शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध, मातंग एकत्र आल्यास राज्यात चित्र बदलेल

By admin | Updated: January 11, 2016 01:07 IST

परिवर्तन परिषदेतील सूर : लोकजनशक्ती पार्टीतर्फे आयोजन; अन्य समाजासाठीही परिषदेचा मानस

कोल्हापूर : राज्यकर्त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी आपला वापर केला आहे, त्यामुळे बौद्ध व मातंग समाज एकत्र आल्यास महाराष्ट्रात चित्र बदलेल, असा सूर उमटला. लोकजनशक्ती पार्टी यांच्यावतीने येथे शाहू स्मारक भवनात रविवारी राज्यस्तरीय बौद्ध आणि मातंग समाज परिवर्तन परिषद झाली.परिषदेचे उद्घाटन उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. अच्युत माने (निपाणी), प्राचार्य डॉ. हरीश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेश राक्षे (पुणे) व डॉ. शरद गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले अध्यक्षस्थानी होते. डॉ. शरद गायकवाड म्हणाले, काळानुसार आता बौद्ध आणि मातंग समाजाने हातात हात घालून काम करणे गरजचे आहे. आपण एकत्र आल्यास निश्चितच चित्र बदलेल. प्राचार्य डॉ. अच्युत माने यांनी, बौद्ध-मातंग समाज आज कुठे आहे, असा प्रश्न केला. त्यासाठी सर्वांनी एकत्र या. विचाराने विचारांची लढाई लढली पाहिजे. प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांनी, सर्वसामान्यांच्या हितासाठी व जात-धर्म न मानता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बौद्ध व मातंग समाजाचे नेते आज कोठे आहेत. किती दिवस आपण सहन करणार. जातीयवाद गाडून टाका, असे सांगितले.रमेश राक्षे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीपासून शेवटपर्यंत काम केले. मग, आज आपण कुठे जात आहे. मात्र, १९४८ पासून येथील राज्यकर्त्यांनी आपला वापर सत्तेसाठी करून घेतला. तो आजही सुरू आहे. आज राज्यात जातीयवाद होत आहे. विचारांची हत्या होत आहे. त्यामुळे बौद्ध व मातंग समाज यांनी एकत्र यावे, असे सांगितले. बाळासाहेब भोसले म्हणाले, भविष्यात अनुसूचित जाती (एस.सी.) अनुसूचित जमातीसाठी (एस.टी.) व इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) अशा प्रकारची परिवर्तन परिषद जिल्ह्यात भरविण्याचा मानस आहे.जिल्हा कार्याध्यक्ष सुशील कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. युवा अध्यक्ष गौतम करुणादित्य यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन तकदीर कांबळे यांनी केले. आभार उपाध्यक्ष अशोक कांबळे यांनी मानले. या परिषदेस तुलसीदास थोरात, राजेंद्र ओंकार, कोमल माने, सुनील शेळके, सतीश कुरणे, जगदीश शिरोलीकर, दीपक दाभाडे, तुकाराम कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विचाराने विचारांची लढाई लढली पाहिजे. सर्वसामान्यांच्या हितासाठी व जात-धर्म न मानता सर्वांनी कत्र येणे गरजेचे आहेसत्तेसाठी राजकारण्यांकडून बौध्द, मातंग समाजाचा वापर