शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

इचलकरंजीत आता ६२ नगरसेवक

By admin | Updated: October 9, 2015 23:23 IST

आगामी निवडणुकीत अंमलबजावणी : प्रत्येक प्रभागात पाच हजार मतदार; नवीन मतदार नोंदणी सुरू

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता सध्या असलेल्या ५७ प्रभागांची संख्या ६२ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. सन २०१६ मध्ये प्रभागनिहाय होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात ४७०० ते ५२०० मतदार संख्या राहणार आहे.नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदविण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून, मतदार नोंदविण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर आहे. यापूर्वी सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत असलेल्या ५७ प्रभागांपैकी २९ प्रभाग महिला राखीव होते. तर पाच प्रभाग मागासवर्गीयांसाठी आरक्षित होते. त्यावेळी प्रभागनिहाय निवडणुका होण्याऐवजी चार नगरसेवकांचा एक प्रभाग याप्रमाणे निवडणूक झाली होती. मात्र, आता पालिकेची आगामी निवडणूक प्रभागनिहाय एक नगरसेवक याप्रमाणे होणार आहे. आता पुढील वर्षी होणारी निवडणूक सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार होणार आहे. वाढलेल्या लोकसंख्येप्रमाणे सध्या दोन लाख ८७ हजार इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे सध्याच्या ५७ प्रभागांमध्ये आणखीन पाच नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामध्ये ३२ प्रभाग महिलांसाठी राखीव असतील. तर सहा प्रभाग मागासवर्गीयांसाठी आरक्षित राहणार आहेत. त्यामध्ये तीन प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी राखीव राहतील. सध्या नवमतदार व स्थलांतरित मतदारांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नगरपालिकेच्यावतीने शहरात विविध अशा दहा ठिकाणी डिजिटल फलक उभारून नवमतदारांनी आपले मतदान संबंधित मतदान केंद्रावर नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सध्याच्या नगरसेवकांनी नागरिकांमध्ये जागृती आणून मतदान नोंदणीसाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)एकाच पत्त्यावर गठ्ठा मतदारांची नोंदणी ?आगामी निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांनी आसपासच्या खेडेगावांतील त्यांच्या ओळखीचे उमेदवार इचलकरंजीत बोलविण्यास सुरूवात केली आहे. नवमतदार व स्थलांतरित मतदार अशा गोंडस नावाखाली नोंदविण्यात येणाऱ्या अशा मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे समजते. तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये मातब्बर उमेदवार प्रतिस्पर्धी असतात. तेथे मतदारांचा भाव आपोआप वधारतो. जेवणावळी होतात. ओल्या पार्ट्यांबरोबर दक्षिणाही मिळते. महिलांच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांना बहार येते. अगदी मतदानाच्या दिवशी चांगला वजनदार ‘दर’ मिळतो. त्यामुळे एकाच पत्त्यावर गठ्ठा मतदानही नोंदविले जाते. याकडे मात्र पालिकेच्या प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे, अशी मागणी सूज्ञ नागरिकांची आहे.