शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

इचलकरंजीत ठेकेदारास घेराव

By admin | Updated: February 12, 2015 00:23 IST

झोपडपट्टीवासीयांचा पुनर्वसन प्रश्न : इमारतींचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन

इचलकरंजी : एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सुरू असलेल्या व जयभीमनगरमधील १४ इमारती सप्टेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करून देऊ. उर्वरित तीन इमारतींसाठी वाढलेल्या महागाईच्या प्रमाणात बांधकामाचा वाढीव दर मिळाला, तर त्याही इमारती बांधून पूर्ण करण्यात येतील, असा निर्णय ठेकेदार नरेंद्र कन्स्ट्रक्शनचे दिनेश शहा यांनी दिल्यानंतर झोपडपट्टीवासीय लाभार्थींनी घातलेला घेराव उठविण्यात आला.केंद्र सरकारच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येथील जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांची घरकुले अपार्टमेंट पद्धतीने बांधण्याची सुमारे ३५ कोटी रुपये खर्चाची योजना नगरपालिकेने हाती घेतली आहे. जयभीमनगरातील एकूण १७ इमारतींपैकी १४ इमारतींचे बांधकाम सध्या चालू आहे. या इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असताना वाळूचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे कारण देत मक्तेदार नरेंद्र कन्स्ट्रक्शन यांनी काम बंद ठेवले. काम बंद ठेवल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी त्याठिकाणी असलेल्या कामगारांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी मक्तेदार शहा यांच्याशी संपर्क साधून लाभार्थ्यांमध्ये असलेला असंतोष त्यांना सांगितला.मक्तेदार शहा यांच्याशी चर्चा करताना पाटील यांनी पुनर्वसनाच्या इमारतींचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत सांगण्याचा आग्रह धरला. मात्र, बांधकामाच्या साहित्याच्या दरामध्ये सातत्याने होणारे चढ-उतार पाहता बांधकामासाठी वाढीव दर मिळावा; अन्यथा काम करणे अवघड होईल, असे मक्तेदार शहा यांनी स्पष्ट केले. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मुख्याधिकारी सुनील पवार यांना पाचारण करण्याचे ठरले. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची तब्बेत बरी नसल्याने ते येऊ शकले नाहीत. अखेर बांधकामाच्या कच्च्या मालाचे वाढलेले दर विचारात घेऊन त्याचा फरक देण्याची मागणी करीत मक्तेदार शहा यांनी सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या १४ इमारती सप्टेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. उरलेल्या तीन इमारतींसाठी एकूणच वाढलेल्या बांधकाम खर्चासाठी बांधकामाचा दर वाढवून मिळाल्यास त्या पूर्ण केल्या जातील, असे सांगितले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले आणि मक्तेदार शहा यांना घातलेला घेराव उठविण्यात आला. (प्रतिनिधी)'लाभार्थ्यांच्या प्रश्नांनी ठेकेदारास भंडावून सोडलेबुधवारी सायंकाळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या दालनात मक्तेदार दिनेश शहा, पक्षप्रतोद सुनील पाटील, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, आदींची बैठक सुरू होती. त्याचवेळी जयभीमनगरातील लाभार्थी सतीश टेकाळे, प्रकाश पाटील, विठ्ठल शिंदे, दत्ता चंदनशिवे, अमर पार्टे, आदींनी येऊन मक्तेदार शहा यांना घेराव घातला. संतप्त लाभार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून अक्षरश: भंडावून सोडले. त्यावेळी संतप्त लाभार्थ्यांना नगराध्यक्षा बिरंजे, पक्षप्रतोद पाटील, सभापती आवळे यांनी शांत केले.