शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

इचलकरंजीत कावड यात्रा उत्साहात

By admin | Updated: July 24, 2014 23:11 IST

राजस्थानी युवक मंडळाचे आयोजन : ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नम: शिवाय’ चा गजर

इचलकरंजी : येथील राजस्थानी युवक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली ‘कावड यात्रा’ भक्तिमय वातावरणात पार पडली. ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नम: शिवाय’ चा गजर करीत कावडधारक इचलकरंजीतून रामलिंगला रवाना झाले.महाराष्ट्रीयन श्रावण महिन्याच्या पंधरा दिवस आधी राजस्थानी व इतर भारतीय लोकांचा श्रावण महिना सुरू होतो. दुसऱ्या सोमवारी राजस्थानी बांधव कावड यात्रा काढतात. यामध्ये येथील राजस्थानी युवक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेचा प्रारंभ सकाळी आठ वाजता कापड मार्केटमधून करण्यात आला. कावडधारक तेथून राधाकृष्ण चौक, एमएसईबी चौक, डेक्कन रोडने कोरोची, हातकणंगले मार्गाने रामलिंग डोंगरावर पोहोचले. त्याठिकाणी असलेल्या शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.यावेळी राजाराम भुतडा, महेश त्रिपाठी, रामनिवास मुंदडा, ओमप्रकाश छापरवाल, प्रमोद पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष गोपी किशन काबरा, कमलकिशोर खंडेलवाल यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, मर्दा ग्रुप, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संगठन, एम.एम.स्पोर्टस्, मारवाडी युवा मंच, महेश स्पोर्टस्, मिडटाऊन, आदी मंडळांनी कावड यात्रेसाठी मार्गावर जलपानाची सोय केली होती. तसेच जगदंबा सत्संग मंडळाच्यावतीने भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (प्रतिनिधी)