शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

जीव धोक्यात घालून किती दिवस प्रवास ?--कलानगर-चंदूर मार्गावरील प्रलंबित पुलाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 22:23 IST

इचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच याठिकाणी तयार केलेला पर्यायी मार्गही निकृष्ट दर्जाचा आहे.

ठळक मुद्देराजकीय चढाओढीमुळे सामान्याचा गेला बळी, ‘लोकमत’ ने उठविला होता आवाज एकाचा जीव गेला. या घटनेचे तरी गांभीर्य पाहून प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का,

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच याठिकाणी तयार केलेला पर्यायी मार्गही निकृष्ट दर्जाचा आहे. थोडा पाऊस झाला तरी तो लगेचच पाण्याखाली जातो आणि नागरिक, कामगार, शाळकरी मुले-मुली यांना त्यातूनच जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी बातम्या देऊन यावर आवाज उठविला. एखाद्याचा जीव गेल्यावरच याकडे पाहणार का, असा सवालही ‘लोकमत’ने उपस्थित केला होता; पण निर्ढावलेले प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एकाचा जीव गेला. या घटनेचे तरी गांभीर्य पाहून प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

कलानगर-चंदूर ओढ्यावरील पूल हा वक्रस्थितीत आहे. प्रकाश आवाडे आमदार असताना तो सरळ चिंधी पीर ते सायझिंग, असा थेट मंजूर करण्यात आला होता. त्याला त्या परिसरातील काहीजणांनी विरोध केल्यामुळे ते काम थांबवून पुन्हा आहे त्याच ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. परत पाठविलेला फेर प्रस्ताव सुरेश हाळवणकर आमदार झाल्यानंतर मंजूर झाला आणि प्रत्यक्षात कामकाजास सुरुवातही झाली; पण पुलाची उंची थेट पुलाच्या हिशोबानेच मंजूर राहिल्याने पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला आणि परिसरातील काहीजणांनी त्याला विरोध दर्शविला. त्यामुळे परत पुलाचे काम थांबले.

गेल्या दहा वर्षांपासून मागणी असलेल्या या पुलाचे काम दोनवेळा मंजूर होऊन ते परत जाऊन त्यामध्ये फेरबदल करण्यात आले. स्थानिक विरोध पाहता पुन्हा प्रशासकीय पातळीवर अनेक उलथापालथी होऊन पुलाची उंची कमी करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे उंच उभे केलेले पुलाचे सिमेंटचे खांब मशीन लावून अर्ध्यातून कापण्यात आले आणि पावसाळा सुरू झाल्याचे कारण पुढे करीत पुन्हा थांबले. ग्रामस्थांच्या मते या पुलाच्या प्रकरणात राजकारण घुसल्याने विनाकारण सर्वांनाच त्रास होत असल्याचे बोलले जात आहे. राजकारणाच्या वादातून थांबलेल्या कामामुळे सर्वसामान्याला बळी पडावे लागले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्दैवी घटनेला जबाबदार धरायचे कोणाला?यश कधी मिळणार ?रात्रीच्या वेळी पुलावरून जाताना दिवाबत्तीची सोय नसल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि प्रकाश वासुदेव यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी नातेवाइक व परिसरातील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केली; पण त्याला यश कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.