शहरं
Join us  
Trending Stories
1
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
2
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
3
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
4
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
5
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
6
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
7
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
8
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
9
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
10
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
11
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
12
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
13
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
14
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
15
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
16
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
17
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
18
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
19
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
20
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थ व्यवस्था मोडीत काढून आत्मनिर्भर कसे बनणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:15 IST

congress, kolhapurnews, rally कामगार, कृषी क्षेत्रासह देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढून देश आत्मनिर्भर कसा बनवणार, असा सवाल कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी शेतकरी बचाव रॅलीत भाजप सरकारला विचारला. या व्हर्च्युअल रॅलीत कॉंग्रेसचे राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देअर्थ व्यवस्था मोडीत काढून आत्मनिर्भर कसे बनणार?कॉंग्रेसचे प्रभारी पाटील यांचा भाजप सरकारला सवाल

कोल्हापूर : कामगार, कृषी क्षेत्रासह देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढून देश आत्मनिर्भर कसा बनवणार, असा सवाल कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी शेतकरी बचाव रॅलीत भाजप सरकारला विचारला. या व्हर्च्युअल रॅलीत कॉंग्रेसचे राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.शेतकरी व कामगार विरोधी कायदे राज्यसभेत बहुमत नसतानाही भाजप सरकारने मंजूर करुन घेतले. संसदेच्या मर्यादांचे त्यांनी उल्लंघन केले. संविधानाची त्यांनी टर उडविली, असे पाटील म्हणाले. दिवसरात्र कष्ट करून शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन कोणी उद्योगपतींच्या घशात घालणार असेल तर कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, त्याविरुद्ध देशभर आंदोलन केले जाईल, असेही पाटील म्हणाले.मंत्री बाळासाहे थोरात यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात एक कोटी सह्यांची मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.केंद्रात लबाडांचे सरकारकेंद्रातील सरकार हे लबाडांचे सरकार असून, त्यांनी आतापर्यंत जनतेला फसविण्याचे काम केले. असा आरोप मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला. सगळी क्षेत्रं व्यापाऱ्यांना विकण्याचा यांचा प्रयत्न असून शेतकरी, कामगार यांना देशोधडीला लावणाऱ्या हुकूमशाही मोदी सरकारला चोख उत्तर देण्यास सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी केले.रॅलीत मंत्री नितीन देसाई, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांची भाषणे झाली. प्रारंभी बसवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर मुझफ्फर हुसेन यांनी आभार मानले.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर