शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध, मातंग एकत्र आल्यास राज्यात चित्र बदलेल

By admin | Updated: January 11, 2016 01:07 IST

परिवर्तन परिषदेतील सूर : लोकजनशक्ती पार्टीतर्फे आयोजन; अन्य समाजासाठीही परिषदेचा मानस

कोल्हापूर : राज्यकर्त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी आपला वापर केला आहे, त्यामुळे बौद्ध व मातंग समाज एकत्र आल्यास महाराष्ट्रात चित्र बदलेल, असा सूर उमटला. लोकजनशक्ती पार्टी यांच्यावतीने येथे शाहू स्मारक भवनात रविवारी राज्यस्तरीय बौद्ध आणि मातंग समाज परिवर्तन परिषद झाली.परिषदेचे उद्घाटन उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. अच्युत माने (निपाणी), प्राचार्य डॉ. हरीश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेश राक्षे (पुणे) व डॉ. शरद गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले अध्यक्षस्थानी होते. डॉ. शरद गायकवाड म्हणाले, काळानुसार आता बौद्ध आणि मातंग समाजाने हातात हात घालून काम करणे गरजचे आहे. आपण एकत्र आल्यास निश्चितच चित्र बदलेल. प्राचार्य डॉ. अच्युत माने यांनी, बौद्ध-मातंग समाज आज कुठे आहे, असा प्रश्न केला. त्यासाठी सर्वांनी एकत्र या. विचाराने विचारांची लढाई लढली पाहिजे. प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांनी, सर्वसामान्यांच्या हितासाठी व जात-धर्म न मानता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बौद्ध व मातंग समाजाचे नेते आज कोठे आहेत. किती दिवस आपण सहन करणार. जातीयवाद गाडून टाका, असे सांगितले.रमेश राक्षे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीपासून शेवटपर्यंत काम केले. मग, आज आपण कुठे जात आहे. मात्र, १९४८ पासून येथील राज्यकर्त्यांनी आपला वापर सत्तेसाठी करून घेतला. तो आजही सुरू आहे. आज राज्यात जातीयवाद होत आहे. विचारांची हत्या होत आहे. त्यामुळे बौद्ध व मातंग समाज यांनी एकत्र यावे, असे सांगितले. बाळासाहेब भोसले म्हणाले, भविष्यात अनुसूचित जाती (एस.सी.) अनुसूचित जमातीसाठी (एस.टी.) व इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) अशा प्रकारची परिवर्तन परिषद जिल्ह्यात भरविण्याचा मानस आहे.जिल्हा कार्याध्यक्ष सुशील कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. युवा अध्यक्ष गौतम करुणादित्य यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन तकदीर कांबळे यांनी केले. आभार उपाध्यक्ष अशोक कांबळे यांनी मानले. या परिषदेस तुलसीदास थोरात, राजेंद्र ओंकार, कोमल माने, सुनील शेळके, सतीश कुरणे, जगदीश शिरोलीकर, दीपक दाभाडे, तुकाराम कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विचाराने विचारांची लढाई लढली पाहिजे. सर्वसामान्यांच्या हितासाठी व जात-धर्म न मानता सर्वांनी कत्र येणे गरजेचे आहेसत्तेसाठी राजकारण्यांकडून बौध्द, मातंग समाजाचा वापर