शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

इचलकरंजीत आता ६२ नगरसेवक

By admin | Updated: October 9, 2015 23:23 IST

आगामी निवडणुकीत अंमलबजावणी : प्रत्येक प्रभागात पाच हजार मतदार; नवीन मतदार नोंदणी सुरू

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता सध्या असलेल्या ५७ प्रभागांची संख्या ६२ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. सन २०१६ मध्ये प्रभागनिहाय होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात ४७०० ते ५२०० मतदार संख्या राहणार आहे.नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदविण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून, मतदार नोंदविण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर आहे. यापूर्वी सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत असलेल्या ५७ प्रभागांपैकी २९ प्रभाग महिला राखीव होते. तर पाच प्रभाग मागासवर्गीयांसाठी आरक्षित होते. त्यावेळी प्रभागनिहाय निवडणुका होण्याऐवजी चार नगरसेवकांचा एक प्रभाग याप्रमाणे निवडणूक झाली होती. मात्र, आता पालिकेची आगामी निवडणूक प्रभागनिहाय एक नगरसेवक याप्रमाणे होणार आहे. आता पुढील वर्षी होणारी निवडणूक सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार होणार आहे. वाढलेल्या लोकसंख्येप्रमाणे सध्या दोन लाख ८७ हजार इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे सध्याच्या ५७ प्रभागांमध्ये आणखीन पाच नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामध्ये ३२ प्रभाग महिलांसाठी राखीव असतील. तर सहा प्रभाग मागासवर्गीयांसाठी आरक्षित राहणार आहेत. त्यामध्ये तीन प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी राखीव राहतील. सध्या नवमतदार व स्थलांतरित मतदारांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नगरपालिकेच्यावतीने शहरात विविध अशा दहा ठिकाणी डिजिटल फलक उभारून नवमतदारांनी आपले मतदान संबंधित मतदान केंद्रावर नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सध्याच्या नगरसेवकांनी नागरिकांमध्ये जागृती आणून मतदान नोंदणीसाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)एकाच पत्त्यावर गठ्ठा मतदारांची नोंदणी ?आगामी निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांनी आसपासच्या खेडेगावांतील त्यांच्या ओळखीचे उमेदवार इचलकरंजीत बोलविण्यास सुरूवात केली आहे. नवमतदार व स्थलांतरित मतदार अशा गोंडस नावाखाली नोंदविण्यात येणाऱ्या अशा मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे समजते. तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये मातब्बर उमेदवार प्रतिस्पर्धी असतात. तेथे मतदारांचा भाव आपोआप वधारतो. जेवणावळी होतात. ओल्या पार्ट्यांबरोबर दक्षिणाही मिळते. महिलांच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांना बहार येते. अगदी मतदानाच्या दिवशी चांगला वजनदार ‘दर’ मिळतो. त्यामुळे एकाच पत्त्यावर गठ्ठा मतदानही नोंदविले जाते. याकडे मात्र पालिकेच्या प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे, अशी मागणी सूज्ञ नागरिकांची आहे.