शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अर्थ व्यवस्था मोडीत काढून आत्मनिर्भर कसे बनणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:15 IST

congress, kolhapurnews, rally कामगार, कृषी क्षेत्रासह देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढून देश आत्मनिर्भर कसा बनवणार, असा सवाल कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी शेतकरी बचाव रॅलीत भाजप सरकारला विचारला. या व्हर्च्युअल रॅलीत कॉंग्रेसचे राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देअर्थ व्यवस्था मोडीत काढून आत्मनिर्भर कसे बनणार?कॉंग्रेसचे प्रभारी पाटील यांचा भाजप सरकारला सवाल

कोल्हापूर : कामगार, कृषी क्षेत्रासह देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढून देश आत्मनिर्भर कसा बनवणार, असा सवाल कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी शेतकरी बचाव रॅलीत भाजप सरकारला विचारला. या व्हर्च्युअल रॅलीत कॉंग्रेसचे राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.शेतकरी व कामगार विरोधी कायदे राज्यसभेत बहुमत नसतानाही भाजप सरकारने मंजूर करुन घेतले. संसदेच्या मर्यादांचे त्यांनी उल्लंघन केले. संविधानाची त्यांनी टर उडविली, असे पाटील म्हणाले. दिवसरात्र कष्ट करून शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन कोणी उद्योगपतींच्या घशात घालणार असेल तर कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, त्याविरुद्ध देशभर आंदोलन केले जाईल, असेही पाटील म्हणाले.मंत्री बाळासाहे थोरात यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात एक कोटी सह्यांची मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.केंद्रात लबाडांचे सरकारकेंद्रातील सरकार हे लबाडांचे सरकार असून, त्यांनी आतापर्यंत जनतेला फसविण्याचे काम केले. असा आरोप मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला. सगळी क्षेत्रं व्यापाऱ्यांना विकण्याचा यांचा प्रयत्न असून शेतकरी, कामगार यांना देशोधडीला लावणाऱ्या हुकूमशाही मोदी सरकारला चोख उत्तर देण्यास सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी केले.रॅलीत मंत्री नितीन देसाई, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांची भाषणे झाली. प्रारंभी बसवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर मुझफ्फर हुसेन यांनी आभार मानले.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर