शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मरण पत्करू, पण शरण येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST

कोल्हापूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्याग्रहाच्या मार्गानेच गुडघे टेकायला भाग पाडून पूरग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी ...

कोल्हापूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्याग्रहाच्या मार्गानेच गुडघे टेकायला भाग पाडून पूरग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी मरण पत्करू, पण कोणालाही शरण येणार नाही, अशी गर्जना स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पूरग्रस्तांच्या आक्राेश पदयात्रेच्या सांगता सभेत केले. आम्हाला उद्ध्वस्त करून राज्य करायचे असेल तर खुशाल आमच्या मुडद्यावर बसून करा, असे आव्हानही दिले. केंद्र सरकारच्या सापत्नभावामुळेच पूरग्रस्तांची होरपळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रयाग चिखली येथून बुधवारी सुरू झालेली आक्रोश पदयात्रा व पंचगंगा परिक्रमेची सांगता रविवारी संध्याकाळी नृसिंहवाडीत जाहीर सभेने झाली. प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, माजी सभापती राजेश पाटील, सावकर मादनाईक यांच्यासह स्वाभिमानीचे सर्व कार्यकर्ते, शेतकरी, युवक, महिला मोठ्यासंख्येने उपस्थिती होते. या पदयात्रेच्या निमिताने पंचगंगा काठाने पुन्हा एकदा जनजागराचा पूर अनुभवला.

सभेत बोलताना शेट्टी म्हणाले की, जीवनदायी नद्या आता आमच्या मुळावर उठल्या आहेत, यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. पाण्याचा प्रवाहाचा अभ्यास न करता ठेकेदारांच्या सोईसाठी केलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या भरावाचा फटका आम्हाला बसत आहे. आंबोली ते महाबळेश्वरचे सर्व पाणी नृसिंहवाडीत येते. पुरातून कायमस्वरुपी सुटका होण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. गेल्या १५ वर्षांत ४ मोठे महापूर आले, तरी केंद्र सरकारला गांभीर्य नाही असे सांगून शेट्टी यांनी केंद्र सरकार हे महाराष्ट्र विरोधी आहे. वादळ, पाऊस, पूर यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होऊन देखील पंतप्रधान माेदी महाराष्ट्र दाैऱ्यावर आले नाहीत, मदतही दिली नाही. आपत्ती निवारण निधी हा काही माेदींचा निधी नाही, तो १९५० मध्ये पंडित नेहरू यांनी तयार केला होता. त्यात येणाऱ्या प्रत्येक सरकारने भर घालून आपत्तीवेळी तो दिलाही होता. पण आता मोदीसरकार करत असलेल्या सापत्नभावामुळे पूरग्रस्तांची होरपळ होत आहे. महापूर ही राष्ट्रीय आपत्ती असतानाही देखील केंद्र सरकार मदतीची घोषणा करत नाही, हे दुर्देवी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्या मोदींकडे जाऊन मदत आणावी. स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी नेतृत्व केले तर राष्ट्रपतीभवनावरही मोर्चा काढू, त्यासाठी दोन रेल्वे गाड्या भाड्याने घेऊन देऊ असेही शेट्टी म्हणाले.

गेल्या चार दिवसांपासून सरकारने आंदोलन बेदखल केले होते. साधा तलाठीही फिरकला नव्हता आणि आज अलोट जनसागर पाहून धडकी भरल्यानंतर सरकारने लगेच चर्चेचे निमंत्रण दिले. याला आंदोलनासाठी आलेली डोकी कारणीभूत आहेत. आता या डोक्याचा विधायक वापर करून त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही शेट्टी यांनी सांगितले. पूरग्रस्तांचे पुनर्वसन करताना जुनी जागा द्या, नवीन देतो असा फतवा काढणे चुकीचे आहे. आंबेवाडी, चिखली, खीद्रापूर, पारगाव या गावांनी पुनर्वसनाचा अनुभव घेतलेला पाहिला असल्याने बाकीच्या पूरग्रस्तांनी सरकारवर कसा विश्वास ठेवायचा? अशी विचारणाही केली.

तरुणांची लक्षणीय उपस्थिती

पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती. हे पाहून भारावलेल्या नेत्यांनीही तरुण वर्गच स्वाभिमानीचे पुढचे वारसदार आणि बॅंक बॅलन्स आहे. त्यांच्या हातात चळवळ सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला. स्वत: शेंट्टी यांनीही तरुणांच्या मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

ऊस परिषदेची आठवण

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे नेटके संयोजन, आसुडाच्या फटके, वाजणारी हलगी आणि शेवटी शेट्टी यांची सभा आणि त्यांची सांगता शपथ घेऊन हे वातावरण पाहून दर वर्षी भरणाऱ्या ऊस परिषदेची आठवण येत होती. तसाच सर्वत्र माहोल होता.