शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईनचा ठसका आत्ताच कसा लागला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाला सुरुवात होऊन सात वर्षे झाल्यानंतर या योजनेसंबंधी अनेक त्रुटी असल्याचा तसेच योजनेच्या ...

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाला सुरुवात होऊन सात वर्षे झाल्यानंतर या योजनेसंबंधी अनेक त्रुटी असल्याचा तसेच योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार कोल्हापुरातील भाजपचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना झाला. ही योजना पूर्ण होत असताना बुध्दीभेद करण्याचा हा प्रयत्न म्हणजे केवळ बदनामीचे षडयंत्र असल्याची भावना कोल्हापूरकर आणि कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करावा, ही कोल्हापूरकरांची तीस-पस्तीस वर्षांपासूनची मागणी सन २०१३मध्ये केंद्रातील तसेच राज्यातील कॉग्रेस आघाडी सरकारकडून मंजूर करण्यात आली. ४८५ कोटींच्या या योजनेच्या खर्चाचा साठ टक्के केंद्र सरकारने तर वीस टक्के आर्थिक भार हा राज्य सरकारने उचलला आहे. वीस टक्के निधी महानगरपालिकेने कर्जाच्या स्वरुपात उभा केला आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना वीस टक्के निधीची जबाबदारी स्वीकारली आहे.

ही योजना मंजूर झाली आणि २०१४मध्ये लोकसभेच्या आणि पाठोपाठ सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या. त्यामुळे काही परवानगी मिळाल्या, तर काही मिळायच्या बाकी होत्या. अशाही परिस्थितीत आचारसंहिता लागण्याअगोदर थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पुईखडी येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात झाली.

या योजनेत काही त्रुटी राहिल्या होत्या, ठेकेदार चुकीच्या पाईप वापरणार होता. सहा ब्रीजचे अंदाजपत्रक संशयास्पद होते. त्यावेळी भाजप ताराराणी आघाडीच्या काही नगरसेवकांनी आक्षेप घेतले. त्यावेळी तत्कालीन आयुक्तांनी दुरुस्त्या केल्या. ठेकेदाराची बिले रोखली. अजित ठाणेकर यांनी बिद्री येथून वीज कनेक्शन घेण्याऐवजी राधानगरी येथून घेण्याचा मुद्दा आणला होता. पण तोही कायदेशीरदृष्ट्या मान्य होणारा नव्हता. त्यानंतर पुढे पाच वर्षांत भाजप ताराराणीच्या नगरसेवकांनी तोंडही उघडले नाही.

आता योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, ऐशी टक्के काम पूर्ण झाले आहे. थेट पाईपलाईनमधून शहरवासीयांना पाणी २०२१च्या दिवाळीला मिळणार की मे २०२२मध्ये मिळणार एवढाच प्रश्न आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी योजनेचा आढावा घेऊन कामे पूर्ण करण्यास मे २०२२ ही अंतिम तारीख दिली आहे. नुकतेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आढावा घेऊन योजनेला विलंब झाल्याबद्दल माफी मागितली. ही वेळ साधून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन संशयकल्लोळ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

- शहरवासीयांच्या मनातील काही प्रश्न -

- चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना योजना पूर्ण का पूर्ण करता आली नाही?

- योजनेसाठी वन्य व वन विभागाची परवानगी मिळवून का दिली नाही?

- योजनेत भ्रष्टाचार झाला असेल तर मग मागच्या पाच वर्षांत चौकशी का केली नाही?

- योजनेत ८० टक्के केंद्राचा वाटा असताना तो ६० टक्क्यांवर कोणी व का आणला?

- पाणी पुरवठा विभागाकडे अभियंते न मिळवून देण्यात कोणी पुढाकार घेतला?