शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

ऊसदराची कोंडी फुटणार कशी ?

By admin | Updated: November 3, 2014 23:32 IST

कोण ‘भारी’ ठरणार : कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

संदीप बावचे - जयसिंगपूर -ऊस दरावरून प्रथमच खा. राजू शेट्टी यांनी सावध पवित्रा घेत जादा दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. कारखानदार व राज्य सरकार यामध्ये कोणती भूमिका वटवते, शिवाय अन्य संघटना व पक्ष ऊसदराबाबत आंदोलनाचे कोणते हत्यार उपसणार हेदेखील महत्त्वाचे असून, दराची कोंडी कशी फुटणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच ऊसदराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना की कारखानदार भारी ठरणार, हे लवकरच समजणार आहे. विधानसभेच्या पराभवानंतर जयसिंगपूर येथे १३व्या ऊस परिषदेत ऊसदर किती ठरणार, आंदोलनाचा निर्णय कोणता होणार, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. विशेष म्हणजे सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात असणाऱ्या साखरपट्ट्यातील कारखानदारांनाही धास्ती लागली होती. या परिषदेत निर्णय काय होणार? पण खा. शेट्टी यांनी राज्यात व केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारला २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतीचा अल्टीमेटम देऊन त्यांनी या परिषदेत काय साधले? यापूर्वी असणाऱ्या ऊस परिषदेत आठ-दहा दिवसावरच निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावरील आंदोलन सुरू होईल, अशी भूमिका संघटनेची असायची पण ऊस परिषदेमधील नूर लक्षात घेऊन मवाळकीचे भाषण खा. शेट्टी यांनी करून थेट दीर्घ मुदतीचे अल्टीमेटम जाहीर करत उपस्थित ऊस परिषदेमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कुणाचेही असो, संघर्ष अटळ असल्याचे सांगितले असले तरी कायद्यावर बोट ठेऊन केलेली मागणी शेतकऱ्यांच्या पदरात पाडून देण्यात ते कितपत यशस्वी होतात, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. परिषदेत सदाभाऊ खोत यांचे भाषण शेतकरी चवीने ऐकायचे, पण खोत यांचेही भाषण दणकेबाज म्हणता येणार नाही. कारण, राज्य व केंद्र पातळीवर सत्तेत सहभागी असणाऱ्या व संघटनेच्या प्रवाहात असणाऱ्या खोत यांनीसुद्धा मवाळतेचे भाषण घेतले. एकूणच ऊस दराच्या प्रश्नावर एकवटलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी परिषदेत एकत्र आला, मात्र ठोस निर्णय न झाल्यामुळे तो नाराजीतून परतला.कमावले आणि गमावलेजयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत खा. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकवटण्याचा प्रयत्न केला. पण, या संघटनेने ऊस परिषदेच्या निमित्ताने थोडं कमावलं... आणि भरपूर गमावलं... हाच प्रत्यंतर पाहायला मिळाला. कारण, खासदार शेट्टी यांनी आमचा एकही आमदार झाला नाही, अशी खंत व्यक्त करीत शासनाला २४ नोव्हेंबरपर्यंत ऊस दराच्या प्रश्नाचा तोडगा काढा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. एकूणच शेट्टी यांच्या भाषणातील वक्तव्य, ऊस परिषदेची गर्दी आणि परिषद संपल्यानंतर शेतकऱ्यांतील चर्चा यात दुरापास्त निर्माण झाला होता. त्यामुळे शेट्टी यांची जयसिंगपुरात झालेली ऊस परिषद ‘काहीतरी कमावले... पण भरपूर गमावले...’ अशी चर्चा सुरू झाली आहे.अन्य संघटनांकडे लक्षऊसदराच्या प्रश्नावरून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, शिवसेना यांच्या आंदोलनाकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘स्वाभिमानी’च्या या पवित्र्यानंतर अन्य संघटना व पक्ष किती आक्रमक होतात, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.