शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आवाडे यांनी हिंमत असेल तर निवडणुकीस सामोरे जावे

By admin | Updated: January 29, 2017 00:46 IST

चंद्रकांतदादांचे आव्हान : रेंदाळ येथे निर्धार मेळावा

हुपरी : रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होऊ घातलेली निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यामध्ये खरोखरच हिंमत असेल तर त्यांनी या रणांगणातून पळ न काढता निवडणुकीस सामोरे जावे. या निवडणुकीत त्यांचा पराजय अटळ आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.भारतीय जनता पक्ष -जनसुराज्य पक्ष व मित्रपक्षांच्या वतीने रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी हुपरी-रेंदाळ परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच रेंदाळ जिल्हा परिषदेसाठी उद्योजक महावीर शंकर गाठ व चंदूर पंचायत समितीसाठी शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ पाटील यांची उमेदवारी पालकमंत्री चंद्रकांतदादांनी यावेळी जाहीर केली.यावेळी मंत्री पाटील म्हणाले, देशातील जनतेने मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून केंद्रात व राज्यात भाजपच्या हातात सत्ता दिली. या सरकारने देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, विद्यार्थी, महिला, उद्योजक यांच्यासाठी अनेक चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन सर्वच घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे. जनतेच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगल्या व अत्यंत प्रभावी योजना प्रत्यक्षात अमलात आणण्याचे नियोजन केले आहे. गावोगावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनतेने आता जिल्हा परिषदेची सत्ताही भाजप व मित्रपक्षांच्या हातात देण्याची गरज आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी फार मोठी मदत मिळणार आहे.यावेळी शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, अशोक स्वामी, माजी आमदार राजीव आवळे, उमेदवार महावीर गाठ, रजनीताई मगदूम, अण्णासाहेब शेंडुरे, विक्रम पाटील, अनिल पाटील, सचिन मेथे, आदी उपस्थित होते.सर्वसामान्यांचा हक्क हिरावून घेतलाआमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, सर्वप्रकारच्या सत्ता केवळ आपल्याच घरात असाव्यात, अशा प्रकारचा रोग जडलेल्या प्रकाश आवाडे यांना रेंदाळ मतदारसंघातील जनता या निवडणुकीत निश्चितपणे घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या आवाडे परिवाराला आपल्या अस्तित्वासाठी आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हक्क असणारी जिल्हा परिषदेची उमेदवारी हिरावून घेऊन त्यांच्यावर आपल्याच मुलाची उमेदवारी लादावी लागत आहे. मात्र, या मतदारसंघातील स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.