शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

कत्तलखान्यात दीड कोटीचा ‘मलिदा’

By admin | Updated: August 27, 2015 00:20 IST

आघाडीच्या बैठकीत वादंग : पैसे खाल्लेल्यांची नावे जाहीर करण्यावरून नगरसेवकांत जुंपली; आजच्या सभेकडे लक्ष

कोल्हापूर : नेहरुनगर परिसरात बांधण्यात येत असलेल्या ‘बीओटी तत्त्वा’वरील कत्तलखाना मंजुरी प्रकरणावरून बुधवारी महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या बैठकीत नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली. या प्रकरणात १ कोटी ४७ लाख रुपये कोणी घेतले, त्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी करत नगरसेवकांनी बैठकीत चांगलाच गदारोळ केला. हातघाईवर आलेले हे प्रकरण काहीजणांनी मध्यस्थी करत शांत केले. महानगरपालिकेची तहकूब सभा आज, गुरुवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांची बुधवारी सायंकाळी महापालिकेत ही बैठक झाली. महासभेच्या पुरवणी विषयपत्रिकेवरील अठरा क्रमांकाचा विषय या गदारोळास कारणीभूत ठरला. कत्तलखाना उभारणीकरिता भूसंपादनास शासनाच्या रेडिरेकनर दराप्रमाणे होणारा निधी पुनर्वर्गीकरण करून देण्याबाबतचा हा सदस्य ठराव आहे. त्यावर आघाडी बैठकीत चर्चा सुरू होताच नगरसेवकांनी गदारोळ सुरू केला. हा विषय कशासाठी मंजूर करायचा, असा सवालच काहींनी उपस्थित केला. या प्रकरणात महासभेसाठी ५० लाख आणि वैयक्तिक ९८ लाख रुपये कोणीतरी घेतल्याची चर्चा सुरू आहे. हे पैसे कोणी घेतले त्यांची नावे सांगा, अशी थेट मागणीच बैठकीत अनेकांनी लावून धरली.त्यातच कोणीतरी ‘नेत्यांच्या आदेशाने हा ठराव मंजूर करायचा आहे,’ असे सांगताच नेत्यांची नावे या प्रकरणात घेतली जाऊ नयेत, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे गदारोळात भर पडली. आदिल फरास, राजेश लाटकर आणि सुरेश ढोणुक्षे यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. त्याचवेळी प्रा. जयंत पाटील आणि अजित पोवार यांच्यातही जुंपली. विजय सूर्यवंशी यांनीही यात हात धुऊन घेत पैसे घेणाऱ्यांची आधी नावे सांगा, अशी जोरदार मागणी लावून धरली. महासभेसाठी घेतलेले ५० लाख का वाटले नाहीत, याचा जाबही अनेकांनी ‘कारभाऱ्यां’ना विचारला. ज्यांनी पैसे घेतले त्यांनी घेतले, आता संबंधित ठेकेदाराचे यापुढे नुकसान होऊ नये म्हणून गुरुवारच्या सभेपुढे प्रस्ताव ठेवला असून तो मंजूर करावा, अशी विनंती कारभारी नगरसेवकांनी केली; परंतु अनेकांनी आधी वाटप करा, मगच बघू, अशी आक्रमक भूमिका घेतली. नगरसेवकांना समजावण्याचा बराच प्रयत्न झाला, पण कोणीही तो मान्य केला नाही. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत केशवराव भोसले नाट्यगृह सुशोभीकरण, नगरोत्थान रस्ते आणि सीसीटीव्ही प्रकल्पातील मलिद्यावरून नगरसेवकांमध्ये संशयाचे आणि संतापाचे वातावरण आहे. त्यातील मलिदा पोहोचला नसल्याने अनेकजण अस्वस्थ होते. त्यामुळेच कत्तलखान्याच्या विषयावरून वादाला तोंड फुटले. नगरसेवक एकमेकांसमोर ठाकले. शेवटी तणावाच्या वातावरणातच बैठक गुंडाळावी लागली. त्यामुळे गुरुवारच्या सभेत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)