शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत नेत्यांच्या बैठका जास्त, जोर मात्र कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:19 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असली तरी त्याकडे म्हणावे तितक्या ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असली तरी त्याकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही, अशी ओरड नागरिकांतून सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेत्यांच्या, मंत्र्यांच्या वरचेवर बैठका होत आहेत. आढावा घेतला जात आहे, सूचना दिल्या जात आहेत; परंतु परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक जोर दिसत नाही. अतिशय संथगतीने या परिस्थितीला हाताळले जात आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पहिल्या लाटेत इचलकरंजीत अतिशय कडक पद्धतीने अंमलबजावणी केली जात होती. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश मिळाले. मुंबईप्रमाणे इचलकरंजी शहरातही अतिशय दाट लोकवस्ती आहे. त्यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने शहरात कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचेही हाल सुरू आहेत. बाहेरच्या राज्यातील कामगार परतत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु, इचलकरंजीमध्ये तसे होताना दिसत नाही.

विविध राजकीय पक्षांचे नेते, खासदार, मंत्री येतात, बैठका घेतात, सूचना देतात आणि निघून जातात. त्याची अंमलबजावणी मात्र तत्काळ होताना दिसत नाही. त्यावर नेमके कोणाचे नियंत्रण आहे हेही समजून येत नाही. जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. नगरपालिका, आयजीएम रुग्णालय, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्यासह राजकीय नेत्यांनी समन्वय साधून एकत्रित भूमिका व नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

चौकटी

आवश्यक औषधांचाही तुटवडा

कोरोनावरील उपचारासाठी वापरली जाणारी काही औषधे शहरातील मेडिकलमध्ये उपलब्ध नाहीत. पुरवठ्यापेक्षा अचानक मागणी वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

परंतु, प्रशासनाने त्यावर ताबडतोब मार्ग काढून औषध साठा उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.

ट्रेसिंग व टेस्ट वाढविणे आवश्यक

पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग व टेस्टिंग करून गरज असेल त्यांना तत्काळ उपचार सुरू करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर होम क्वारंटाईन राहून उपचार घेणारे, तसेच त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. नगरपालिका प्रशासनाने याबाबत यंत्रणा उभी करावी.

लसीकरणासाठी नियोजन आवश्यक

सध्या शहरात आयजीएम रुग्णालय व बारा केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. त्यातील अनेक ठिकाणी रुग्णांना योग्य बैठक व्यवस्था नाही. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला असतो. १ मेनंतर १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू केले जाणार आहे. सध्या मर्यादित संख्या असतानाही अशी परिस्थिती आहे, तर पुढे काय होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.