शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

इचलकरंजीत आता ६२ नगरसेवक

By admin | Updated: October 9, 2015 23:19 IST

आगामी निवडणुकीत अंमलबजावणी : प्रत्येक प्रभागात पाच हजार मतदार; नवीन मतदार नोंदणी सुरू

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता सध्या असलेल्या ५७ प्रभागांची संख्या ६२ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. सन २०१६ मध्ये प्रभागनिहाय होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात ४७०० ते ५२०० मतदार संख्या राहणार आहे.नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदविण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून, मतदार नोंदविण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर आहे. यापूर्वी सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत असलेल्या ५७ प्रभागांपैकी २९ प्रभाग महिला राखीव होते. तर पाच प्रभाग मागासवर्गीयांसाठी आरक्षित होते. त्यावेळी प्रभागनिहाय निवडणुका होण्याऐवजी चार नगरसेवकांचा एक प्रभाग याप्रमाणे निवडणूक झाली होती. मात्र, आता पालिकेची आगामी निवडणूक प्रभागनिहाय एक नगरसेवक याप्रमाणे होणार आहे. आता पुढील वर्षी होणारी निवडणूक सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार होणार आहे. वाढलेल्या लोकसंख्येप्रमाणे सध्या दोन लाख ८७ हजार इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे सध्याच्या ५७ प्रभागांमध्ये आणखीन पाच नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामध्ये ३२ प्रभाग महिलांसाठी राखीव असतील. तर सहा प्रभाग मागासवर्गीयांसाठी आरक्षित राहणार आहेत. त्यामध्ये तीन प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी राखीव राहतील. सध्या नवमतदार व स्थलांतरित मतदारांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नगरपालिकेच्यावतीने शहरात विविध अशा दहा ठिकाणी डिजिटल फलक उभारून नवमतदारांनी आपले मतदान संबंधित मतदान केंद्रावर नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सध्याच्या नगरसेवकांनी नागरिकांमध्ये जागृती आणून मतदान नोंदणीसाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)एकाच पत्त्यावर गठ्ठा मतदारांची नोंदणी ?आगामी निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांनी आसपासच्या खेडेगावांतील त्यांच्या ओळखीचे उमेदवार इचलकरंजीत बोलविण्यास सुरूवात केली आहे. नवमतदार व स्थलांतरित मतदार अशा गोंडस नावाखाली नोंदविण्यात येणाऱ्या अशा मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे समजते. तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये मातब्बर उमेदवार प्रतिस्पर्धी असतात. तेथे मतदारांचा भाव आपोआप वधारतो. जेवणावळी होतात. ओल्या पार्ट्यांबरोबर दक्षिणाही मिळते. महिलांच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांना बहार येते. अगदी मतदानाच्या दिवशी चांगला वजनदार ‘दर’ मिळतो. त्यामुळे एकाच पत्त्यावर गठ्ठा मतदानही नोंदविले जाते. याकडे मात्र पालिकेच्या प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे, अशी मागणी सूज्ञ नागरिकांची आहे.