शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

‘स्व’ची ओळख हेच उत्तुंग करिअर अविनाश धर्माधिकारी : विवेकानंद महाविद्यालयात गुणी विद्यार्थी गौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:37 IST

कोल्हापूर : पुस्तकी ज्ञानाला आपण अकॅडेमिक करिअर म्हणतो. यापलीकडे खेळ, कला व जीवन घडविणारी कौशल्येही असतात.

कोल्हापूर : पुस्तकी ज्ञानाला आपण अकॅडेमिक करिअर म्हणतो. यापलीकडे खेळ, कला व जीवन घडविणारी कौशल्येही असतात. जीवनाची इमारत आपल्याला काय येते, यावरच उभी असते. पुस्तकी ज्ञानापलीकडेही जीवन घडविण्याच्या अनेक संधी असतात. त्यांचा शोध माणसाने घेतला पाहिजे. ‘स्व’ची ओळख होणे म्हणजे उत्तुंग करिअर घडविणे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

विवेकानंद कॉलेजच्या गुणी गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्याध्यक्ष साळुंखे म्हणाले, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभावनेतून विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम व जीवनाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे.विवेकानंद कॉलेज व न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या मार्च २०१७ मध्ये झालेल्या बारावी बोर्ड व विद्यापीठ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक विभाग, एन.सी.सी., एन.एस.एस.मधील उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाने व विविध मान्यवरांनी घोषित केलेल्या बक्षिसांची रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी सांस्कृतिक विभागातर्फे विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. संयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. डी. सी. कांबळे व त्यांच्या सहकाºयांनी केले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे संयोजन प्राचार्य नियुक्त प्रतिनिधी डॉ. डी. बी. पाटील, जिमखाना चेअरमन प्रा. किरण पाटील, ज्युनिअर जिमखाना प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. स्वप्निल खोत, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, प्रशासकीय कर्मचारी प्रतिनिधी हितेंद्र साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. ए. पाटील, प्रा. एस. ए. फराकटे यांनी, प्रा. डॉ. डी. बी. पाटील आभार मानले. यावेळी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी डोळसपणे योग्य क्षेत्र निवडावेसंस्था सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे म्हणाल्या, आजच्या युवा पिढीसमोर बदलत्या शिक्षणव्यवस्थेतून नवे ज्ञान, तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य क्षेत्र डोळसपणे निवडून, सातत्याने अभ्यास करून आपले करिअर घडविले पाहिजे.