शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदराची कोंडी फुटणार कशी ?

By admin | Updated: November 3, 2014 23:32 IST

कोण ‘भारी’ ठरणार : कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

संदीप बावचे - जयसिंगपूर -ऊस दरावरून प्रथमच खा. राजू शेट्टी यांनी सावध पवित्रा घेत जादा दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. कारखानदार व राज्य सरकार यामध्ये कोणती भूमिका वटवते, शिवाय अन्य संघटना व पक्ष ऊसदराबाबत आंदोलनाचे कोणते हत्यार उपसणार हेदेखील महत्त्वाचे असून, दराची कोंडी कशी फुटणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच ऊसदराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना की कारखानदार भारी ठरणार, हे लवकरच समजणार आहे. विधानसभेच्या पराभवानंतर जयसिंगपूर येथे १३व्या ऊस परिषदेत ऊसदर किती ठरणार, आंदोलनाचा निर्णय कोणता होणार, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. विशेष म्हणजे सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात असणाऱ्या साखरपट्ट्यातील कारखानदारांनाही धास्ती लागली होती. या परिषदेत निर्णय काय होणार? पण खा. शेट्टी यांनी राज्यात व केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारला २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतीचा अल्टीमेटम देऊन त्यांनी या परिषदेत काय साधले? यापूर्वी असणाऱ्या ऊस परिषदेत आठ-दहा दिवसावरच निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावरील आंदोलन सुरू होईल, अशी भूमिका संघटनेची असायची पण ऊस परिषदेमधील नूर लक्षात घेऊन मवाळकीचे भाषण खा. शेट्टी यांनी करून थेट दीर्घ मुदतीचे अल्टीमेटम जाहीर करत उपस्थित ऊस परिषदेमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कुणाचेही असो, संघर्ष अटळ असल्याचे सांगितले असले तरी कायद्यावर बोट ठेऊन केलेली मागणी शेतकऱ्यांच्या पदरात पाडून देण्यात ते कितपत यशस्वी होतात, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. परिषदेत सदाभाऊ खोत यांचे भाषण शेतकरी चवीने ऐकायचे, पण खोत यांचेही भाषण दणकेबाज म्हणता येणार नाही. कारण, राज्य व केंद्र पातळीवर सत्तेत सहभागी असणाऱ्या व संघटनेच्या प्रवाहात असणाऱ्या खोत यांनीसुद्धा मवाळतेचे भाषण घेतले. एकूणच ऊस दराच्या प्रश्नावर एकवटलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी परिषदेत एकत्र आला, मात्र ठोस निर्णय न झाल्यामुळे तो नाराजीतून परतला.कमावले आणि गमावलेजयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत खा. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकवटण्याचा प्रयत्न केला. पण, या संघटनेने ऊस परिषदेच्या निमित्ताने थोडं कमावलं... आणि भरपूर गमावलं... हाच प्रत्यंतर पाहायला मिळाला. कारण, खासदार शेट्टी यांनी आमचा एकही आमदार झाला नाही, अशी खंत व्यक्त करीत शासनाला २४ नोव्हेंबरपर्यंत ऊस दराच्या प्रश्नाचा तोडगा काढा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. एकूणच शेट्टी यांच्या भाषणातील वक्तव्य, ऊस परिषदेची गर्दी आणि परिषद संपल्यानंतर शेतकऱ्यांतील चर्चा यात दुरापास्त निर्माण झाला होता. त्यामुळे शेट्टी यांची जयसिंगपुरात झालेली ऊस परिषद ‘काहीतरी कमावले... पण भरपूर गमावले...’ अशी चर्चा सुरू झाली आहे.अन्य संघटनांकडे लक्षऊसदराच्या प्रश्नावरून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, शिवसेना यांच्या आंदोलनाकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘स्वाभिमानी’च्या या पवित्र्यानंतर अन्य संघटना व पक्ष किती आक्रमक होतात, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.