शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

इचलकरंजी नगरपालिकेत स्वच्छतेच्या नावावर अडीच कोटी रुपयांचा गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:29 IST

इचलकरंजी : सध्या शहरातील कचरा संकलित करून तो कचरा डेपोवर टाकण्याचे काम बीव्हीजी कंपनी ३ कोटी ६९ लाख रुपयाला ...

इचलकरंजी : सध्या शहरातील कचरा संकलित करून तो कचरा डेपोवर टाकण्याचे काम बीव्हीजी कंपनी ३ कोटी ६९ लाख रुपयाला करीत आहे. मात्र, हेच काम नगरपालिकेकडून ६ कोटी १६ लाख रुपयांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये ६६.९३ टक्क्यांची वाढ असल्यामुळे नगरपालिकेचे २ कोटी ४७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेतील सत्तारूढ आघाडीने बहुमताने संमत केलेल्या या प्रस्तावास स्थगिती द्यावी, अशी मागणी राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.शहरातील रस्त्यांची लांबी ४५२ किलोमीटर आहे. असे असताना नगरपालिकेच्या ६८ घंटागाड्या असून, प्रत्येकी ३० किलोमीटर याप्रमाणे २०४० किलोमीटर इतकी फिरस्ती असल्याचे या प्रस्तावात दाखविण्यात आले आहे. त्यानुसार डिझेल खर्चाची आकारणी होणार आहे. वास्तविक पाहता वर्षाला ११ लाख ३२ हजार इतका इंधन खर्च येत असताना तो ४७ लाख १५ हजार असा दाखविण्यात आला आहे. यामध्ये ३६ लाख रुपयांची वाढ दाखविण्यात आली आहे. टिप्परच्या इंधन खर्चामध्ये तीस किलोमीटरऐवजी ५० किलोमीटर अशी अतिरिक्त वाढ दाखविण्यात आली असून, त्यामध्ये ३४ हजार रुपयांची जादा वाढ आहे.शहरात ४५२ किलोमीटर एवढे रस्ते असले तरी त्यातील अनेक रस्त्यांवर (बोळ वजा) घंटागाडी फिरणार नाही. घंटागाड्यांची संख्या अधिक असल्यामुळे प्रत्येक घंटागाडीला तीन ते चार तास काम करावे लागणार आहे. त्यावरील कर्मचारी अर्धवेळ असल्यामुळे एकूण वेतनाच्या ६० टक्के वेतन देणे आवश्यक आहे. तरीसुद्धा या कर्मचाºयांना अनुक्रमे १० हजार ४०९ रुपये व ८ हजार १९६ रुपये इतके वेतन देण्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे. टिप्पर, कॉम्पॅक्टर आणि घंटागाड्या नवीन असल्यामुळे त्यांच्यावरील मेंटनन्स पाच टक्के धरणे आवश्यक आहे. मात्र, हा खर्च दहा टक्के गृहीत धरला आहे.नगरपालिकेच्या सभेमध्ये शाहू आघाडीकडून ४ कोटी १ लाख रुपये एवढे अंदाजपत्रक मंजूर करणे कायदेशीर व योग्य आहे, असे म्हणणे मांडण्यात आले होते. मात्र, ते फेटाळून सत्तारूढ आघाडीने बहुमताने ६ कोटी १६ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. अशा प्रकारे हा प्रस्ताव पूर्णपणे बोगस असल्याचे चोपडे यांनी म्हटले आहे.