसले यांनी के.एम.टी.च्या कामात गांभीर्याने लक्ष घातले नाही तर त्यांच्या कार्यालयास कुलूप लावण्यात येईल, असा इशारा नियाज खान यांनी दिला. त्यांना जर के.एम.टी.चे कामकाज जमणार नसेल तर नोकरीचा राजीनामा देऊन घरला जावे. अन्य कोणाला तरी चांगले काम करण्याची संधी मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले. मनपामुळेच के.एम.टी. टिकलीय महापालिका प्रशासनाने आर्थिक मदत केल्यामुळेच के.एम.टी. टिकली आहे. लाला भोसले सभापती असताना १० कोटींची मदत केली होती. आता मी सभापती असताना ८ कोटींची मदत करायचे ठरविले आहे. जर मनपा प्रशासनाने मदत केली नसती तर के.एम.टी. बंदच पडली असती, पण येथील प्रभारी व्यवस्थापकापासून ते वाहक, चालक, कार्यालयातील कर्मचारी यांची काम करण्याची मानसिकता नाही, असेही खान यांनी सांगितले.