शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

कालचे दरोडेखोर आजचे मित्र कसे?

By admin | Updated: May 5, 2015 01:12 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा बँक, राज्य बँक, महानंद, साखर कारखान्यात केलेल्या घोटाळ्यांचे ट्रॅक्टरभर पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा बँक, राज्य बँक, महानंद, साखर कारखान्यात केलेल्या घोटाळ्यांचे ट्रॅक्टरभर पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांनी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला होता. आता सत्तेवर आल्यानंतर ते पुरावे कुठे गेले, का त्याची रद्दी घातली, असा सवाल करीत राज्यात विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. भाजपा आयतेच सत्तेवर आले असून, त्यांना सहकारातील कालचे दरोडेखोर आता मित्र वाटू लागले आहेत, अशी खरमरीत टीका खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सांगलीत केली. ‘एफआरपी’साठी सोमवारपासून राज्यभर सहकारमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाचे रणशिंगही फुंकले. स्वाभिमानी संघटनेच्यावतीने रविवारी येथे झालेल्या साखर परिषदेत ते बोलत होते. खा. शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या अटीवर भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता; पण आमचा भ्रमनिरास झाल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पैशावर उभे राहिलेले ‘वसंतदादा शुगर’ हे शरद पवार यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे वृद्धाश्रम झाले आहे. या इन्स्टिट्यूटचा शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. उलट तेथील शास्त्रज्ञांनी उसाच्या विविध जातींना विरोधच केला आहे. लोकरी माव्यावर प्रतिबंध घालण्यास या शास्त्रज्ञांना का अपयश आले, याचे उत्तर पवारांनी द्यावे. पुढील १० वर्षांतील साखर उद्योगाच्या रोडमॅपचे नियोजन केले; पण त्यात शेतकरी, शेतमजूर, साखर कामगारांना स्थान नव्हते. शरद पवार कृषिमंत्री असताना सहकारी कारखाने खासगी झाले. तेव्हा त्यांनी हे कारखाने वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. भाजपाने एफआरपीच्या नादी लागू नये, त्यांची गाठ शेतकऱ्यांशी आहे, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)