शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
4
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
5
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
6
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
7
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
9
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
10
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
11
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
12
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
13
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
14
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
15
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
16
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
17
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
18
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
19
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
20
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

थेट पाईपलाईनचा ठसका आत्ताच कसा लागला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाला सुरुवात होऊन सात वर्षे झाल्यानंतर या योजनेसंबंधी अनेक त्रुटी असल्याचा तसेच योजनेच्या ...

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाला सुरुवात होऊन सात वर्षे झाल्यानंतर या योजनेसंबंधी अनेक त्रुटी असल्याचा तसेच योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार कोल्हापुरातील भाजपचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना झाला. ही योजना पूर्ण होत असताना बुध्दीभेद करण्याचा हा प्रयत्न म्हणजे केवळ बदनामीचे षडयंत्र असल्याची भावना कोल्हापूरकर आणि कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करावा, ही कोल्हापूरकरांची तीस-पस्तीस वर्षांपासूनची मागणी सन २०१३मध्ये केंद्रातील तसेच राज्यातील कॉग्रेस आघाडी सरकारकडून मंजूर करण्यात आली. ४८५ कोटींच्या या योजनेच्या खर्चाचा साठ टक्के केंद्र सरकारने तर वीस टक्के आर्थिक भार हा राज्य सरकारने उचलला आहे. वीस टक्के निधी महानगरपालिकेने कर्जाच्या स्वरुपात उभा केला आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना वीस टक्के निधीची जबाबदारी स्वीकारली आहे.

ही योजना मंजूर झाली आणि २०१४मध्ये लोकसभेच्या आणि पाठोपाठ सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या. त्यामुळे काही परवानगी मिळाल्या, तर काही मिळायच्या बाकी होत्या. अशाही परिस्थितीत आचारसंहिता लागण्याअगोदर थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पुईखडी येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात झाली.

या योजनेत काही त्रुटी राहिल्या होत्या, ठेकेदार चुकीच्या पाईप वापरणार होता. सहा ब्रीजचे अंदाजपत्रक संशयास्पद होते. त्यावेळी भाजप ताराराणी आघाडीच्या काही नगरसेवकांनी आक्षेप घेतले. त्यावेळी तत्कालीन आयुक्तांनी दुरुस्त्या केल्या. ठेकेदाराची बिले रोखली. अजित ठाणेकर यांनी बिद्री येथून वीज कनेक्शन घेण्याऐवजी राधानगरी येथून घेण्याचा मुद्दा आणला होता. पण तोही कायदेशीरदृष्ट्या मान्य होणारा नव्हता. त्यानंतर पुढे पाच वर्षांत भाजप ताराराणीच्या नगरसेवकांनी तोंडही उघडले नाही.

आता योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, ऐशी टक्के काम पूर्ण झाले आहे. थेट पाईपलाईनमधून शहरवासीयांना पाणी २०२१च्या दिवाळीला मिळणार की मे २०२२मध्ये मिळणार एवढाच प्रश्न आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी योजनेचा आढावा घेऊन कामे पूर्ण करण्यास मे २०२२ ही अंतिम तारीख दिली आहे. नुकतेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आढावा घेऊन योजनेला विलंब झाल्याबद्दल माफी मागितली. ही वेळ साधून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन संशयकल्लोळ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

- शहरवासीयांच्या मनातील काही प्रश्न -

- चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना योजना पूर्ण का पूर्ण करता आली नाही?

- योजनेसाठी वन्य व वन विभागाची परवानगी मिळवून का दिली नाही?

- योजनेत भ्रष्टाचार झाला असेल तर मग मागच्या पाच वर्षांत चौकशी का केली नाही?

- योजनेत ८० टक्के केंद्राचा वाटा असताना तो ६० टक्क्यांवर कोणी व का आणला?

- पाणी पुरवठा विभागाकडे अभियंते न मिळवून देण्यात कोणी पुढाकार घेतला?