शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

कोल्हापूर विमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करू : अरविंद सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:36 IST

कोल्हापूर विमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंग यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील विमान सेवांचा विस्तार करण्यासाठी छोट्या शहरांच्या विमानसेवा वाढविण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन मंत्री पुरी यांनी दिले.

ठळक मुद्देकोल्हापूर विमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करू : अरविंद सिंग‘महाराष्ट्र चेंबर’च्या शिष्टमंडळासमवेत चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंग यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील विमान सेवांचा विस्तार करण्यासाठी छोट्या शहरांच्या विमानसेवा वाढविण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन मंत्री पुरी यांनी दिले.‘महाराष्ट्र चेंबर’च्या हवाई वाहतूक समितीने केंद्रीय मंत्री पुरी आणि विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन सिंग यांच्याशी स्वतंत्र बैठका घेऊन महाराष्ट्रातील विमान सेवांच्या प्रश्नासंबंधी चर्चा केली. विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्यालयात चेअरमन सिंग यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा, धावपट्टी विस्तारीकरणाचे कार्य लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले असल्याने कोल्हापूरबद्दल मला विशेष आत्मीयता असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर विमानतळासंबंधी सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करून घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६४ एकर जमीन संपादित करण्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना कळविले जाईल, असेही सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील ए. व्ही. कोळी, बिपिन कुमार, जे. के. जैन, प्राधिकरणाचे अधिकारी ए. के. पाठक सहभागी झाले.

दरम्यान, यापूर्वी मंत्री पुरी यांच्या कार्यालयातील बैठकीत ‘महाराष्ट्र चेंबर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष गांधी यांनी राज्यातील विमानतळांचे प्रश्न मांडले. शिर्डी, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याची आवश्यकता विषद केली. कोल्हापूर -मुंबई विमानसेवेसाठी सकाळी आणि संध्याकाळची वेळ मिळावी.

कोल्हापूर- दिल्ली-अहमदाबाद या नवीन सेवांचा प्रारंभ करावा, अशी मागणी केली. नियोजन विभागाचे सदस्य ए. के. पाठक यांनी कोल्हापूर विमानतळाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. मंत्री पुरी यांनी सर्व विषयांवर चर्चा केली आणि अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या.

हवाई वाहतूक समितीचा अहवाल सादरदेशभरातील विमानतळावरील सुविधांमधील सुधारणा, विमान कंपन्यांबाबतच्या तक्रारी, सवलतींची अपेक्षा आदींबाबतचा ‘महाराष्ट्र चेंबर’च्या हवाई वाहतूक समितीने तयार केलेला अहवाल गांधी यांनी यावेळी सिंग यांना सादर केला.

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर