शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वाहक भरले नाहीत, तर आमचे राजीनामे

By admin | Updated: May 13, 2017 00:47 IST

वाहक भरले नाहीत, तर आमचे राजीनामे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्रशासनाचे दुर्लक्ष, के.एम.टी.कडील अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा, कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळेच के.एम.टी. तोट्यात चालली असून, येत्या महिन्याभरात रोजंदारीवर ५० वाहकांची भरती केली नाही तर सभापती म्हणून मी, परिवहन समितीचे सदस्य राजीनामा देऊन आयुक्तांचा निषेध करतील, असा इशारा परिवहन सभापती नियाज खान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. यापुढील काळात रोजंदारीवरील तसेच कायम वाहक, चालकांनी पूर्वपरवानगी न घेताच जर अचानक दांड्या मारल्या तर अशांची गय केली जाणार नाही. त्यांना सरळ कामावरून कमी करण्यात येईल, अथवा निलंबित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. के.एम.टी.कडे बसेस चांगल्या आहेत. प्रवासीही मोठ्या संख्येने मिळत आहेत; परंतु वाहक, चालक यांचे अचानक दांड्या मारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे के.एम.टी. प्रशासनास काही मार्गांवरील गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत, त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. प्रत्येक दिवशी ३० ते ३५ हजार रुपयांच्या उत्पन्न बुडत आहे. परिवहन समितीचे सदस्य उत्पन्नवाढीचे जातीने प्रयत्न करत असताना के.एम.टी. कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. बसेस चालविणारेच बेजबाबदार व मनमानी वृत्तीने वागत असल्याने आमचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत, असे खान यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी ३० चालक भरले आहेत. आता ५० रोजंदारी वाहक भरा म्हणून आयुक्तांना विनंती केली आहे; परंतु आयुक्त त्यासंबंधीच्या प्रस्तावावर सहीच करायला तयार नाहीत. आयुक्तांसारखे अधिकारीच जर निर्णय घ्यायला वेळ लावणार असतील तर मग के.एम.टी.चा गाडा कसा चालणार, असा सवालही खान यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस लाला भोसले, सचिन पाटील, विजयसिंह खाडे, चंद्रकांत सूर्यवंशी, उमा बनसोडे, शोभा कवाळे उपस्थित होते. संजय भोसले बिनकामाचा माणूस प्रभारी अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले हे अत्यंत निष्क्रिय आणि बिनकामाचा माणूस आहे. त्यांचे के.एम.टी.कडे अजिबात लक्ष नाही. मागच्या महिन्यात सलग २३ दिवस ते के.एम.टी.च्या कार्यालयात फिरकले नव्हते. उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे परिवहन समितीच्या सभेलाही येत नाहीत. यापुढे जर भोसले यांनी के.एम.टी.च्या कामात गांभीर्याने लक्ष घातले नाही तर त्यांच्या कार्यालयास कुलूप लावण्यात येईल, असा इशारा नियाज खान यांनी दिला. त्यांना जर के.एम.टी.चे कामकाज जमणार नसेल तर नोकरीचा राजीनामा देऊन घरला जावे. अन्य कोणाला तरी चांगले काम करण्याची संधी मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले. मनपामुळेच के.एम.टी. टिकलीय महापालिका प्रशासनाने आर्थिक मदत केल्यामुळेच के.एम.टी. टिकली आहे. लाला भोसले सभापती असताना १० कोटींची मदत केली होती. आता मी सभापती असताना ८ कोटींची मदत करायचे ठरविले आहे. जर मनपा प्रशासनाने मदत केली नसती तर के.एम.टी. बंदच पडली असती, पण येथील प्रभारी व्यवस्थापकापासून ते वाहक, चालक, कार्यालयातील कर्मचारी यांची काम करण्याची मानसिकता नाही, असेही खान यांनी सांगितले.