शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्व’ची ओळख हेच उत्तुंग करिअर अविनाश धर्माधिकारी : विवेकानंद महाविद्यालयात गुणी विद्यार्थी गौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:37 IST

कोल्हापूर : पुस्तकी ज्ञानाला आपण अकॅडेमिक करिअर म्हणतो. यापलीकडे खेळ, कला व जीवन घडविणारी कौशल्येही असतात.

कोल्हापूर : पुस्तकी ज्ञानाला आपण अकॅडेमिक करिअर म्हणतो. यापलीकडे खेळ, कला व जीवन घडविणारी कौशल्येही असतात. जीवनाची इमारत आपल्याला काय येते, यावरच उभी असते. पुस्तकी ज्ञानापलीकडेही जीवन घडविण्याच्या अनेक संधी असतात. त्यांचा शोध माणसाने घेतला पाहिजे. ‘स्व’ची ओळख होणे म्हणजे उत्तुंग करिअर घडविणे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

विवेकानंद कॉलेजच्या गुणी गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्याध्यक्ष साळुंखे म्हणाले, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभावनेतून विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम व जीवनाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे.विवेकानंद कॉलेज व न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या मार्च २०१७ मध्ये झालेल्या बारावी बोर्ड व विद्यापीठ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक विभाग, एन.सी.सी., एन.एस.एस.मधील उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाने व विविध मान्यवरांनी घोषित केलेल्या बक्षिसांची रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी सांस्कृतिक विभागातर्फे विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. संयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. डी. सी. कांबळे व त्यांच्या सहकाºयांनी केले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे संयोजन प्राचार्य नियुक्त प्रतिनिधी डॉ. डी. बी. पाटील, जिमखाना चेअरमन प्रा. किरण पाटील, ज्युनिअर जिमखाना प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. स्वप्निल खोत, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, प्रशासकीय कर्मचारी प्रतिनिधी हितेंद्र साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. ए. पाटील, प्रा. एस. ए. फराकटे यांनी, प्रा. डॉ. डी. बी. पाटील आभार मानले. यावेळी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी डोळसपणे योग्य क्षेत्र निवडावेसंस्था सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे म्हणाल्या, आजच्या युवा पिढीसमोर बदलत्या शिक्षणव्यवस्थेतून नवे ज्ञान, तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य क्षेत्र डोळसपणे निवडून, सातत्याने अभ्यास करून आपले करिअर घडविले पाहिजे.