शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील टोळीला ‘मोक्का’

By admin | Updated: July 24, 2016 00:59 IST

आठजणांचा समावेश : अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांची माहिती

इचलकरंजी : शहरासह परिसरातील तारदाळ भागात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, हाणामारी, विना परवाना हत्यार बाळगणे, असे दहा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अमोल अशोक माळी (रा. तारदाळ) याच्यासह आठजणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. मोक्काअंतर्गत इचलकरंजी परिसरात ही पहिलीच कारवाई आहे.या टोळीत अमोल याच्यासह सूरज मनोहर शिर्के (वय २०), अजय भानुदास कुलकर्णी (२९), अनिल संपत मोळे (३१, सर्व रा. श्रीरामनगर तारदाळ), तौफिक अब्दुल शिरगुप्पे (३१), बसवेश्वर ऊर्फ राहुल विश्वनाथ एकोंडे (२१), अमोल प्रभाकर कोंडारे (२६, तिघे रा. आझादनगर, तारदाळ) व अक्षय बबन कल्ले (रा. शहापूर) यांचा समावेश आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ही पहिली कारवाई केली असून, शहर व परिसरातील अन्य गुन्हेगारांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे, असेही बारी यांनी सांगितले.माळी याच्यावर विजय चिंचणलकर, सचिन ऊर्फ पिंटू जाधव व अजित वाघमारे यांच्या खुनाचे गुन्हे नोंद आहेत. त्याशिवाय गावभाग, शिवाजीनगर, हातकणंगले, शहापूर, आदी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या टोळीने तारदाळ व इचलकरंजी परिसरातील उद्योजक, व्यावसायिकांकडून खंडणी उकळणे, अवैध व्यवसायांच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होणे शिवाय राजकीय पार्श्वभूमीचा गैरफायदा घेत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यात अग्रेसर होते.या वर्चस्व वादातूनच अजित वाघमारे याचा खून झाल्याचे तपासात समोर आले होते. एप्रिल २०१६ मध्ये वाघमारे याचे अपहरण करून, त्याचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह कर्नाटकमधील शेडबाळ या गावच्या हद्दीत टाकण्यात आला होता. शहापूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत वरील सातजणांना अटक केली. तर मुख्य सूत्रधार अमोल माळी हा अद्याप फरार आहे.पत्रकार बैठकीस पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, गावभागचे अरुण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष डोके, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)विश्वास नांगरे-पाटील यांच्या सूचनेनुसार कारवाईशहर आणि परिसरातील वाढती गुंडगिरी व गुन्हेगारी याचा बिमोड करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहापूरचे पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी मोका कायद्यान्वये या टोळीचा प्रस्ताव तयार करून तो विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्याप्रमाणे मोक्काअंतर्गत कलमे लावून तो पुढील तपासासाठी करवीर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या टोळीवरील गुन्हेसर्व आठही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर खुनाचे तीन, खुनासाठी मनुष्य पळविणे एक, खंडणीचे दोन, परवाना नसताना शस्त्रे बाळगण्याचा एक, तर मारामारीचे चार, असे एकूण दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.