शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पाणीटंचाई

By admin | Updated: February 9, 2017 00:15 IST

कृष्णेची पाणी पातळी घटली : ५० टक्के कपात; पाच दिवसांनी येणार नळाला पाणी

इचलकरंजी : कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची घट झाल्यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच इचलकरंजीस पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या.मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीत असलेल्या इंटेक वेलला पाणी पोहोचत नसल्याने दोन पंपांऐवजी एकाच पंपामार्फत पाण्याचा उपसा सुरू आहे. नदीमध्ये पाण्याची पातळी ५५२.५ मीटर इतकी आवश्यक असताना सध्या ती ५२१.६० मीटर इतकी आहे, अशी माहिती नगरपालिकेने बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. सदरची पातळी आणखीन खालावल्यास दुसरा पंपसुद्धा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये किमान दीड मीटरने वाढ व्हावी, म्हणून राजापूर बंधाऱ्यामध्ये बरगे घालून पाणी अडविले पाहिजे, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, जलअभियंता सुरेश कमळे, सभापती नितीन जांभळे, आदींनी सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव कोरे यांची भेट घेतली. त्यामुळे बुधवारी तातडीने बंधाऱ्याला बरगे घालण्याचे काम सुरू करण्यात आले, असेही या पत्रकात नमूद केले आहे. साधारणत: मजरेवाडी येथील पाण्याची पातळी वाढण्यास आणखीन आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्यामुळे दरम्यानच्या काळात शहरास होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये ५० टक्क्याने कपात होणार आहे. सध्या तीन दिवसांतून मिळणारे पाणी, पाच दिवसांतून एक वेळ मिळणार असल्याने उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. (प्रतिनिधी)