शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईनचा ठसका आत्ताच कसा लागला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाला सुरुवात होऊन सात वर्षे झाल्यानंतर या योजनेसंबंधी अनेक त्रुटी असल्याचा तसेच योजनेच्या ...

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाला सुरुवात होऊन सात वर्षे झाल्यानंतर या योजनेसंबंधी अनेक त्रुटी असल्याचा तसेच योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार कोल्हापुरातील भाजपचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना झाला. ही योजना पूर्ण होत असताना बुध्दीभेद करण्याचा हा प्रयत्न म्हणजे केवळ बदनामीचे षडयंत्र असल्याची भावना कोल्हापूरकर आणि कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करावा, ही कोल्हापूरकरांची तीस-पस्तीस वर्षांपासूनची मागणी सन २०१३मध्ये केंद्रातील तसेच राज्यातील कॉग्रेस आघाडी सरकारकडून मंजूर करण्यात आली. ४८५ कोटींच्या या योजनेच्या खर्चाचा साठ टक्के केंद्र सरकारने तर वीस टक्के आर्थिक भार हा राज्य सरकारने उचलला आहे. वीस टक्के निधी महानगरपालिकेने कर्जाच्या स्वरुपात उभा केला आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना वीस टक्के निधीची जबाबदारी स्वीकारली आहे.

ही योजना मंजूर झाली आणि २०१४मध्ये लोकसभेच्या आणि पाठोपाठ सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या. त्यामुळे काही परवानगी मिळाल्या, तर काही मिळायच्या बाकी होत्या. अशाही परिस्थितीत आचारसंहिता लागण्याअगोदर थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पुईखडी येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात झाली.

या योजनेत काही त्रुटी राहिल्या होत्या, ठेकेदार चुकीच्या पाईप वापरणार होता. सहा ब्रीजचे अंदाजपत्रक संशयास्पद होते. त्यावेळी भाजप ताराराणी आघाडीच्या काही नगरसेवकांनी आक्षेप घेतले. त्यावेळी तत्कालीन आयुक्तांनी दुरुस्त्या केल्या. ठेकेदाराची बिले रोखली. अजित ठाणेकर यांनी बिद्री येथून वीज कनेक्शन घेण्याऐवजी राधानगरी येथून घेण्याचा मुद्दा आणला होता. पण तोही कायदेशीरदृष्ट्या मान्य होणारा नव्हता. त्यानंतर पुढे पाच वर्षांत भाजप ताराराणीच्या नगरसेवकांनी तोंडही उघडले नाही.

आता योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, ऐशी टक्के काम पूर्ण झाले आहे. थेट पाईपलाईनमधून शहरवासीयांना पाणी २०२१च्या दिवाळीला मिळणार की मे २०२२मध्ये मिळणार एवढाच प्रश्न आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी योजनेचा आढावा घेऊन कामे पूर्ण करण्यास मे २०२२ ही अंतिम तारीख दिली आहे. नुकतेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आढावा घेऊन योजनेला विलंब झाल्याबद्दल माफी मागितली. ही वेळ साधून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन संशयकल्लोळ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

- शहरवासीयांच्या मनातील काही प्रश्न -

- चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना योजना पूर्ण का पूर्ण करता आली नाही?

- योजनेसाठी वन्य व वन विभागाची परवानगी मिळवून का दिली नाही?

- योजनेत भ्रष्टाचार झाला असेल तर मग मागच्या पाच वर्षांत चौकशी का केली नाही?

- योजनेत ८० टक्के केंद्राचा वाटा असताना तो ६० टक्क्यांवर कोणी व का आणला?

- पाणी पुरवठा विभागाकडे अभियंते न मिळवून देण्यात कोणी पुढाकार घेतला?