शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

इचलकरंजीत पाणीटंचाई

By admin | Updated: February 9, 2017 00:15 IST

कृष्णेची पाणी पातळी घटली : ५० टक्के कपात; पाच दिवसांनी येणार नळाला पाणी

इचलकरंजी : कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची घट झाल्यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच इचलकरंजीस पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या.मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीत असलेल्या इंटेक वेलला पाणी पोहोचत नसल्याने दोन पंपांऐवजी एकाच पंपामार्फत पाण्याचा उपसा सुरू आहे. नदीमध्ये पाण्याची पातळी ५५२.५ मीटर इतकी आवश्यक असताना सध्या ती ५२१.६० मीटर इतकी आहे, अशी माहिती नगरपालिकेने बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. सदरची पातळी आणखीन खालावल्यास दुसरा पंपसुद्धा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये किमान दीड मीटरने वाढ व्हावी, म्हणून राजापूर बंधाऱ्यामध्ये बरगे घालून पाणी अडविले पाहिजे, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, जलअभियंता सुरेश कमळे, सभापती नितीन जांभळे, आदींनी सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव कोरे यांची भेट घेतली. त्यामुळे बुधवारी तातडीने बंधाऱ्याला बरगे घालण्याचे काम सुरू करण्यात आले, असेही या पत्रकात नमूद केले आहे. साधारणत: मजरेवाडी येथील पाण्याची पातळी वाढण्यास आणखीन आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्यामुळे दरम्यानच्या काळात शहरास होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये ५० टक्क्याने कपात होणार आहे. सध्या तीन दिवसांतून मिळणारे पाणी, पाच दिवसांतून एक वेळ मिळणार असल्याने उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. (प्रतिनिधी)