शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

‘आयआरबी’चे देणे भागवायचे कसे?

By admin | Updated: November 7, 2014 00:47 IST

महापालिकेसमोर प्रश्नचिन्ह : अतिरिक्त कर, फेर सर्व्हेक्षण व न्यायालयात जाण्याचे पर्याय

संतोष पाटील- कोल्हापूर --न्यायालयाचा आदेश व राज्य शासनाचे टोलबाबतचे धोरण पाहता, ‘आयआरबी’च्या सर्व देण्यांची तरतूद महापालिकेलाच करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेची परिस्थिती हलाखीची असताना नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकल्याशिवाय गत्यंतर नाही. रस्ते मूल्यांकन समितीच्या अहवालानुसार महापालिका ३२५ कोटी रुपयांचे देणे लागते. १७० कोटी पेक्षा कमी रकमेची कामे झाली असताना आता इतकी रक्कम द्यायची कशी? हा प्रश्न महापालिकेला सतावीत आहे.प्रकल्पाची मूळ किंमत २२० कोटी आहे. निगेटिव्ह ग्रॅँडचे २५ कोटी वजा करून १९५ कोटी राहतात. अद्याप किमान २५ कोटींची कामे बाकी असावीत, असा अंदाज आहे. म्हणजे प्रकल्पाची किंमत १७० कोटींवरच येते. कराराप्रमाणे किती कामे झाली? त्यांची किंमत काय? हे एकत्रित सर्व्हेनंतर स्पष्ट होणार असले, तरी असा सर्व्हे करण्याची मागणी करूनही रस्ते विकास महामंडळ किंवा राज्यशासन तयार झालेले नाही. रस्ते विकास प्रकल्पाचा करार हा महापालिका, आयआरबी व एमएसआरडीसी यांच्यातील त्रिस्तरीय करार आहे. यामुळे महापालिका कोणताही निर्णय एकट्याने घेऊ शकणार नाही. करारानुसार अद्याप ९५ टक्के काम पूर्ण झालेले नाही. तेवढे काम पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करता येत नाही. याबाबत महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. आता याच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयात जाण्याचा महापालिकेसमोर पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.सांगा, जगायचे कसे ? महापालिकेचा प्रश्नमहापालिकेचे अपेक्षित उत्पन्न २५० कोटींचे असले तरी सद्य:स्थितीत २०० कोटींचा टप्पा पार करणेही तिला मुश्कील आहे. यातच थेट पाईपलाईनसाठीचे कर्ज काढावे लागणार आहे. पंधरा वर्षांसाठी प्रतिवर्षी एक कोटी रुपयांना साडेनऊ कोटींप्रमाणे सहा कोटी ७० लाखांचा वर्षाला बोजा पडेल. आयआरबीचे देणे भागविण्यासाठी किमान १५० कोटींचा अतिरिक्त बोजा पडल्यास दरवर्षी १५ कोटी कर्जाचे हप्ते द्यावे लागतील. यापूर्वीच नगरोत्थानचे २६ कोटी, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा ३७ कोटी ५० लाख कर्जाचा बोजा असलेल्या पालिकेला नव्या कर्जाचा भार कसा पेलवणार ? टोलचे पैसे द्यावे लागल्यास ‘सांगा, जगायचे कसे?’ असे म्हणण्याची वेळ पालिका प्रशासनावर येणार असल्याचे प्राप्त परिस्थिती दर्शविते.भूखंडाचे काय ?महापालिकेचे तीन लाख चौरस फुटांचा मोठा भूखंड ‘आयआरबी’ला ९९ वर्षांसाठी दिला आहे. या भूखंडाची किंमत ‘डीएसआर’ प्रमाणे १०० कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे योग्य मूल्यांकन, आयआरबीने आतापर्यंत वसूल केलेली टोलची रक्कम व भूखंडाची किंमत वजा केल्यास मनपावर फारसा बोजा पडणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.संयुक्त पाहणीच नाहीरस्ते विकास प्रकल्पाच्या ९५ टक्के कामाच्या पूर्ततेबाबत भिन्नता आढळत असून, प्रकल्पाची जिल्हाधिकारी, आयुक्त व आयआरबीचे प्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करावी, अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी १ फेब्रुवारी २०१३ ला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. यावेळी आयआरबीचे अध्यक्ष वीरेंद्र म्हैसकर यांनी त्यास नकार दिला होता. मात्र, अद्याप अशी संयुक्त पाहणीच झाली नाही. संयुक्त पाहणी झाल्याखेरीज एकांगी दिलेल्या प्रकल्पाच्या किमतीचा अहवाल मान्य न करण्याची कृती समितीची भूमिका आहे.पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत एलबीटी-७७ मुद्रांक शुल्क-१३ पाणीपुरवठा-४० मिळकत कर-४२ इस्टेट -०८ नगररचना-२५ शासकीय अनुदान-३२ खर्चआस्थापना खर्च १५२ कोटीवीज व पाणी२५ कोटीविकासनिधी१५ कोटीप्राथमिक शिक्षण१८ कोटीघनकचरा व्यवस्थापन०५ कोटीकर्जाचा डोंगरथेट पाईपलाईन ४२ कोटीभूसंपादन १८ कोटीवाढीव खर्च ६५ कोटीएसटीपी कर्ज३७.५० कोटीनगरोत्थान योजना २६ कोटी