शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

इचलकरंजी आगाराची 'दिवाळी'

By admin | Updated: October 29, 2014 00:10 IST

कार्य तत्परता : तीन दिवसांत ४२ लाखांचे उत्पन्न, एकूण सव्वा कोटीचे उत्पन्न अपेक्षित

अतुल आंबी -इचलकरंजी -जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या इचलकरंजी एस. टी. आगारास यंदा दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून एक कोटी २६ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, दिवाळीतील मुख्य तीन दिवसांत सुमारे ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण दिवाळी सुट्यांच्या कालावधीतील उत्पन्नाचा हा आकडा दीड कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. दिवाळीसारख्या सणात कर्मचाऱ्यांच्या डब्बल ड्युट्या आणि आगारप्रमुखांच्या योग्य नियोजनामुळे हे साध्य झाले आहे.दिवाळी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेकजण पर्यटनाला बाहेर पडतात, तर पाडवा, भाऊबीज यासाठी नातेवाईक पाहुण्यांकडे ये-जा करतात. एस. टी. खात्यातील कर्मचाऱ्यांना मात्र अशा सणावेळी डब्बल काम करावे लागते. यंदा येथील आगारप्रमुख किरण कुलकर्णी यांनी विभागीय सांख्यिकी अधिकारी अशोक कांबळे व डेपोचालक एस. डी. शांतिसम्राट, ए. आर. निकम यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी यांना बरोबर घेऊन, नियोजन करून दिवाळीमध्ये एसटीला अधिक उत्पन्न मिळविले आहे. दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून दररोज सरासरी बारा लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यातून सात दिवसांत ८४ लाख रुपये व दिवाळीच्या मुख्य तीन दिवसांत ४२ लाख रुपये असे एकूण एक कोटी २६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सुट्यांचा कालावधी संपेपर्यंत एकूण कालावधीतील उत्पन्नाचा हा आकडा दीड कोटींवर जाईल, असा अंदाज आगारप्रमुखांनी व्यक्त केला आहे.दिवाळीतील मुख्य तीन दिवसांत २५ आॅक्टोबर रोजी भाऊबीजनिमित्त १९ जादा गाड्या सोडण्यात आल्या. सांगली, मिरज, कोल्हापूर, निपाणी या प्रमुख मार्गांवर वाहतूक करण्यात आली. यामध्ये दिवसभरात एकूण ३५ हजार १११ किलोमीटर प्रवास होऊन १२ लाख २५ हजार ७२२ इतके उत्पन्न मिळाले. २६ आॅक्टोबरला पुणे येथे कोल्हापूर मार्गे १३ जादा गाड्यांची वाहतूक करण्यात आली. यामध्ये दिवसभरात ३३ हजार ८६० किलोमीटर वाहतूक होऊन १२ लाख ६३ हजार ७०६ उत्पन्न मिळाले. तर २७ आॅक्टोबरला दिवसभरात ३९ हजार ८०० किलोमीटर वाहतूक होऊन १६ लाख १४ हजार ७९७ इतके विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी २०१३ मध्ये दिवाळीच्या तीन दिवसांत या आगाराने एक लाख ८४२ किलोमीटर प्रवास करून ३६ लाख ७५ हजार ९५८ रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. तर यंदा २०१४ ला दिवाळीच्या तीन दिवसांत एक लाख ८ हजार ७७१ किलोमीटरचा प्रवास करून ४१ लाख ४ हजार २२५ रुपयांचे उत्पन्न मिळविले. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत सात हजार ९२९ किलोमीटर जादा वाहतूक करून चार लाख २८ हजार २६७ रुपयांचा अधिक नफा मिळविला आहे. सध्या आगाराकडे १०८ बस , १९३ चालक आणि २४७ वाहक काम करतात. दररोजच्या वाहतूक नियंत्रणासाठी साधारण ५६ चालक कमी पडत आहेत. तरीही दररोज ८१२ फेऱ्या केल्या जातात. त्यासाठी काहीजणांना डब्बल ड्युटी करावी लागते. आगारप्रमुखांनाही अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्यातून वाहतुकीचे नियोजन करताना अनेकवेळा डब्बल ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांना विनवणी करावी लागते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही होत आहे.दिवाळीतील कामगिरी....दररोज सरासरी बारा लाखांचे उत्पन्नसात दिवसांत ८४ लाख रुपयांचे उत्पन्नतीन दिवसांत १ लाख ८ हजार किलोमीटर वाहतूक२०१३ मध्ये तीन दिवसांत ३६ लाख ७५,९८५ रुपये उत्पन्न२०१४ मध्ये तीन दिवसांत ४१ लाख ४ हजार २२५ उत्पन्न