शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

आरोप खोटे ठरले, तर निवडणुकीतून माघार

By admin | Updated: February 23, 2015 00:16 IST

‘कोजिमाशि’चे रणश्ािंग फुंकले : जयंत आसगावकर यांचे सत्तारूढ गटाला उघड आव्हान

कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेतील सत्तारूढ मंडळींच्या गैरकारभाराचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. आम्ही केलेले आरोप खोटे ठरवा; पतसंस्थेच्या निवडणुकीतून माघार घेतो, असे उघड आव्हान प्रा. जयंत आसगावकर यांनी दिले. ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या आगामी निवडणुकीसाठी राजर्षी शाहू लोकशाही आघाडी समर्थकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. एम. पाटील होते. आरोप करताना आपण शिक्षक आहोत याचे भान ठेवावे. अशा टीकेला कोणीही उत्तर देऊ नये, असे आवाहन करीत प्र्रा. जयंत आसगावकर म्हणाले, आपण संस्थाचालक असल्याची टीका केली जाते; पण पहिल्यांदा मी सभासद झालो आणि त्यानंतर संस्थाचालक झालो, याचे भान विरोधकांनी ठेवावे. सत्तेत असताना पतसंस्थेत कधीही लुडबूड केली नाही. आगामी काळात चांगली मंडळी सोबत येण्यास तयार असतील तर त्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ. आम्हाला नेतृत्वाची हाव नाही. सक्षम नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. बाबा पाटील म्हणाले, कृती समिती फोडण्यासाठी काहींना आमिषे दाखविली आहेत; पण कृती समितीमधील प्रत्येक घटकाचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध असल्याने समिती अभेद्यच राहील. चुकीच्या कारभाराला विरोध करीत आठ संचालकांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत संचालक संजय पाटील म्हणाले, सत्तारूढ गटाच्या चुकीच्या कारभाराचे वाभाडे निवडणुकीत पुराव्यानिशी काढू. एका शाळेतील शिक्षकांना कमी करून संस्थाचालकाने नवीन शिक्षकांच्या नेमणुका केल्या; पण जुने शिक्षक थकबाकीदार असताना नवीन शिक्षकांना कर्जवाटप करण्याचा प्रताप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. अशा अनेक भानगडी आपल्याकडे असून सगळा पर्दाफाश करू, असा इशाराही पाटील यांनी दिला. सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, मिलिंद पांगरेकर, नरेंद्र कांबळे, रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वसंतराव देशमुख, चंद्रकांत लाड, एस. एम. नाळे यांच्यासह सभासद उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीस गोविंद पानसरे व आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. २० कोटींच्या तरलतेवर १२ कोटींचे कर्जपतसंस्थेच्या ठेवी वाढल्याचा डांगोरा काही मंडळी पिटत आहेत; पण २० कोटी तरलतेवर जिल्हा बॅँकेकडून १२ कोटींचे कर्ज घेण्याची वेळ का येते ? १६४ कोटी ठेवींवर आठ कोटी तरलता कशी ? असा प्रश्न करीत संचालक संजय पाटील यांनी सडकून टीका केली. सत्ता द्या; १२ टक्के व्याजदरसभासदांनी एकहाती सत्ता द्यावी, १२ टक्के कर्जाचा व्याजदर व कर्जमुक्तीचा संपूर्ण निधी तत्काळ परत केला जाईल, अशी ग्वाही प्रा. आसगावकर यांनी दिली.