शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पंचगंगेच्या पुराचे पाणी पात्राबाहेर

By admin | Updated: July 23, 2014 22:32 IST

नदीकाठावरील मंदिरे व स्मशानभूमीला पाण्याचा विळखा

इचलकरंजी : जिल्ह्याच्या पश्चिम भागात होणाऱ्या जोरदार पावसामुळे येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ परिसरामध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीस पूर आला असून, येथे पुराच्या पाण्याने पात्र ओलांडले आहे. नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली असून, गणेश मंदिर, महादेव मंदिर आणि स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. शहर आणि परिसरामध्ये गेले दोन दिवस पावसाच्या सरी जोरदारपणे कोसळत आहेत. त्यामुळे बळिराजा सुखावला आहे. सध्याच्या ऊस व खरीप पिकासाठी अत्यंत उपयुक्त असा पाऊस बरसत असल्याने उत्साहाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणीयेलूर येथे पाण्यातूनच वाहतूक : मलकापूर, खोतवाडी, बर्की, पेरीड बंधारे पाण्याखाली मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील येलूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने त्यातूनच वाहतूक सुरू आहे; तर कोळगाव-पणुंद्रे, करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. मलकापूर, खोतवाडी, बर्की, पेरीड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात ११९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मलकापूर-कोकरूड मार्गावरील झाडे वाऱ्याने उन्मळून पडली आहेत. गेले दोन दिवस मलकापूर, आंबा, करंजफेण, उदगिरी, शित्तूर-वारुण, येळवण जुगाई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. वारणा, कडवी, शाळी, आंबार्डी नद्यांना पूर आला आहे. वादळी वारे व पावसामुळे तालुक्यातील कांटे, रेठरे, गोंडोली, परळे निनाई, आकुर्ळे, माण, उचत, परखंदळे, आदी गावांत घरे पडली आहेत; तर पणुंद्रे, टेकोली, आदी बारा वाड्यांचा शाहूवाडीशी संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवेपैकी मोरेवाडी येथील वृद्धा हौसाबाई गणपती भालेकर या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जीवरक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण करण्यात आले. राधानगरी धरणातून विसर्ग वाढविलाराधानगरी : राधानगरी परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग ६०० क्युसेक्सने वाढविला आहे. भोगावती नदीला पूर आला असून, तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तारेवाडी-हडलगे बंधारा पाण्याखालीनेसरी : तारेवाडी-हडलगे बंधारा आज पाण्याखाली गेला. सायंकाळपर्यंत बंधाऱ्यावर एक फुटाच्या वर पाणी आले होते. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास नेसरी-बेळगाव मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. कानडेवाडी बंधारा मात्र अजून पाण्याखाली आलेला नाही. त्यामुळे पर्यायी वाहतूक कानडेवाडी-तावरेवाडी-सांबरे मार्गे होईल. आज नेसरीतील सर्व शाळांनी मात्र नदीपलीकडील गावांमधील विद्यार्थ्यांना घरी लवकर पाठवले.