शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

‘स्मार्ट कोल्हापूर’साठी मी वचनबद्ध : सतेज पाटील

By admin | Updated: October 31, 2015 00:24 IST

‘फिरंगाई’ला ‘स्मार्ट’ करण्यासाठी तेजस्विनी इंगवलेंची गरज : पाटील

कोल्हापूर : अंबाबाईचा लाभलेला आशीर्वाद आणि शाहू महाराजांचे समतेचे विचार पुढे जपणाऱ्या आपल्या कोल्हापूरला पुढे न्यायची जबाबदारी माझी आहे. कोल्हापूरकरांच्या मनातलं ‘स्मार्ट कोल्हापूर’ घडविण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन सतेज पाटील यांनी केले. रमणमळा येथील काँग्रेसचे उमेदवार संदीप ऊर्फ पप्पू सरनाईक यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरला स्मार्ट बनविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले. स्वच्छ व मुबलक पाणी देणारी योजना येणाऱ्या दोन वर्षांत पूर्ण करणारच, हा माझा निर्धार आहे. ‘ई गव्हर्नस’च्या माध्यमातून मोबाईल अ‍ॅपद्वारे महापालिकेचा कारभार लोकाभिमुख करणार आहे. तरुणांसाठी रोजगार, वाय-फाय सिटी, मल्टिलेवल पार्किंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षित शहर, महिलांसाठी स्वच्छतागृहे, कचरामुक्त शहर, वाहतुकीचे नियोजन याला प्राधान्य असेल. ज्यांच्यासाठी मते मागायला मी तुमच्याकडे आलो. त्यांनी निवडणुकीनंतर तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असायला हवे हा माझा आग्रह आहे. त्यासाठी निवडणुकीनंतर ज्या वॉर्डात काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील, त्या ठिकाणी प्रत्येक सहा महिन्याला वॉर्ड मिटिंग घेऊन नगरसेवकांनी काय काम केले?, जनतेच्या काय सूचना आहेत, हे जाणून घेणार आहे. या प्रत्येक मिटिंगला मी स्वत: उपस्थित राहीन. कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून माझ्यासारखा तरुण काम करत आहे. आजपर्यंत जनतेचे आशीर्वाद, प्रेम, पाठबळ मला लाभले आहे. तुमच्यासारखी जोडलेली माणसे हेच माझे आयुष्याचे संचित आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्याची माझी प्रबळ इच्छा आहे. यासाठी काँग्रेस पक्षाला बहुमत द्या, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. सुरेश कुराडे म्हणाले, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे काँग्रेससोबतच आहेत. मात्र, विरोधक त्यांच्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. यावेळी सुरेश उलपे, सुरेश कुसळे, श्रीनिवास सोरटे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.‘फिरंगाई’ला ‘स्मार्ट’ करण्यासाठी तेजस्विनी इंगवलेंची गरज : पाटीलकोल्हापूर : शिवाजी पेठ परिसरातील फिरंगाई प्रभाग क्र. ४७ मधून विद्यमान नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी आपल्या दोन तपांतील नगरसेवकपदाच्या कार्याच्या जोरावर पुन्हा एकदा आपल्या पत्नी तेजस्विनी इंगवले यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. फिरंगाई परिसर ‘स्मार्ट’ व्हावा, असे नागरिकांना वाटत असल्यानेच इंगवले यांच्या पत्नी तेजस्विनी इंगवले यांना प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे, असे उद््गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला नसता तर रविकिरण इंगवले यांनी येथून विजयाची हॅट्ट्रिक केली असती, असाही विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. इंगवले यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यांच्या जोरावर त्यांच्या मागे परिसरातील सर्व जनता राहणार असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रभागात २०१५-२०२० या कालावधीत गांधी मैदानाचे अत्याधुनिकीकरण, गांधी मैदानातील अत्याधुनिक जीम, गांधी मैदान हॉलमध्ये फक्त महिलांकरिता योगासन तसेच निसर्ग उपचार केंद्रांची स्थापना करणे, शिवाजी पेठेत निवृत्ती चौकातील शिवाजी पुतळ्याचे सुशोभीकरण करणे तसेच खरी कॉर्नर, अवचित पीर तालीम परिसर, विद्यार्थी कामगार चौक येथे हायमास्ट लॅम्पच्या उभारणीचा संकल्प असल्याचेही रविकिरण इंगवले यांनी सांगितले. यावेळी ताराराणी आघाडीच आपल्या प्रभागातील जनतेला न्याय देऊ शकेल, असा विश्वास रविकिरण इंगवले यांनी व्यक्त करून पत्नी तेजस्विनी इंगवले यांना मैदानात उतरविल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)