शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून किती दिवस प्रवास ?--कलानगर-चंदूर मार्गावरील प्रलंबित पुलाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 22:23 IST

इचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच याठिकाणी तयार केलेला पर्यायी मार्गही निकृष्ट दर्जाचा आहे.

ठळक मुद्देराजकीय चढाओढीमुळे सामान्याचा गेला बळी, ‘लोकमत’ ने उठविला होता आवाज एकाचा जीव गेला. या घटनेचे तरी गांभीर्य पाहून प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का,

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच याठिकाणी तयार केलेला पर्यायी मार्गही निकृष्ट दर्जाचा आहे. थोडा पाऊस झाला तरी तो लगेचच पाण्याखाली जातो आणि नागरिक, कामगार, शाळकरी मुले-मुली यांना त्यातूनच जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी बातम्या देऊन यावर आवाज उठविला. एखाद्याचा जीव गेल्यावरच याकडे पाहणार का, असा सवालही ‘लोकमत’ने उपस्थित केला होता; पण निर्ढावलेले प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एकाचा जीव गेला. या घटनेचे तरी गांभीर्य पाहून प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

कलानगर-चंदूर ओढ्यावरील पूल हा वक्रस्थितीत आहे. प्रकाश आवाडे आमदार असताना तो सरळ चिंधी पीर ते सायझिंग, असा थेट मंजूर करण्यात आला होता. त्याला त्या परिसरातील काहीजणांनी विरोध केल्यामुळे ते काम थांबवून पुन्हा आहे त्याच ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. परत पाठविलेला फेर प्रस्ताव सुरेश हाळवणकर आमदार झाल्यानंतर मंजूर झाला आणि प्रत्यक्षात कामकाजास सुरुवातही झाली; पण पुलाची उंची थेट पुलाच्या हिशोबानेच मंजूर राहिल्याने पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला आणि परिसरातील काहीजणांनी त्याला विरोध दर्शविला. त्यामुळे परत पुलाचे काम थांबले.

गेल्या दहा वर्षांपासून मागणी असलेल्या या पुलाचे काम दोनवेळा मंजूर होऊन ते परत जाऊन त्यामध्ये फेरबदल करण्यात आले. स्थानिक विरोध पाहता पुन्हा प्रशासकीय पातळीवर अनेक उलथापालथी होऊन पुलाची उंची कमी करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे उंच उभे केलेले पुलाचे सिमेंटचे खांब मशीन लावून अर्ध्यातून कापण्यात आले आणि पावसाळा सुरू झाल्याचे कारण पुढे करीत पुन्हा थांबले. ग्रामस्थांच्या मते या पुलाच्या प्रकरणात राजकारण घुसल्याने विनाकारण सर्वांनाच त्रास होत असल्याचे बोलले जात आहे. राजकारणाच्या वादातून थांबलेल्या कामामुळे सर्वसामान्याला बळी पडावे लागले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्दैवी घटनेला जबाबदार धरायचे कोणाला?यश कधी मिळणार ?रात्रीच्या वेळी पुलावरून जाताना दिवाबत्तीची सोय नसल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि प्रकाश वासुदेव यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी नातेवाइक व परिसरातील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केली; पण त्याला यश कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.