शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
4
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
5
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
6
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
7
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
8
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
9
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
10
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
11
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
12
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
14
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
15
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
16
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
17
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
18
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
19
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
20
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

हुपरी पोलिसांचा कारभार सुधारणार?

By admin | Updated: November 16, 2016 23:57 IST

नांगरे-पाटील यांच्याकडून सूचना : सय्यद यांच्यावर जबाबदारी

तानाजी घोरपडे -- हुपरी --खंडणी, लाचखोरी, हप्ते वसुलीबरोबरच अन्य विविध कारनाम्यांच्या मालिकेमुळे सातत्याने वादग्रस्त राहून चर्चेचा विषय ठरलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) पोलिस ठाण्याचा कारभार यापुढे निश्चितपणे सुधारला जाईल, असे आशादायक स्वप्न विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी रौप्यनगरीवासीयांना दाखविले आहे. त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्याची जबाबदारी नूतन सहायक पोलिस निरीक्षक ए. आय. सय्यद यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. ही जबाबदारी ते कितपत, कशाप्रकारे व कशी पार पाडतात याबाबत अनेक शंका व प्रश्न उपस्थित होत आहेत.चांदी व्यवसाय, वाढलेले औद्योगिकीकरणमुळे परिसरातील लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढच होत राहिली आहे. परिणामी अवैध व्यवसाय व गुन्हेगारीनेही मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मटका, गुटखा, हातभट्टी, जुगार अड्डे, वडाप वाहतूक, आदी अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढून समाजाला आपले उपद्व्याप दाखविण्याची जराशीही कसर सोडलेली नाही. तसेच चोरी, दरोडे, हाणामारी या गोष्टी तर नित्याच्याच होऊन गेल्या आहेत. हे सर्व प्रकार घडले जातात ते पोलिसांच्या कचखाऊ व निष्क्रिय भूमिकेमुळेच. पोलिसांची अशी भूमिका का निर्माण होते? त्याचे खरे कारण आहे हप्ता वसुलीतून होणारी वरकमाई. अवैध धंदेवाल्याकडून प्रत्येक महिन्याकाठी मिळणाऱ्या हप्त्याच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या पोलिसांकडून कारवाईचे धाडसच राहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मटका व्यवसायात कार्यरत असणाऱ्या व रौप्यनगरीची डोकेदुखी ठरलेल्या तरीही पोलिस मित्र, त्यांचा मार्गदर्शक व तारणहार समजल्या जाणाऱ्या तसेच अनेक वेळा तडीपार ठरविण्यात आलेल्या एका मटकाकिंगकडूनच पोलिस ठाण्याचा कारभार हाकला जात होता. खंडणी, लाचखोरी, हप्ता वसुली व वरकमाईला सोकावलेल्या एका सहायक पोलिस निरीक्षकासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. अशी या हुपरी पोलिस ठाण्याची सत्य वस्तुस्थिती आहे. या पोलिस ठाण्याला सुधारण्याची जबाबदारी नांगरे-पाटील यांनी आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असणारे सहायक पोलिस निरीक्षक ए. आय. सय्यद यांच्यावर सोपविली आहे. अवैध व्यवसाय : रोखण्याचे आव्हानसय्यद यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिक व गुंडांची इत्यंभुत माहिती निश्चितपणे असणार आहे. मात्र, त्यांना असणारे अधिकार, कर्तव्य बजाविण्याची त्यांच्यातील धमक, पोलिस ठाण्यातील लाचखोरी, हप्ता वसुली थांबविण्याबाबतची त्यांची मानसिकता यावरच विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी रौप्यनगरीवासीयांना दाखविलेल्या स्वप्नांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारलेला आहे. तरीही कार्यक्षेत्रातील अवैध व्यवसाय अगदी पूर्वीसारखेच बिनधास्त सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे येत्या आठ दहा दिवसांत पोलिस ठाण्यातील चित्र बदलेल हे स्वप्नं म्हणजे म्रुगजळच ठरण्याची शक्यता आहे.