शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

इचलकरंजीत पंचगंगेच्या पुराचे पाणी पात्राबाहेर

By admin | Updated: July 23, 2014 22:32 IST

नदीकाठावरील मंदिरे व स्मशानभूमीला पाण्याचा विळखा

इचलकरंजी : जिल्ह्याच्या पश्चिम भागात होणाऱ्या जोरदार पावसामुळे येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ परिसरामध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीस पूर आला असून, येथे पुराच्या पाण्याने पात्र ओलांडले आहे. नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली असून, गणेश मंदिर, महादेव मंदिर आणि स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. शहर आणि परिसरामध्ये गेले दोन दिवस पावसाच्या सरी जोरदारपणे कोसळत आहेत. त्यामुळे बळिराजा सुखावला आहे. सध्याच्या ऊस व खरीप पिकासाठी अत्यंत उपयुक्त असा पाऊस बरसत असल्याने उत्साहाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणीयेलूर येथे पाण्यातूनच वाहतूक : मलकापूर, खोतवाडी, बर्की, पेरीड बंधारे पाण्याखाली मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील येलूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने त्यातूनच वाहतूक सुरू आहे; तर कोळगाव-पणुंद्रे, करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. मलकापूर, खोतवाडी, बर्की, पेरीड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात ११९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मलकापूर-कोकरूड मार्गावरील झाडे वाऱ्याने उन्मळून पडली आहेत. गेले दोन दिवस मलकापूर, आंबा, करंजफेण, उदगिरी, शित्तूर-वारुण, येळवण जुगाई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. वारणा, कडवी, शाळी, आंबार्डी नद्यांना पूर आला आहे. वादळी वारे व पावसामुळे तालुक्यातील कांटे, रेठरे, गोंडोली, परळे निनाई, आकुर्ळे, माण, उचत, परखंदळे, आदी गावांत घरे पडली आहेत; तर पणुंद्रे, टेकोली, आदी बारा वाड्यांचा शाहूवाडीशी संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवेपैकी मोरेवाडी येथील वृद्धा हौसाबाई गणपती भालेकर या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जीवरक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण करण्यात आले. राधानगरी धरणातून विसर्ग वाढविलाराधानगरी : राधानगरी परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग ६०० क्युसेक्सने वाढविला आहे. भोगावती नदीला पूर आला असून, तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तारेवाडी-हडलगे बंधारा पाण्याखालीनेसरी : तारेवाडी-हडलगे बंधारा आज पाण्याखाली गेला. सायंकाळपर्यंत बंधाऱ्यावर एक फुटाच्या वर पाणी आले होते. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास नेसरी-बेळगाव मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. कानडेवाडी बंधारा मात्र अजून पाण्याखाली आलेला नाही. त्यामुळे पर्यायी वाहतूक कानडेवाडी-तावरेवाडी-सांबरे मार्गे होईल. आज नेसरीतील सर्व शाळांनी मात्र नदीपलीकडील गावांमधील विद्यार्थ्यांना घरी लवकर पाठवले.