शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून किती दिवस प्रवास ?--कलानगर-चंदूर मार्गावरील प्रलंबित पुलाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 22:23 IST

इचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच याठिकाणी तयार केलेला पर्यायी मार्गही निकृष्ट दर्जाचा आहे.

ठळक मुद्देराजकीय चढाओढीमुळे सामान्याचा गेला बळी, ‘लोकमत’ ने उठविला होता आवाज एकाचा जीव गेला. या घटनेचे तरी गांभीर्य पाहून प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का,

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच याठिकाणी तयार केलेला पर्यायी मार्गही निकृष्ट दर्जाचा आहे. थोडा पाऊस झाला तरी तो लगेचच पाण्याखाली जातो आणि नागरिक, कामगार, शाळकरी मुले-मुली यांना त्यातूनच जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी बातम्या देऊन यावर आवाज उठविला. एखाद्याचा जीव गेल्यावरच याकडे पाहणार का, असा सवालही ‘लोकमत’ने उपस्थित केला होता; पण निर्ढावलेले प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एकाचा जीव गेला. या घटनेचे तरी गांभीर्य पाहून प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

कलानगर-चंदूर ओढ्यावरील पूल हा वक्रस्थितीत आहे. प्रकाश आवाडे आमदार असताना तो सरळ चिंधी पीर ते सायझिंग, असा थेट मंजूर करण्यात आला होता. त्याला त्या परिसरातील काहीजणांनी विरोध केल्यामुळे ते काम थांबवून पुन्हा आहे त्याच ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. परत पाठविलेला फेर प्रस्ताव सुरेश हाळवणकर आमदार झाल्यानंतर मंजूर झाला आणि प्रत्यक्षात कामकाजास सुरुवातही झाली; पण पुलाची उंची थेट पुलाच्या हिशोबानेच मंजूर राहिल्याने पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला आणि परिसरातील काहीजणांनी त्याला विरोध दर्शविला. त्यामुळे परत पुलाचे काम थांबले.

गेल्या दहा वर्षांपासून मागणी असलेल्या या पुलाचे काम दोनवेळा मंजूर होऊन ते परत जाऊन त्यामध्ये फेरबदल करण्यात आले. स्थानिक विरोध पाहता पुन्हा प्रशासकीय पातळीवर अनेक उलथापालथी होऊन पुलाची उंची कमी करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे उंच उभे केलेले पुलाचे सिमेंटचे खांब मशीन लावून अर्ध्यातून कापण्यात आले आणि पावसाळा सुरू झाल्याचे कारण पुढे करीत पुन्हा थांबले. ग्रामस्थांच्या मते या पुलाच्या प्रकरणात राजकारण घुसल्याने विनाकारण सर्वांनाच त्रास होत असल्याचे बोलले जात आहे. राजकारणाच्या वादातून थांबलेल्या कामामुळे सर्वसामान्याला बळी पडावे लागले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्दैवी घटनेला जबाबदार धरायचे कोणाला?यश कधी मिळणार ?रात्रीच्या वेळी पुलावरून जाताना दिवाबत्तीची सोय नसल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि प्रकाश वासुदेव यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी नातेवाइक व परिसरातील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केली; पण त्याला यश कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.