शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कोल्हापूर विमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करू : अरविंद सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:36 IST

कोल्हापूर विमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंग यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील विमान सेवांचा विस्तार करण्यासाठी छोट्या शहरांच्या विमानसेवा वाढविण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन मंत्री पुरी यांनी दिले.

ठळक मुद्देकोल्हापूर विमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करू : अरविंद सिंग‘महाराष्ट्र चेंबर’च्या शिष्टमंडळासमवेत चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंग यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील विमान सेवांचा विस्तार करण्यासाठी छोट्या शहरांच्या विमानसेवा वाढविण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन मंत्री पुरी यांनी दिले.‘महाराष्ट्र चेंबर’च्या हवाई वाहतूक समितीने केंद्रीय मंत्री पुरी आणि विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन सिंग यांच्याशी स्वतंत्र बैठका घेऊन महाराष्ट्रातील विमान सेवांच्या प्रश्नासंबंधी चर्चा केली. विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्यालयात चेअरमन सिंग यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा, धावपट्टी विस्तारीकरणाचे कार्य लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले असल्याने कोल्हापूरबद्दल मला विशेष आत्मीयता असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर विमानतळासंबंधी सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करून घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६४ एकर जमीन संपादित करण्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना कळविले जाईल, असेही सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील ए. व्ही. कोळी, बिपिन कुमार, जे. के. जैन, प्राधिकरणाचे अधिकारी ए. के. पाठक सहभागी झाले.

दरम्यान, यापूर्वी मंत्री पुरी यांच्या कार्यालयातील बैठकीत ‘महाराष्ट्र चेंबर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष गांधी यांनी राज्यातील विमानतळांचे प्रश्न मांडले. शिर्डी, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याची आवश्यकता विषद केली. कोल्हापूर -मुंबई विमानसेवेसाठी सकाळी आणि संध्याकाळची वेळ मिळावी.

कोल्हापूर- दिल्ली-अहमदाबाद या नवीन सेवांचा प्रारंभ करावा, अशी मागणी केली. नियोजन विभागाचे सदस्य ए. के. पाठक यांनी कोल्हापूर विमानतळाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. मंत्री पुरी यांनी सर्व विषयांवर चर्चा केली आणि अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या.

हवाई वाहतूक समितीचा अहवाल सादरदेशभरातील विमानतळावरील सुविधांमधील सुधारणा, विमान कंपन्यांबाबतच्या तक्रारी, सवलतींची अपेक्षा आदींबाबतचा ‘महाराष्ट्र चेंबर’च्या हवाई वाहतूक समितीने तयार केलेला अहवाल गांधी यांनी यावेळी सिंग यांना सादर केला.

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर